Sunday, July 11, 2010

जिथे सागरा धरणी मिळते...

पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जुलै-२०१०

अथांग निळा समुद्र. सुसाट सळसळता वारा. लाटांची गाज. आजुबाजुत पसरलेला ओला गारवा. क्षितिजावर काळ्या प्रकाशाची आभा. लाटेमागून लाट एका संथ लयीत किनार्‍यावर उतरत रहाते. मनाला गुंतऊन शरीराला रिझवत ठेवते. समुद्रावर लवलवणारा वारा पाण्याला खेळवत राहतो आणि काठावरुन पाण्यात पडणारे प्रकाशाचे कवडसे वरवर नाचत राहतात. मधुनच पडणारी पावसाची सर पाण्यावर थरथरत रहाते. दिवसभराचा शीण मऊशार वाळूत निथळत राहतो आणि आपण अधिक ताजेतवाने, फ्रेश होत जातो. मन वाळूत रुतुन बसतं. पाय निघायचं नाव घेत नाहीत.

...आणि शिटयांच्या आवाज कानावर येतो. ती पोलिसाची असते म्हणून. आता निघावंच लागतं. आणि आपण पुन्हा सिंमेंटच्या चकचकीत जगात. माणसांच्या दुनियेकडे पाठ फिरवून उभं राहिलं तर जगातल्या कोणत्याही समुद्राची गोष्ट वेगळी नसावी. आपल्याच तंद्रीत, आपल्याच नादात. असाच मुंबईचा जुहु समुद्रकिनारा. मुंबईच्या सौंदर्यातली एक नखरेल अदा.

रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास बांधाच्या आडोश्याने, दगडांच्या कुशीत, वाळूत, बसलेली-लपलेली जोडपी घराकडे निघायच्या तयारीत. अंगाला चिकटलेली वाळू झटकत रुतलेल्या पावलांना ओढत सोबतचा आधार घेत धिम्या पावलांनं परतीला लागतात. जशी रात्र चढायला लागते तसे एक एक करुन माणसांचे पाय उलटया दिशेने चालायला लागतात. बारा साडेबारा नंतर उरतात ते श्रीमंत आणि सडाफटींग. त्यांच्यावर लक्ष ठेवायला पोलीस. त्यांच्या पोटाची भुक भागवणारी दुकानं आणि पेटलेल्या शिरीराची आग शमवणार्‍या पोरी.

जुहु पोलीस चौकीच्या तोंडावरुन समुद्रकिनार्‍यावर प्रवेश केला की उजव्या अंगाला लागतात ती खानपानाची दुकानं. पण पुर्वीसारखां मुंबईच्या किनार्‍यावरचा ऐसपैसपणा गेला आणि त्यांची जागा या पॉश दुकानांनी घेतली. दिलखेचक रंग, आकर्षक सजावट, भगभगणारा उजेड माणसाना आपल्या दिशेनं ओढत रहातो. पुर्वीचे भेळवाले, पाणिपुरीवाले भय्ये नेस्तनाबूत झाल्यासारखे. आता बहुतेक दुकानांचे मालक मुसलमान, गुजराती, मारवाडी. पावभाजीच्या दुकानावरची दोन पोरं ओरडून ओरडून दुकानाकडे गिर्‍हाईकं खेचत होती. त्यातल्याच एक म्हणाला, 'अभी बारीश है ना. इसलिये. पयले जैसा मजा नही. अभी कुछ नही. पयले घोडा गाडी थी. घोडे की सवारी थी. बच्चोंके लिये गेम थे. सर्कल थे. सोरट था. क्या नही था इधर. पुरा एंजॉयमेंट था. अभी चौपाटीका नक्षा ही बदल गया. मजा नही. कुछभी मजा नही.'

आपला कॅमेरा आणि सँपलचे लॅमिनेट केलेले फोटो हातात घेऊन एकानं विचारलं, तर नाही म्हणाल्यावर खट्टु झाला. हमारे पास मोबाईल है उससे खिचेंगे तर म्हणाला' ये मोबाईलने हमारे धंदे की गांड मारी है. त्याच्यासारखी विस-बावीस वर्षांची पाच-सहा पोरं डिजीटल कॅमेरा घेउन हा फिरता धंदा करीत होती. पुर्वी पैसे पुर्ण चुकते करुन घरी पोस्टाने आठ-दहा दिवसानी फोटो मिळायचे. आता तिथल्यातिथे पाचएक मिनिटात कॉपी काढुन देण्याची सोय आहे...तरीही ही अवस्था. त्यातूनही काही हौशी असतातच.

समुद्रकिनार्‍यावर उजाव्या साईडला चालत दोन-तिनशे मिटर गेलं की काली बस्ती आहे. हॉटेल रामदा पाल्म ग्रोव्हच्या मागच्या बाजूस. अंधुकसा उजेड. लांबून पाहिलं तर माणसांच्या काळोख्या प्रतिकृती. दहा एक मिटरवरचं दिसतं. जवळ गेल्यावर तिथं तुरळक पंधरा-वीस माणसं काही बसलेली काही भिरभिरलेली. कुणा कुणाशी तुकडया तुकडयानं बोलत काही बायका. एक बाई जवळ आली. बंगाली होती. गोरीपान. मध्यम बांध्याची. चमकदार साडी. चेहर्‍यावर जाडसर मेकअप. म्हणाली, क्या ...टाईमपास? मी म्हणालो, नही ऐसाही. ...चलेगा? किधर? इधरही. तिनं बोट दाखवलं तिथं चिंचोळा बोळ होता. क्या करोगी. क्या करनेका बोले तो... हिलानेका, दबानेका, इंजॉय करनेका. कितना? सौ रुपया. वो काम नही करती? ...उसका तिनसो रुपया. मी काहीच बोललो नाही...ती, जाने का है क्या? घर जाने का टाईम हो गया. खाली पानी निकालने का है तो बोल पचासमे...मी तरीही काही बोललो नाही तर म्हणाली फोकट का टाईमपास.

मघापासून तिथंच रेंगाळत एकजण उभा होता. ती त्याच्याकडे सरकली. दोन-चार सेकंदाचंच बोलण झालं.. आणि ती दोघं आत समुद्राकडे निघाले. आता वीसेक पावलं चालल्यावर त्यानं इकडेतिकडे पाहिलं. पोजिशन पक्क्या झाल्या. गरजे पुरते कपडे वर(तिचे) खाली(त्याचे) गेले. उभ्या उभ्याच ती दोघ एकमेकांत घुसली. ती अनुभवी होती. त्याला पुरेसा स्पेस करुन देत होती. पाच सात मिनिटांचा हा समागमाचा खेळ सागराच्या पार्श्वभुमीवरचा अजिंठया-वेरुळाची आठवण देऊन गेला.

रात्रीचा दिड वाजतो. शिटया वाजवत पोलीस यायला लागतात. माणसं आपलं आपण समजतात. हातात काठी, बॅटरी घेऊन इथं तिथं शोधत राहतात. कुणी भेटलाच तर निघायची खुण करतात. दोन पर्यंत किनारा सुनसान होतो. आता एखाद-दुसर्‍या कुत्र्यापलिकडे तिथं कुणीही नसतं. आता खाण्याच्या स्टॉल्सवर गर्दी उसळते. पावभाजी, कालाखटटा, भेळपुरी, ज्युस, पानाची दुकानं आपोआप फुलतात. गळ्यात टोपली अडकवून सिगरेट- गुटका विकणारा विकता विकता थकुन जातो. आणि मागून पोलीस शिट्या वाजवीत, काठ्या आपटीत राहतात.

निघताना सुर्यही रेंगाळतो. माणसांचंही तेच. मधल्या चौकात फॅशन परेड असावी तसा आठ-दहा पंधरा ते पंचवीसमधल्या तरुण पोरींचा घोळका हसत खिदळत असतो. कुणी झुलत, कुणी बिचकत, कुणी थेट एखाद्या पोरीला गाठतो. बोलतो. पटलं तर तिला रिक्षात बसवून निघून जातो. अडीचच्या सुमारास पोलीसांच्या शिट्यांचा जोर आणखीन वाढतो. हा शेवटचा इशारा आता प्रत्येकालाच कळतो. आता चौकीच्या कठड्याला रेलून चार-सहा पोलीस. रस्ता, मैदान, बससॉप निर्मनुष्य. रिक्षा, टॅक्सीज, बाईक्स, श्रीमंत मुलांच्या कार्स झर झर डोळ्यापुढून सरकत रहातात.


आता सारं संपलं आहे असं वाटायला लागतं आणि एका गावावरुन दुसर्‍या गावावर ढग सरकावेत तसं जुहु तारा रोड माणसानी भरायला लागतो. आता त्या मुली तिथं जाऊन उभ्या राहतात. पंधराशे रुपयाच्या खाली उतरत नाहीत. सि-प्रिन्सेस होटेलपासून जुहुतारा रोडपर्यंत रिक्षांची प्रदक्षिणा चालू असते. त्यात बसलेल्या पोरी रस्त्यावर उभ्या असलेल्या, बाईक्सवर रेललेल्या, आणि कारच्या काचा खाली सरकाऊन वाट बघत असलेल्या गिर्‍हाईकांशी दोन-दोन शब्द बोलत रहातात. संभाषणाची क्लोजींग लाइन रिक्षावाल्यालाही कळते त्यानुसार तो आपल्या एक्सलिएअटरवरची मुठ फिरवत, आतल्याआत त्यांच्या बोलण्याला गती देत रहातो. त्याच रस्त्यालगत काही मध्यमवयीन माणसं उभी असतात. येणार्‍या जाणार्‍या कारमधुन- बाईकवरुन कुणीतरी त्यांच्याजवळ थांबतं, बोलतं, निघुन जात. त्यांच्याशी बोलल्यावर कळलं, तिथं (आता जिथं बांधकाम चालू आहे) काही छोटेखानी बंगले होते. त्यात पंधरा-वीस पोरी ठेऊन बंदिस्त धंदे चालायचे. ते आता बंद झाल्यामुळे गिर्‍हाईकांचे वांदे होऊ नयेत म्हणून ती माणसं मार्गदर्शन करीत होती. खारला सोळाव्या रस्त्याला शेर्-ए-पंजाब नावाचं हॉटेल आहे तिथं कुठतरी फ्लॅटवर हे लोक गरजवंताला घेऊन जातात. तिथं घेऊन जायचे यांना पन्नास-शंभर रुपये द्यायचे. जमलं तर तिथं बाविसशे रुपये खर्च करुन पोरीसोबत तास घालवायचा.

अर्ध्या किलोमिटरच्या जुहुच्या रस्त्यावर एकच धंद्यातील मालाचा दर पन्नास रुपयापासून बाविसशे रुपयांपर्यंत. साईज इधर्-उधर. मुंबईनं गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांच्या जगण्याची सोय केली आहे, हेच खरं. कुणाच्याही वेळेची आणि भुकेची गाठभेट करुन द्यायला मुंबई सदैव एका पायावर तयार असते.


प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com

1 comment:

मिथिला सुभाष said...

tumhi pahilat te sagle baghtat, pan te lihinyache dhaadas ani ho, style hi khaas ahe. fakta ekach vatata, sansanati likhaanat adku naka. Mumbai yachya palikade hi ahe...!