Tuesday, June 22, 2010

मदनपुरा

पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जून-२०१०

"गांडू, अपनी मा चुदा रहा है क्या?", कितनी बार तेरेको बोला की कपडे को हात मत लगा, फिर भी सुनता नही है साला. भैंचोत. झटापटीचे शब्द कानावर आले आणि मागे वळून पाहिलं. तर एका फळं विकणारा पोरगा शिरा पराठा विकणार्‍या पोराची कॉलर धरुन त्याच्या कानाखाली खेचण्याच्या तयारीत होता. आजू-बाजूचे चार-सहा जण गोळा झाले आणि ते दोघं आपापल्या धंद्यावर जाऊन बसले.




भांडणाचं कारण साधं होतं. एकमेकांना लगडून गाडया लाऊन बसलेले हे धंदेवाले. शिरा पराठा विकणार्‍या पोरानं हाताला तेल लागलं ते पुसण्यासाठी फळवाल्याच्या धंद्यावरचा फडका वापरला होता. त्यामुळं चिडून जाऊन त्यानं त्याच्यावर हात उगारला होता. क्षणभर असं वाटलं ते एकमेकांचा जीव घेतील. पण पाच-दहा मिनिटातच ते नंतर पुन्हा काहीच न घडल्यासारखे शांत. आपापल्या गिर्‍हाइकात गढून गेले.



रात्री साडेबाराची वेळ. मदनपुरा. नागपाडा जंक्शनजवळ रात्रभर जागा असलेला हा इलाका. खाण्यापिण्याच्या स्टॉलनं सजलेला. रंगारंग लाईटसचा उजेड. वीस-बावीस वर्षांच्या तरुण पोरांची तोबा गर्दी. हलचल. गडबड. गोंधळ. मेणकापडाच्या छपरांनी झाकलेले छोटे छोटे स्टॉल्स. पावसाची चिकचिक. पायात लुडबुडणारा चिखल. रस्त्यावरच्या डबक्यात साचलेलं गढूळ पाणी. बकर्‍या, गुरा-वासरांची चरण्यासाठीची धडपड. बाईक्स, टॅक्सीची ये-जा. आणि हातगाडया, दुकानाच्या पायर्‍यांवर लवंडलेली माणसं.



झियाउद्दीन बुखारी चौकापासून बाबा सरवर चौका पर्यंत पसरलेला लांबचलांब साधारणतः अर्ध्या किलोमिटरचा हा रस्ता चोवीस तास गजबजलेलाच असतो. जरीकाम करणारे छोटे-छोटे व्यवसाय. बॅगा, चपला बनवण्याचे कारखाने इथे दिवसरात्र सुरु असतात. मुख्यतः युपी-बिहार वरुन आलेले कारागीर आपली रोजीरोटी इथं कमावतात. कुणीही सोबत आपल्या कुटुंबाला बायकापोराना आणलेलं नसतं. एखादाच या धंद्यातून वर आलेला आणि पुढं शेठ बनलेला आपला कुटुंबकबीला आणतो. तोपर्यंत त्यांच्या पोटापाण्याची सोय लावण्याचं काम हा रस्ता करतो. मौलाना आझाद रोड असं याचं नाव.



इथला कामगार म्हणजे साधारण आठ-दहा ते विस-पंचविशीतला तरुण वर्ग. घामानं मळकट कळकट झालेले कपडे. पायात रबरी-प्लॅस्टीकच्या चपला. वर भोकाभोकांची बनीयन किंवा टिशर्ट. बर्‍याचजणांच्या डोक्यावर मुसलमानी जाळीदार गोल टोपी. हातात सिगरेट-वीडी नाहीतर मोबाईल. वयस्कर कामगारांच्या कमरेवर चौकटची लुंगी, वर बनीयान किंवा कुर्ता. जुन्या जाणत्या अनुभवी धंदेवाल्याच्या अंगावर पांढरेशुभ्र झब्बे-लेंगे.



मोकाट बकरे, वासरं केळ्यांच्या सालीवर, कागदांवर ताव मारीत होती. कोंबडयांची हाडं म्हणजे कुत्र्यांसाठी मेजवानीच. अधुनमधुन पावसाची सर यायची आणि ती दुकानांच्या वळचणीला घुसायची. मधेच झोपलेल्यापैकी कुणीतरी झोपमोड झाली म्हणून त्यांना शिवी हासडत उठायचा. पुन्हा मुकाट ती आपला रस्ता बदलायची. रात्रभर ही मुकी जनावर इकडून तिकडे फिरत राहतात.



अधुनमधुन बाटल्यांची किणकीण ऐकायला येते. ती खुण असते मॉलीशवाल्याची. दारोदार कपबशी विकणारे ज्यापध्दतीनं आपल्या कपबशीचा आवाज करतात. तसाच तो वाटतो. चिराबाजार, मरीनलाईन्स, कामाठीपुरा ते मदनपुरा अशी पायपीट करीत ते मॉलीशवाले आपलं गिर्‍हाईक शोधत फिरत असतात. हाफ कॉर्टर (मराठी माणसाला ती 'चपटी' या नावानं परिचीत आहे) साईझची एक खोबरेल तेलाची आणि दुसरी राईच्या तेलाची अश्या दोन बाटल्यांच्या भांडवलावर कुणीही रात्रभर अडीचशे तिनशेचा धंदा करतो. २५ वर्षाचा अमित इथे गेल्या चार वर्षा पासून हा धंदा करतो. माहीमला राहतो. रात्री आठच्या दरम्यान तो इथे पोचतो. आणि रात्रभर मॉलीशचा धंदा करतो. एवढी मेहनत करुन एखादया गुजराती भाभीचं आमंत्रण म्हणजे दिवाळी. पैसेही चांगले मिळतात आणि टिंबटिबही, असं तो म्हणाला. वेश्याही त्यांच्याकडून मॉलीश करुन घेतात. पण पैसे देत नाहीत. शिव्या देतात. ओळख झाल्यावर फुकट अंग दाबून घेतात. पण त्याला इलाज नसतो. अमित या धंद्यात चांगला मुरलेला दिसला.



नर्गीस बुरखा, ए१ मुस्तफा ज्युस सेंटर, शबरी बेकरी, बिसमिल्लाह रेस्टोरंट, नॅशनल हॉटेल, मामू फिटींग्ज, समुंदर, नॅशनल हॉटेल्स यासारख्या दुकानांवर खास टिपिकल पाटया इथे दिसतात. अधेमध्ये उर्दु-हिंदीतले पोस्टर्स, स्थानीक नेत्यांची पोस्टर्स आपले लक्ष वेधुन घेतात. मशीदीतही रात्री उशीरापर्यंत लोकांची ये-जा चालू होती.



डॉ. मोहम्मद रफीक या नावानं इथला दवाखाना रात्री उशीरापर्यंत खुला होता. त्या दवाखान्यावरच बंद करण्याची अधिकृत वेळ रात्री अडीचची होती. त्यानंतरही माणसं बाहेरच्या बाकडयांवर बसून होती. दवाखाना अर्थातच नोंदणीकृत (रजिस्टर्ड) आहे. त्यावर आय-३३७९३ असा नंबर आहे. डॉक्टर एम.डी. आहेत पुढे कंसात ए.एल.टी अशी इंग्रजीत अक्षरं लिहिलेली आहेत. त्यानंतर बी.यु.एम.एस., सी.सी.एच. अशी अक्षरंही आहेत. त्यामुळे डॉक्टर भरपूर काही शिकलेला आहे असा भास होत राहतो. इंग्रजी अल्फाबेटसचा इतका अर्थशुन्य तरीही अर्थपुर्ण उपयोग दुसरा कुठेही पहायला मिळणार नाही. चौकशीत लक्षात आलं की इथं येणार्‍या तरुणांचे आजार सर्दी, ताप-खोकल्याचे असतातच पण बहुतेक करुन गुप्तांगाचे जास्त असतात.



इथुन पाचच मिनिटाच्या अंतरावर कामाठीपुरा सुरु होतो. कामातून वेळ मिळाला की तिथं विरंगुळयासाठी जाणारे असतात. तिथुनच काहीजण असे कमरेखालचे रोग घेऊन आलेले असतात. पाच-दहा मिनिटांच्या अंतराने त्या रस्त्यावर वळणार्‍या चार-पाच जणांचे घोळके दिसतात. बाकी दिवसरात्र कोंदट जागेत काम करुन, त्याच त्याच कपडयात वावरुन, घामाचे कपडे तसेच अंगावर वाळगून, आंघोळीचा पत्ता नाही, स्वच्छतेचा मागमूसही नाही यामुळे बर्‍याच जणांना चामडयाचे आजार झालेले असतात. ती सगळी तरुण पोरं या डॉक्टराच्या टार्गेटवर असतात. भगंदर, बवासीर, मुळव्याद च्या इलाजाच्या एका डॉक्टरचं क्लिनीकही याच भागात दिसलं. त्याचीही चलती असावी.



खाणं-खिलवणं हे या गल्लीचं वैशिष्टय. चरचणार्‍या तेलाचा, डालडयाचा खमंग वास वातावरणात भरुन राहिलेला असतो.. चिकन बिर्याणीचा घमघमाट. लालेलाल दगडी निखार्‍यावर भाजलं जाणारं सिख कबाब- चिकन तंदुरी, बुर्जी पाव, भगव्या रंगाचा शिरा (हलवा) आणि त्यासोबत मैद्याचा पराठा, बेकरीतली बिस्कीटं, केक, पाव. शानदार रचुन ठेवलेले चिकट मातेरी खजूर, केळ्यांचा ढिग आणि फळांची आरास सोबत पानीकम चहाचा झुरका आपल्याला हैराण करते. नसलेलीही भुक चाळवते.



रात्री झोपेत एकजण मोबाईलवर काहीतरी पहात पडला होता. आम्हाला पाहिल्यावर गडबडीन मोबाईलची स्क्रीन त्यानं फिरवली. विचारलं काय? तर 'कुछ नही', म्हणाला. मी म्हणालो, मेरे पास भी है, चाहिये क्या? तर खुलला. त्यानं सांगीतलं. मेरेको उदर (कामाठी पुर्‍याकडे बोट दाखवून) जाना अच्छा नही लगता. तो अपना टाईमपास मोबाईलपर. त्याच्या मोबाईलमध्ये सेक्सी फिल्म्स होत्या. तो म्हणाला, अभी आदत सी हो गयी है. फिल्म देखे बिना निंद नही आती.



रात्री तीनच्या सुमारास धिम्या गतीनं एक पोलिस व्हॅन कॉलीस येताना दिसली. झरझर मॅसेज फिरला. आणि चालू असलेले बल्ब गेले. भरभरणारे स्टोव्ह गप्प झाले. मोबाईल आणि सीडी प्लेअरवरच्या कवाल्या बंद झाल्या. हातगाड्यांवर पसरलेल्या खाण्याच्या जिन्नसांवर पांघरुणं पडली. गाडयांजवळचे कामगार पांगले. दोन क्षण चिडीचुप. पोलीसांची गाडी पुढे सरकत गेली. आणि पुन्हा दिवे लागले. स्टोव्ह सुरु झाले. पुन्हा गलबला झाला.



मी विचारलं, पुलीस को इतना क्युं डरते हो? हप्ता नही देते क्या? तर म्हणाले, उनका जितना पगार नही उतनी आमदानी इस रोड से उनको हप्तेसे मिलती है. ऐसे तकलीफ नही देते किसिको. लेकीन उनकी इज्जत रखनी पडती है. एक पन्नाशीतला माणूस पोलीसाला शिव्या द्यायला लागला. तो तिथंच एरियात बफ मशीन चालवतो. म्हणाला, पुलीस की जात हरामी है. उनको कितना भी खिलाव उनकी आदत नही छुटती. लेकीन ये हराम का पैसा है. इसलीये गरीब मजदूरकी हाय उनको लगती है. उनके बालबच्चे देखो. लुले निकलते है. अच्छे निकले तो बेकार, लफंगे निकलेंगे. बीवी बीमार रहेगी. मी विचार केला. कुठं बघायला गेला असेल हा त्या पोलीसांची कौटुंबीक पार्श्वभुमी. पण तो त्याच्या मनातला राग बोलत होता. कदाचीत पोलीसांचं असंच व्हावं असं त्याला वाटत असावं का?



मुंबईतल्या कित्तेक खाऊ गल्यांची कौतुकं मी ऐकली आहेत. पण तिथं पोटापेक्षा जिभेचेच चोचले जास्त पुरवले जातात. इथलां खाउ हा कष्ट करणार्‍या माणसासाठी आहे. रात्री फक्त पन्नास ग्रॅम शिरा-पराठा किंवा दोन केळ्यांच्या वर पाणी पिऊन झोपणार्‍या माणसाचं जेवण मला पुर्णब्रम्हापेक्षाही ग्रेट वाटलं.



प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com

Monday, June 14, 2010

अंदाज म्हणाला चुकलो...!!!

पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # जून-२०१०


अंदाज हा माणसाच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. माणसाच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं याना धीर देण्याचं काम अंदाज करतो. अंदाजावर आंधळा चालतो, शेतकरी धान्य पेरतो, व्यावसाईक पैसा फेकतो, जुगारी बोली लावतो आणि सर्वसामान्य माणूस आपलं आयुष्य ढकलत असतो. अंदाजाच्या आधारावर माणसाचं सगळं जगणं उभ असतं. माणसाच्या भविष्यातील प्रत्येक कृतीचा आधार पुन्हा अंदाजच असतो. अंदाजाशिवाय माणूस शुन्य आहे. अंदाजानं चुकू नये नेहमीच बरोबर आणि वेळेवर यावं असं आपल्याला वाटतं ते याचसाठी.



अंदाज हा काही हवेत बांधायचा इमला नव्हे. त्याला काही घटनांची, संदर्भांची साथ असते. इतिहासाची जोड असते. आणि एकाच घटनेविषयी जेव्हा एकापेक्षा अनेकजण एकाच पातळीवर येऊन एकसारखा अंदाज व्यक्त करतात तेव्हा त्याला एका अर्थानं समाजाची मान्यता असते. अणि अनेक अर्थानं तो अंदाज ती त्या समाजाची मागणीही असते.



हे अशासाठी, की याआधी प्रत्येक वेळी मराठी माणसाचा अंदाज चुकला आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीची प्रक्रीया इतकी जिवंत होती की त्यावेळी वाटले होते. आता मराठी माणसाचे, मराठी भाषेचे राज्य येणार आणि मराठी माणसाचे भले होणार. त्याला कारणेही तशीच होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातील नेते खर्‍या अर्थाने सर्वसामान्यांचे प्रतिनीधी होते. एस.एम., डांगे, ठाकरे, अत्रे या नेत्यांचे आर्थीक, सामाजीक, सांस्कृतीक जीवन सर्वसामान्याच्याच पंक्तीतले होते, सर्वसामान्य माणसाच्या घरातल्या अडचणी त्यांच्याही घरात होत्या. त्यांच्या व्यक्त्तीगत इच्छा आकांक्षा कवडीमोलाच्या होत्या. सार्वजनीक जीवन उघडया पुस्तकासारखे होते.



मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला तर मराठी माणसाचं नक्की भलं होणार असा अंदाज होता. लढयाचं सुत्रही तेच होतं. १ मे १९६० साली संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला. पण त्यामुळे मराठी माणसाच्या आयुष्यात काहीही बदल झाला नाही. मुंबईचा भुगोल आहे तसाच राहिला. इतिहासाच्या पानात संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाची नोंद झाली. नागरीक शास्त्र नेहमीच काळानुरुप आपलं स्वरुप बदलत राहतं. फक्त यानिमित्ताने मराठी माणसाला साजरा करायला आणखी एक दिवस मिळाला इतकंच. लढयातले नेते वयानं थकले. काही गेले. सगळेच संदर्भ बदलले. सर्वसामान्य माणसाचा चेहरा फक्त लढतानाच दिसतो. इतरवेळी तो आपल्या पोटापाण्याच्या, घरादाराच्या व्यापात असतो. तसं यावे़ळीही झालं. पुढचे चालक-वाहक बदलले. त्यांनी आपले मार्ग आपल्या सोईनुसार बदलून घेतले. खादी-कुर्त्यातलं, फाटक्या चपलेतलं समाजकारण मागे पडलं. धोतरांचं, सफेद कपडयातलं, गांधी टोपीचं राजकारण सुरु झालं. सत्तेच्या राजकारणात मराठी माणसाचं भलं करायचं राहुन गेलं. यावेळीही अंदाज चुकला.



पुढे १९६६ साली शिवसेना जन्माला आली. मराठी माणसाला पुन्हा हुरुप आला. आता आपलं नक्की भलं होणार असं वाटलं. आपले रोजगार चोरतात म्हणून दाक्षिणात्यांवर राग निघाला. काही प्रमाणात मराठी माणसाला नोकर्‍या मिळाल्या. वडापावच्या गाडया, झुणका भाकर केंद्र, वर्गणी, वसुली असे छुटुरफुटुर धंदे सुरु झाले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेनं मराठी माणसाला सत्तेचं स्वप्नही दाखवलं आणि विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या राजकारणाला मोठा धक्का दिला. शिवसेनेची आंदोलनं, सार्वजनीक बंद मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही लक्षात रहावी अशी झाली. तळागाळात शाखांचा वचक वाढला. कपाळावर केशरी टिळा, वाढलेल्या दाढया-मिश्या, सफेद चपला, सफेद कडक सफारी, क्रमाक्रमानं मोटारसायकली, चार चाकी गाडया, मनगटावर सोनेरी सैलसर घडयाळ, ब्रेसलेट, बोटात चार-सहा अंगठया, गळ्यात दोन-चार चैनी त्याला लटकवलेली वागनखं (यानीच वाघ संपवले असतील काय?), मागेपुढे आठ-दहा चेले-चमचे, तोंडात आवाज कुणाचा आणि गरजेला....जय भवानी-जय शिवाजी.



१९९५ साली भगवा झेंडा विधानसभेवर फडकला. नंतर मराठी सोडून हिंदु सुरु झालं. साडेचार वर्षांच्या सत्तेनं यांना पार बिघडवलं. काही जणांच्या पुढच्या पिढयांची सोय झाली. पण यात मराठी माणसाची कुतरओढ झाली. सत्तेत गेले ते काय बोलून गेले ते विसरले. त्यामुळे मराठी माणसानी त्यांची जागा त्याना दाखवली. यापुढे पुन्हा सत्तेत दिसलात तर याद राखा कामा अशी सक्त ताकीदच मराठी सांनी शिवसेनेला दिली आहे, असे वाटते. शिवसेना नावाचा विश्वास तुटला. मराठी माणसाचा पुन्हा एकदा अंदाज चुकला.



आता याच मराठी माणसाच्या खांद्यावर मदार आहे ती राज ठाकरे यांची. किंवा हेच वाक्य उलट करुनही वाचता येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निमित्ताने मरगळलेला मराठी माणूस पुन्हा एकदा जागा झाला आहे. त्यामुळे जे शिवसेनेला द्यायला अनेक वर्ष लावली ती सत्ता किंवा सत्तेचा काही हिस्सा मराठी माणसानं मनसेच्या हातात पदार्पणातच दिला आहे. मराठी माणसानं ही घाई अश्यासाठी केली असावी की त्याला माहित आहे की आता फारच उशीर झाला आहे. आणि कदाचीत ही शेवटची संधी आहे.



मुंबईत माझं माझं म्हणावं असं मराठी माणसाच्या हातात आता फार कमी शिल्लक आहे. आशा लावावी असं एकच नाव आहे ते म्हणजे राज ठाकरे. त्यामुळे जे उरलं आहे ते टिकवण्यासाठी तुमचाच आधार आहे. गोरगरीब, सर्वसामान्य माणसाबरोबर तरुण, शिक्षित असा एक मोठा वर्ग आपल्या पाठीशी उभा राहतो आहे. तुम्ही काय बोलता, काय करता याकडे प्रत्येक मराठी माणूस डोळे लाऊन बसला आहे. तुम्ही त्यांचे आशास्थान बनला अहात. बलस्थान बनला अहात. ...मेरे पास राज ठाकरे है असं तो गर्वानं म्हणतो आहे. मराठी माणसानं विश्वासानं मान टाकावी असा एक शेवटचा खांदा आहे. मराठी माणसाचा हा विश्वास तुम्ही जपायला हवा.



आज सत्तेत असलेले तेरा आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी मिळालेल्या वेळेत जर आपापल्या विभागाचा स्वर्ग बनवला तर पुढचा उरलेला महाराष्ट्र यांच्या गळ्यात संपुर्ण सत्तेची माळ घालेल. पण जर हेच आता कारणं सागंत बसले तर मराठी माणसांनी यांना कोणती कारणं सांगायची?



गेल्या ५० वर्षाचा महाराष्ट्राचा, मुंबईचा, मराठी माणसाचा इतिहास बघितला तर त्याचा पुन्हा पुन्हा तेजोभंग झाला आहे. यानिमित्ताने त्याने तुमच्यावर टाकलेला विश्वास खरा ठरो. मराठी माणूस आणि आपण यानी एकमेकांसाठी घेतलेली ही शेवटची संधी आहे. तुमच्याविषयी मराठी माणसाने बांधलेला अंदाज अभंग राहो. खरा ठरो. मराठी माणसाच्या राजकारणात आणि सत्तेच्या सारिपाटात पुन्हा पुन्हा चुकलेला हा अंदाज कदाचित उद्या मराठी माणसाला म्हणेल मी हरलो तुम्ही जिंकलात आणि तुमच्यासमोर होत जोडून हाच अंदाज म्हणेल साहेब माफ करा चुकलो!



प्रवीण धोपट

99672 93550

pravindhopat@gmail.com

Tuesday, June 8, 2010

व्हिटी ते सिएसटी: रात्री १२.४३ नंतर

पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जून-२०१०

रात्री १२.४३ ला पनवेलला जाणारी शेवटची गाडी निघाली की सातही ट्रॅक सुनसान होतात. मागे उरतात त्या फक्त ट्रॅकच्या लांबचलांब ओळी. डीजीटल घडयाळंयातल्या सेकंदांची जलधगती हालचाल. आणि बंद इंडीकेटरच्या कडांवर पेटलेल्या लाल दिव्यांच्या उभ्या माळा. अंधुक प्रकाश. चालू पंखे आणि लक्ष वेधुन घेणार्‍या जाहिराती.



व्हिटी स्टेशनाचं भव्य छत आता आपली नजर वर खेचून घेतं. उंचच उंच नक्षिदार लोखंडी कमानी. काळ्या पाषाणात कोरलेले कसदार खांब. गोल घुमट. भव्य दरवाजे. खांबावर कोरलेल्या पशुपक्षांच्या चेहर्‍याचे आकार. हे बघतांना आपल्याला फक्त इंग्रजाच्या कामाची, कलाकुसरीची आठवण येते. आपोआप आपल्या मुखात त्यांच्यासाठी कौतुकाचे, आभाराचे दोन शब्द आणि आताच्या प्रशासनासाठी दोन शिव्या. त्यानंतर व्हीटी स्टेशनाशी आपलाही संबध तुटतो. आणि आपला प्रवास सुरु होतो छत्रपती शिवाजी टर्मीनसवरुन. जे आपल्याला आपल्यासारखं आहे असं वाटतं.



प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरच्या लाद्या उखडलेल्या आहेत. लाकडांचे, डबराचे,लाकडी घोडयांचे, तुटक्या-फुटक्या सामानाचे ढीग इतस्ततः पडलेले आहेत. नवीन लावलेल्या (चिकटवलेल्या) लाद्यावर त्या अधिक चमकाव्या म्हणून एकजण पॉलीश मशीन फिरवतो आहे. त्या मशीनचा आवाज आपल्या मस्तकात जातो आहे. सफेद चिखलाचे पाट आपलीच आपल्यासाठी वाट काढताहेत. त्याचे ओघळ प्लॅटफॉर्म वरुन सरळ ट्रॅकवर पडताहेत. रेल्वेतून उतरणारी माणसं त्या ओघळावरुन लटपटताहेत. काही शिताफीनं त्या ओघळावरुन उडया मारुन जाताहेत. गाडया येत आहेत. जात आहेत. माणसं उतरताहेत. चढताहेत. वेळ चालला आहे. चालणार आहे.



प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर असलेल्या सुरक्षा चौकीतून कुणीतरी एखाद-दुसरा एकदोनदा आतबाहेर करतं. इकडेतिकडे बघुन परत आत. पोलीस उरलेल्यांना पळवायच्या मागे. पोलीसाच्या हातातला दांडा उगारुन मागे जातो त्यासरशी गुढग्यात जरासा वाकलेला कुणीही दुसर्‍या क्षणाला सटकलेला असतो. एक वेडसर बाई पोलिसाच्या अंगाशी झटत रहाते. दांडा उगारल्यावरही ती हटत नाही. हसत- बडबडत राहते. तिथं आधिच ठरल्यासारखी एक महिला पोलिस पुढे येते आणि आता तीच बाई तिला बघुन सरळ चालायला लागते. थेट बाहेरचा रस्ता धरते.



रात्री कुणालाही प्लॅटफॉर्मवर वस्ती करायला थांबायला बंदी असते. तरीही प्लॅटफॉर्मचे सगळेच दरवाजे बंद होत नाहीत. शेवटाची ट्रेन गेल्यावरही काहीवेळ दोन स्टॉल सुरु असतात. रिफ्रेश नावाच्या हॉटेलात आवराआवर चालू असते. पोलिस कक्षात दोन-चार पोलीस गप्पा छाटत बसलेले असतात. माणसं इकडून तिकडे करत राहतात. पोलिसातले काहीजण नकळत आल्या-गेल्यावर लक्ष ठेवतात. विपरीत काही घडण्याची शक्यता मावळते. कोपर्‍यावरची मुतारी रात्रभर उघडी असते. बंद असती तरी फरक पडला नसता. स्टेशनच्या पच्छिमेला अनेक ठिकाणी छोटया-छोटया कोपर्‍यात धारेचा आवाज ऐकू येत राहतो. उजेड मिसळलेल्या काळोखातही मुताचा वास आपल्याला ऍलर्ट करीत राहतो.



आता हार्बर- मध्य रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाडया जिथुन सुटतात तिथंल्या मोलळ्या जागेत माणसं आपल्या सामानासह स्थिरावतात. बायका-पोरं-सामानाचा गलका झालेला असतो. लांबरुद मोकळ्या जागेत किमान दोन-अडीच हजार माणसं असावीत. कुणाला बाहेरगावी जाणार्‍या रात्रीच्या गाडया पकडायच्या असतात. कुणी कुणाला सोडायला आलेले असतात. तर कुणी येणार्‍याची वाट पहात असतात.



मेन लाईनच्या प्रवेश दारावरच चौकशीची खिडकी आहे. खिडकीचा व्यास दहा बाय दहा इंचाचा असावा त्यात आळीपाळीनं किंवा कसंही विसेक माणसं भांबावल्यासारखी काहीही विचारीत असतात आणि आत बसलेला त्याना शांतपणे उत्तरे देत रहातो. कुणाच्या प्रश्नाचे उत्तर कोणते हे ज्याने त्याने समजून घ्यावे.



मागच्या बाजुने टॅक्सीना आत यायला रस्ता आहे. टॅक्सी तडक आत आल्यावर तिथे ट्रॅफीक पोलिस असतात. ते टॅक्सीला मार्ग दाखवतात. जो टॅक्सीचालकांना अधिच माहित असतो. पण डयुटी म्हणजे डयुटी. सामानाच्या बॅगा, खोकी, माणसं जिथुन आतल्या लॉबीत प्रवेश करतात तिथं ACIL REPISCAN नावांच एक मशीन आहे. त्याच्या घरंगळत्या पटटयावर सामान ठेवलं जाणं अपेक्षीत असतं. पण तिथं ऐछिक असतं. ज्याला सामान ठेवायचं तो ठेवतो. ज्याला नाही, त्याला कुणी विचारीतही नाही. सोईसाठी एन्ट्री आणि एक्झीट साठी वेगवेगळे गेट आहेत. पण वेळेला जे गेट मोकळं आहे तिथुन माणसं पोलिसांच्या समक्ष इकडून तिकडे करीत असतात. साडे-दहा अकरापर्यंत पोलीसांचे घोळके दिसतात. नंतर एखाद-दुसरा. इकडे-तिकडे. ACIL REPISCAN जवळच्या गेटमधून आतबाहेर जाणार्‍या माणसांची मोजदाद होते. वाचले तर दोन गेटवर वेगवेगळे आकडे होते. एकात ५३,३०४ तर एकात ७०. पुन्हा आतबाहेर केलं आता पहिल्या गेटवर एक आकडा वाढला होता. दुसर्‍या गेटवर सत्तरच. आजही सत्तरच असेल.



कॅमेरे जागोजाग दिसतात. दिसणारच. २६ नोव्हे.२००८ चा हल्लाच तसा होता. पण जर माणसांच्या, मशीनच्या परिणामकारक वापराविषयी जर अशी हेळसांड होत असेल तर पुन्हा एखादं अघटीत घडल्यानंतरच त्या कॅमेरात टिपलेली चित्र चॅनेलसाठी फक्त ब्रेकींग न्युजच्या कामी येणार आहेत काय? असा प्रश्न पडतो.



स्टेशनवर जिथेजिथे गेट आहे तिथेतिथे एक चौकोनी प्रवेशदार आहे. त्यातून आत-बाहेर जाताना टूं टूं असा आवाज येतो. आवाजाची मजा वाटते म्हणून एखादा बालबुध्दीचा माणूस पुन्हा पुन्हा आत-बाहेर करतो. त्या चौकोनांचा संबध सुरक्षेशी असावा. पण तिथं रक्षकच हजर नसतो. त्या चौकोनांचा उपयोग फक्त वर्धापन दिन किंवा सत्यनारायणाच्या महापुजेच्या दिवशी बल्बच्या माळा सोडायला होत असावा. रेतीच्या गोण्या रचुन ठेवलेल्या चौकोनात पोलीस बंदुक रोखुन उभे असतात. हे कसाबच्या हल्ल्यानंतर सुचलेलं असावं. एक जागी न हलता-बोलता उभ राहणं ही एक प्रकारची शिक्षाच आहे. ती उभ्या असलेल्याच्या चेहर्‍यावर जाणवते.



रात्री दोन-अडीच नंतर प्रवासी माणसंही पेंगलेली असतात. काही गाढ झोपेत असतात. झोपेत आपलं अंग/ अवयव खाजवणार्‍या किंवा आपलीच लाळ गिळणार्‍या माणसाकडे बघतांना कसंसंच वाटतं. मजाही वाटते. किळसही वाटतो. अधुन मधुन स्पिकरवर होणारी अनाउन्समेंट गर्दीला चाळवते. सगळ्यानाच आपल्या गाडीचं नाव, वेळ माहीत असते. सामानाची उचलापाचल, झोपलेल्याला जागवणं हा एक अनोखा खेळ रात्रभर फरका-फरकाने चालू राहतो.



जवळजवळ प्रत्येक गेटपाशी एक लाल रंगात रंगवलेलं टेबल दिसतं. ते खुर्चीला चिकटलेलं असतं. त्याच्यावर 'सुविधा' द कम्प्लेट फॅमिली शॉप ची जाहीतात असतेच. समर्थ सिक्युरीटी सर्वीस कडूनही होलसेल मध्ये फ्लेक्सचे बॅनर छापून घेतलेले दिसतात. एका बाजूला एक ऍबुंलन्स उभी असते. तिचा ड्रायव्हर कुठे आजुबाजूला दिसत नाही.



रेल्वेच्या आवारात जिथं जिथं जागा मिळेल तिथं पाटया, बॅनर लावलेले आहेत. त्यावरच्या सुचना आपलं मनोरंजन करतात. म्हणजे 'स्वच्छता हे परमेश्वराचे दुसरे नाव आहे', 'स्वच्छतेसाठी रेल्वेला सहकार्य करा'. प्रश्न पडतो 'स्वच्छता' हे कुठल्या देवाचे नाव आहे? कचरा डब्यातून ओसंडत असतो. जो उचलायला माणूस येतो तो पहाटे. तो नुडल्स उचलल्यासारखा कचरा उचलत होता. सकाळ पर्यंत कचर्‍याचा व्यास वाढतच जातो. फुकट पाण्याच्या नळाभोवती पाणी सांडतेच. त्याच्यावर फडका मारायला कुणीही नसतो. माणसं दिवस असो रात्र असो अखंड खातपीत असतात. कचरा साचतच जातो. माणसानी सहकार्य करायचे म्हणजे काय करायचे? 'कार इज नॉट वर्कींग' असं एअरटेलची जाहीरात असलेली चारचाकी खुली मोटारगाडी सामानाची ने-आण करण्यासाठी बाहेर उभी आहे. कुणी अपेक्षा केली आहे असल्या गाडया चालू असण्याची? लाल डगल्याचे हमाल आहेतच की..! 'प्रवासी सुरक्षा हेच आमचे ध्येय','सुरक्षा पडताळनीस मदत करा',आणि 'सुरक्षेला तडजोड नाही' ...हे करायला माणसं जाग्यावर तर असायला हवीत? आणि सुरक्षेच्या बाबतीत सर्वात मह्त्वाचं वाक्य म्हणजे, "स्वयं की सुरक्षा स्वयं के हात" ही सुचना वाचली की सुरक्षेचे सगळे प्रश्न निकालात निघाल्यासारखे वाटतात. पहाटेच्या दरम्यान एक सुरक्षारक्षक गेटवरच्या मशीनमध्येच डोक खुपसुन झोपला होता. एक पोलीस पायात चपला घालून आणि हातात दांडा घेउन फिरत होता. असे कर्मचारी दुश्मन फुटाच्या अंतरावर आल्याशिवाय काय करु शकतात? सगळ्यानाच आतंकदाद्याला मिठी मारायची संधी दरवेळी मिळेल, असं होणार नाही. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत नुसती बॅनरबाजी करण्यापेक्षा सतर्कच रहाणे फायदेशीर ठरावे.



री-फ्रेश नावाचे एक हॉटेल चोवीस तास चालू असते. बाकी सगळ्या गोष्टींबरोबर तिथे दहा रुपयात जनता थाळी मिळते. त्याविषयी काही तक्रार असल्यास एक टोलफ्री नंबरही दिलेला आहे. चेक केला, तर तो चालूही आहे. असा नंबर झुणका भाकर केंद्रासाठीही दिला असता तर ती केंद्र आजही कदाचीत चालू असती. त्याच्याच बाजूला एक मुतारी आहे. मुतारीचा ऑपरेटर जुन्या हिंदी गाण्यांचा शौकीन आहे. पेन ड्राइव्हवर लोड केलेली गाणी तो रिमोट कंन्ट्रोलच्या आधारे बदलत रहातो. स्पिकरच्या आवाजाचा दणकाही मोठा असतो. त्या सुरेल आवाजात इतर आवाज मारला जातो. मुतारीत दोनच संडास आहेत. पाच-सहा माणसं एकाचवेळी एकामागुन एक अशी उभी असतात. लग्नातल्या थाळी सिस्टीमची आठवण होते.



स्टेशनच्या पच्छिमेला मधल्या मोकळ्या आवारात पंधरा-वीस पुरुष-बायका आपल्या पोराबाळांसह, बोचक्यांसह रात्रभर पडलेले होते. तिथंच त्यांच जेवणखाण करणं, मशेर्‍या लावणं, थुंकण, चुळ भरण चालू होतं. दिवसभर फिरुन भांडी विकून कपडा गोळा करायचं काम ते करतात. आणि गोळा केलेले कपडे सकाळी पाच वाजता चिंधी मार्केट मध्ये जाऊन विकतात.



एक चायवाला अण्णा सकाळी चार वाजता गेटवर चहा-सिगरेटी विकत उभा होता. त्या आधी त्याचा भाऊ होता. याच्याकडे धंदा सोपऊन तो स्टेशनात जाऊन झोपला होता. तो वॉचमनची नोकरी संपऊन आला होता. गेली चाळीस वर्ष हे त्यांच काम चालू आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या मागच्या झोपडपट्टीतच तो राहतो.



रात्री अकराच्या सुमारास एक बावीस-तेवीस वर्षांची मुलगी आपल्याच मुडमध्ये चालत स्टेशनच्या मागाच्या बाजुस असलेल्या बसस्टॉपकडे जाताना पाहिली. अंदाज होताच. खात्री नव्हती. कुतुहलानं तिच्यामागनं गेलो. बसस्टॉपचा काळोखा कोपरा धरुन ती उभी राहिली. आळीपाळीनं तिच्याजवळ माणसं जात- येत होती. दोनचार वाक्यानंतर मागं वळत होती. मी ही गेलो. म्हणाली हजार. लॉज का तिनसो. एसी रुम का पाचसो. आता ती गप्प. मी ही. तिनं माझ्या पायापासनं डोक्यापर्यंत नजर मारली. मला कळलं. मीही मागं वळलो. इकडे तिकडे पाहिल्यावर लक्षात आलं. तिच्याच सारख्या त्याच धंद्यातल्या आणखी पाच-सहा जणी. एकीकडे प्रवासी बॅग होती. मला ही तिची बॅगेची आयडीया आवडली. पन्नाशीची असावी. मराठी वाटली पण तेलगू निघाली. तिनं मला तेलगु येतं का असं तेलगुत विचारलं. मी नाही म्हणालो आणि हिंदीत सुरु झालं. तीनं, 'क्या हुआ' असं विचारलं. तिचा रोख मघाच्या मुलीबरोबर मी बोललो होतो त्याच्याकडे होता. तिनं तिची थोडक्यात बदनामी केली. वो लोग कैसा फसाते है सांगीतले. चलो, म्हणाली छेसो. मी विचारलं, लॉजका कितना? तर म्हणाली नही इसमेही सब हो जाएगा. माझ्या मित्राकडे बघुन ती म्हणाली, दोनोका आठसो. मी काहीच बोललो नाही. ती हसली. आणि चार-सहा पावलं दुर जाऊन उभी राहीली.



रात्री दोन वाजेलेले असावेत. दिनशॉ पेटीट गार्डन समोर एक बाई आपल्या तहान्या मुलासह झोपली होती. झिंगलेली होती. तिथं एक घाइघाईत तिच्याच वयाचा पंचविशीतला एक गर्दुल्ला आला. ती बाई कुशीवर होती. त्यानं तिला उताणी केलं. तिच्या पायजम्याची नाडी सैल केली आणि पायजमा गुढग्यापर्यंत खाली खेचला. त्यानं त्याच्या पॅन्टची चैन स्वत:च काढली. पुढची पाच-सात मिनटात काम संपलं. तो उठला. निघुन गेला. त्या बाईनं आपलाच आपण पयजमा वर केला आणि कुशीवर पुन्हा झोपली. पहिल्यासारखी निर्जीव.



पुढे डी.एन रोडवर एक चकाचक मुतारी आहे. इंग्लीश वाटावी अशी. रात्री बंद असते. तिच्या दारासमोर चटई टाकून एक काटकुळा भय्या एका जाडजुड बाईला दाबत बसला होता. ते बघत असताना एका माणसानं हटकलं. क्या देखते हो, असं सुरात विचारलं. कुछ नही. मी म्हणालो. त्याच्या कानाच्या पाळीत हिर्‍याचा खडा चमकत होता. त्यानं गेली दोन-अडीच तास आमच्यावर पाळत ठेवली होती. आणि त्याच्या रेंजमध्ये आल्यावर तो खुश झाला होता. चलो ना...जाओगे क्या?... त्यानं विचारलं. तेव्हा खात्री पटली. तो ही याच धंद्यातला 'माणूस' होता. प्रत्येक शब्दागणीक तो गालातल्या गालात हसत होता. एक बार आओगे तो बार बार आओगे असं आत्मविश्वासानं म्हणाला. बाईमध्ये आणि पुरुषामध्ये (अर्ध्या) काय फरक असतो ते त्यानं सोदाहरण समजाऊन सांगीतलं. त्यान मला विचारलं काय करतो म्हणून मी ही त्याला विचारलं. तर तो लिफ्टमन होता. त्याच बिल्डींगच्या जिन्याखाली तो रात्रीही झोपतो. त्याचं नाव अनील. मुळ दिल्लीचा. थर्माकोलसारखी त्याची गोरी कातडी होती. खाजवली-खरवडली तर पाढंरा भुसा उडाला असता. खुपच खनपटीला आला. म्हणाला देखो तो सही. त्यानं तिथंच बाजुला असलेल्या जिजाऊ लेनमध्ये त्याची झोपायची आणि काम करायची जागा दाखवली. त्याचा नंबरही स्वतःहुन दिला. म्हणाला तुमको नही सही लेकीन दिलवालोंके काम आयेगा.



प्रवीण धोपट
99672 93550

pravindhopat@gmail.com

Thursday, June 3, 2010

हो जाएगा साब...!!!

पुर्वप्रसिध्दी # महाराष्ट्र माझा - संपादक: शिरीष पारकर # जून २०१०




रात्रीचे साडे दहा वाजलेत. दारावरची बेल वाजते. समोर सत्तरीतला म्हातारा. घामानं नखशिखांत भिजला आहे. डोक्यावर पाटी. त्याच्या थरथरत्या देहाकडे पाहतांना अंदाज येत होता, त्या पाटीत तिसेक किलोचं वजन असावं. तो हसत विचारतो, बेटा कलिंगड लोगे क्या? ...मी काहीच बोलत नाही! बोलूही शकत नव्हतो. मी त्याच्या ओघळलेल्या अवताराकडे बघत बसलो. सफेद रंगाचा मळकट कुडता आणि त्याच रंगाचं धोतर. पायात चपला. झिजलेल्या. काळपट रापलेलं शरीर. तिसर्‍या मजल्यापर्यंत तो चढून आला होता. त्याला धाप लागली होती. त्याच्या दोन श्वासामधलं अंतर पार मिटून गेलेलं होतं. आशाळभूतपणे तो माझ्याकडे पहात होता. आणि मी त्याचा चेहर्‍यात माझ्या आजोबांचा चेहरा शोधत होतो. मला कळत होतं, की आत्ता त्याच्याकडचं कलिंगड विकलं जाण्यापेक्षाही त्याला कुणीतरी किंवा मी तरी म्हणायला पाहिजे की, बसा इथं दोन मिनटं पाणी प्या. मग काय ते बोला...



'बहुत मिठा है बेटा' तो पुन्हा बोलला. भानावर आलो. मी म्हणालो, 'नही चाहिये. माफ करना 'तो पुढच्या दारावर गेला. एक एक दरवाजा करीत आल्या पावली निघून गेला. (मनात होतं पण फक्त दयेपोटी मला कलिंगड घ्यायचं नव्हतं. भावनेच्या भरात केलेले व्यवहार फसतात असा माझा अनुभव आहे. त्या अनुभवाचा राग मी त्याच्यावरही काढला होता.)



मी विचार करीत राह्यलो, दिवसभर तो अशीच वणवण करीत किती भटकला असेल? तो आज किती चालला असेल? त्यानं दुपारी काय खाल्लं असेल? किती विनवण्या केल्या असतील? किती याचना केल्या असतील? किती शिव्या खाल्या असतील? आणि किती कलिंगड विकली असतील? कुठल्या मराठी माणसाच्या डोक्यावरची पाटी या भय्यानं हिसकाऊन घेतली असेल? कुणाची रोजी-रोटी छिनली असेल?



त्या भय्याला असं वाटलं नसेल का की, मराठी माणसासारखं संध्याकाळी वेळेवर घरी जावं. गरमागरम चहा घ्यावा. दिवसभराचा राग घरादारावर काढावा. बायकापोरांना शहाणपणा शिकवावा. आजुबाजुचे आपल्यासारखे चार-सहा गोळा करावे. उघडया गच्चीत उघडया अंगाने पत्याचा डाव मांडावा. गरम हवेवर, हापूस आंब्यावर, क्रिकेट, राजकारण, सिनेमा यावरती तोंडसुख घ्यावं. सिरिअल, रिऍलिटी शो यांच्या संगतीत रमाव. सत्संगाला जावं. बाबाबिबांच्या बैठकांना हजेरी लाऊन अध्यात्म समजून घ्यावं. त्यांच्याकडून आपण मेल्यानंतर आपलं काय होणार हे जाणून घ्यावं. पण तो यातलं काहीच करीत नाही. तो काम करीत राहतो. अधिक मेहनत करतो. चार पैसे अधिक मिळवतो.



माझ्या एका मित्राला एका मंत्र्याला पत्र द्यायचं होतं. ते हातानं लिहिलेलं कसं द्यायचं म्हणून तो टायपिस्ट शोधत फिरला. सापडला तो एकदम कंप्युटराइज्ड. म्हणजे सोने पे सुहागा. टायपिस्टही तेज निघाला. खटा-खट पत्र मारुन झाल्यावर, कितना कॉपी असं त्यानं मित्राला विचारलं. आधी वाचायला दे, असं म्हटल्यावर हा गडी भडकला. टाईम नही है. चाहिये तो लेलो...नही तो डिलीट करु क्या? यावर मित्र म्हणाला एका कॉपीचे जादा पैसे घे पण मला वाचायला दे, कुठं काही चुक रहायला नको. असं म्हणाल्यावर हा भाई जास्तच भडकला. आम्हाला काय टायपींग येत नाही काय. उगाच बसतो काय इथं मंत्रालयासमोर. शेवटी टाईप केलेल्या कागदाचे प्रींट आणि पैसे न देता- घेताच विषय संपला. कुतुहल म्हणून त्यानं त्याच्याशीच चौकशी केली तर तो मराठी निघाला.



त्या मराठी माणसाच्या डोक्यात एखाद्या गुजराती-मारवाडी माणसासारखा विचार का आला नसेल? की या जागेत बसायचं मला भाडं द्यावं लागतं. विज, कम्पुटर, इंटरनेट, स्टेशनरी, कम्युनिकेशन साठीही खर्च करावा लागतो. हाताशी माणूस ठेवलेला असतो. त्याच्यासोबत आपलाही मेहनताना असतो. सगळा खर्च भागून काही अधिकचंही उरायला पाहिजे कारण आपण व्यवसाय करतो. आणि सगळ्यात मह्त्वाचं की, आता झाला त्या व्यवहारात 'डिलीट' हे बटण प्रेस करायला जेवढा वेळ लागतो तेवढीच ताकद आणि वेळ 'प्रिंट' हे ही बटन प्रेस करायला लागतो. पण प्रिंट हे बटण दाबल्यामुळे त्याला त्याचे पैसे मिळाले असते. आणि प्रिंट मारायच्या आधी तर त्याने टाईपही केलं होतं. म्हणजे वेळ आणि मेहनत दोनीही खर्च झाले होते. अधिक कॉपीचे अधिक पैसेही द्यायला समोराचा माणूस तयार होता. तरी ही तो असं करत नाही. चिडतो, भडकतो. या वागण्याच्या पध्दतीला "मराठी बाणा" असं म्हणतात.



माझा मित्र ज्ञानेश्वर यानं सांगितलेल्या एकाच दिवशी अनुभवलेल्या या दोनही घटना. काल्पनीक नाहीत. वास्तवावर आधारलेल्या आहेत. या दोनही घटनेतली पात्र नावं बदलून मुंबईत इथे-तिथे भेटतच असतात.



सेवा क्षेत्रात (म्हणजे सर्व्हीस इंडस्ट्री. समाजसेवा नव्हे. जो मराठी माणसाचा अत्यंत आवडीचा पार्टटाईम उद्योग असतो) मोडणारा कोणताही व्यवसाय घ्या. इथं कौशल्याला, वेळेला, शब्दाला अधिक किंमत असते. दिलेल्या शब्दात, दिलेल्या वेळेत दिलेलं काम पुर्ण झालं की कोणताही ग्राहक संतुष्ट होतो. तिथं पैसा ही दुय्यम गोष्ट असते. इथं एकच सेवा पुरवणार्‍या दोन माणसांना भेटा. त्यातला एक मराठी आणि दुसरा अमराठी निवडा. काही ठरावीक साच्यातले शब्द दोघाच्याही मुखातून बाहेर पडतील.



कुठल्याही दुरुस्तीच्या धंद्यातल्या माणसाला भेटा. तो भय्या असेल तर म्हणेल ...हो जायेगा साब. तो तुम्हाला पुर्णपणे विश्वासात घेऊन त्या कामाला सोपं करुन टाकतो. कोणताही पर्याय त्याला मान्य असतो. म्हणजे तुम्ही त्याला पुर्ण कॉन्ट्रक्ट द्या, मटेरिअल आणून द्या, किंवा नुसतीच मजूरी द्या. कामाच्या कुठच्याही पायरीवर तो नेहमी 'तयार' असतो. आपल्यासमोर तो काम सुरु करतो. तो धंद्याचं टायमींग साधतो. ऍडव्हान्स घेतो. पुर्ण पैसे येइपर्यंत तो तुमच्यासमोर रडतो. आणि काम पुर्ण करुन लवकर अश्यासाठी देतो की त्याला पुढचा माणूस, गिर्‍हाईक किंवा कदाचित बकरा शोधायचा असतो. तो गुंतून रहात नाही. रिसर्चच्या भानगडीत तो अजिबात पडत नाही.



याउलट मराठी कारागीर बघा. आधी तो धंद्याच्या जागेवर पहिल्या भेटीत भेटला तर एक लाख. भेटला तर तो आपल्या तोंडावर पहिलं वाक्य फेकतो की, साहेब परवडत नाही. म्हागाई वाढली. धंद्याच्या लायनीत पयल्यासारखी मजा नाही. वैगेरे. तरीही मराठी माणूस म्हणून त्याच्याकडे आपण काम देतो. कामाचे पैसे त्यानं जास्तच सांगीतलेले असतात. आपण ते अश्यासाठी देतो की........ राज ठाकरे! भय्यासारखी तो थुकपटटी लावणार नाही, असं आपल्याला उगाचंच वाटतं. तो काम घेतो पण ते आपल्यासमोरच बाजूला ठेवतो. खोलायला लागेल, बघायला लागेल, दाखवायला लागेल म्हणतो. उद्या या असं सांगतो. चहा पिणार का, विचारतो. आपण साशंक मनाने तिथुन निघतो. त्यानं दिलेल्या वायद्यापेक्षा एक दिवस उशीराच जाउया म्हणून पोहचतो तर त्यानं कामाला हातच लावलेला नसतो. आपल्यासमोर तो धुळ झटकतो आणि आत्मविश्वासाने सांगतो. साहेब उद्या...उद्या....नको नाही तर असं करा...परवा नक्की अगदी हंड्रेड पर्सेंट घेऊन जा.


प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com