<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610</id><updated>2012-02-16T06:37:41.797-08:00</updated><title type='text'>PravinDhopat</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>29</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-8227292234850159914</id><published>2010-09-02T01:36:00.000-07:00</published><updated>2010-09-02T01:37:56.452-07:00</updated><title type='text'>रात्र गणेशोत्सवाची आहे... मराठी माणसा जागा रहा...</title><content type='html'>पुर्वप्रसिध्दी # मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक - शिरीष पारकर # सप्टेंबर २०१०&lt;br /&gt;&lt;br /&gt;टिळक तुमचे महत्त्व फक्त दोन गोष्टींसाठी. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती. मराठी माणसाला तहहयात वर्गणीची सोय करुन गेल्याबद्दल टिळक तुम्हाला धन्यवाद! बाकी, 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही', 'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' आणि 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का' हे तुमचे डायलॉग पाठ व्हायला सोपे म्हणून अजून सर्वांच्या लक्षात आहेत. तुमच्या भरगोस मिश्या आणि पुणेरी पगडी यामुळे तुम्हाला चारचौघात ओळखणे सोपे जाते. गेला बाजार स्वातंत्र्य वैगेरे ठीक आहे पण गणेशोत्सवाची आयडीया ग्रेटच. शिवजयंती ऐवजी शिवसप्ताह करण्याचे तुमच्या डोक्यात कसे आले नाही ? फक्त एका दिवसाच्या जयंतीसाठी प्रायोजक मिळवतांना किती फाटते याची तुम्हाला कल्पना नाही यायची टिळक. तरीही तिथीनुसार आणि तारखेनुसार दोन दोन जयंत्या साजर्‍या करुन आम्ही आमची भागवून घेतो आहोत. तरीही, यासाठी मराठी माणूस तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही आज जर इथे असतात तर एवढया अपराधासाठी आम्ही तुम्हाला पुन्हा मंडालेच्या तुरुंगात पाठवले असते. पण असो. गणेशोत्सवासाठी तरी मराठी माणूस मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही. आता या उत्सवाला मागे-पुढे घडणार्‍या सगळ्याच गोष्टी 'लोकमान्य' झाल्या आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;टिळक, तुम्हाला माहित आहे, श्रावणात आपण घेत नाही. त्यामुळे ओस पडलेल्या बारची अवस्था बघवत नाही. कदाचीत तुमच्या काळात ब्रम्हवृंद तसले अभक्ष भक्षण करीत नसावेत. आता आम्ही सगळेच सगळ्या बाबतीत समता, बंधुभाव पाळतो. तरीही जी चैतन्यावस्था असते तिला गौरी पुजनानंतर सुरुवात होईल. त्याची आम्ही चातकासारखी वाट पाहत आहोत. थोडी 'ढकलल्या'नंतर सुर-तालाला जी धार येते ती वर्णनातीत असते. ढोल-ताश्याच्या गजरात किंवा बेंजोच्या तालावर गणपतीच्या पुढे-मागे जे आणि जश्याप्रकारे आम्ही नाचतो ते तुम्ही बघितलेत तर टिळक तुम्हीही तोंडात बोटे घातली असतीत. त्यावेळी आम्ही तुम्हालाच काय पण आम्हालाही विसरतो. तुम्हीही गणेशोत्सवामागचा हेतू विसरुन जाल. पण तो मुद्दा नाही. आता आमचाही गणेशोत्सव साजरा करण्याचा एक पॅटर्न तयार झाला आहे. आता तुम्हीच काय ब्रम्हदेवाचे पप्पा आले तरी तो आम्ही बदलणार नाही. 'गणेशोत्सव साजरा करणे हा आमचा जन्मसिध्द हक्क आहे तो आम्ही बजावणारच'. 'तुमचे डोके ठिकाणावर राहो न राहो.' &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रस्त्यारस्त्यावर मुर्त्यांचे बाजार भरले आहेत. गणपतीबाप्पा भक्तांची वाट पहात आहेत. प्रत्येक गणेशमुर्तीच्या गळ्यात, हातात त्यांच्या किमतींचे टॅग लटकवलेले आहेत. किंमतीवरुन घासाघीस चालू आहे. वजन, उंची, रुप, रंगाची चाचपणी करुन माल पसंत केला जातो आहे. सरत्या श्रावणाच्या मौसमात गणेशोत्सवाचा वारा सुटला आहे. मराठी माणूस पेटला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गणपतीची चाहुल लागली की आरत्यांची फुकट पुस्तकं घरात यायला लागतात. कुठे पेपराबरोबर कुणी मोदकाबरोबर तर कुणी आणि कश्या कश्या बरोबर. पुस्तकं साचत जातात. पुस्तक समोर धरलं तरीही आम्ही 'सुखकरता दुख'करता'च म्हणतो. पण इतकी वर्ष असाच सराव झाल्यामुळे गणपतीलाही त्याची सवय झाली असावी. आणि हो, प्रत्येक वेळेला आरत्या संपता संपताना 'घालीन लोटांगण' हा शब्द कानावर आला की सुटल्यासारखं वाटतं. पण त्यानंतर 'अन्याय माझे...' वैगेरे सुरु झालं आणि कॉंपिटिशनला एकासएक भेटले की बघायला नको. काहीजण यावर तास तास घालवतात. आरतीचा सुर इतका कानात आणि मनात बसलाय की आरतीतल्या त्या त्या जागा आल्या की नुसतं त्या त्या लयीत ओरडलं तरी भवसागर पार केल्यासारखं वाटतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या दिवसात सार्वजनीक मंडळं, त्यांचे अध्यक्ष, त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या छातीवरचे बिल्ले यांचा रुबाब बघण्यासारखा असतो. चिल्लर चिल्लर माणसं या दिवसात कडक नोटेसारखी फडफडत असतात. झब्बा लेंगा घालायचा आणि इकडून तिकडून फिरत बसायचं एवढंच काम. पण तरीही त्या कामात ऐट असते. मंडळात पैसा खाण्याचा मान सगळ्यानाच मिळतो असं नाही. पण उमेदवारीच्या काळात खुलेआम मिरवण्याचा चान्सही काही कमी नाही. इकडून तिकडे कुणा कुणाला आवाज देण्यातही सुख असतं. रांगेला वळण लावायचं, भाविकांवर उगाचच आब दाखवायचा. कुणाला तिर्थ-प्रसाद द्यायचा. कुणाला लाईनीत घुसवायचं. कुणाला लाईनीतून काढून गाभार्‍यात बसवायचं. असा बिनपैशाचा तोरा मिरवायला मिळाला की मराठी माणसाला धन्य वाटतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मंडप, डेकोरेशन, लाईटींग, देखावे, स्पिकर, सांस्कृतीक कार्यक्रम यांची व्यवस्था लावण्यात अध्यक्ष गर्क आहेत. त्यात काही अधिक उणं होता कामा नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. कडेकोट बंदोबस्तातही कुठे कुठे हात मारता येईल. कुणाकुणाची पत्ती काटता येईल याचं प्लॅनींग चालू आहे. गेल्या वर्षिचा जमाखर्च मनासारखा जमला आहे. पुरावा म्हणून त्याची पुस्तकं छापून आली आहेत. बाकी स्थानीक नागरिकांसाठी संगीत खुर्ची, बायकांसाठी गाढवाला शेपूट लावणे सारख्या स्पर्धा आयोजण्याचे घाटत आहे, त्यांचे बक्षिस समारंभ, सत्कार समारंभ यासाठी मंडळांतर्गत विशेष समिती असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;उरलेला मराठी माणूस भावीक होऊन रात्रभर फिरत असतो. काहींच्या श्रध्दा फारच जहाल असतात ते अनवाणी म्हणजे चप्पल-बूट हातात घेऊन फिरत असतात. यांना डेकोरेशन, देखावे बघण्यातच जास्त रस असतो. त्यासाठी तो अख्खा गाव-मुंबई पालथी घालतो. अशा भाविकांच्या सेवेसाठी फुकट पचपचित रसना जागोजाग असतोच. चुकून चहा. गणपतीचा प्रसाद म्हणजे सफेत फुटाणे. नंतर नंतर तो तेच तेच खाऊन-पिऊन कंटाळतो. पण हा नियतीनेच मराठी माणसासाठी दिलेला प्रसाद आहे. त्यानं यापेक्षा वेगळी अपेक्षा करु नये.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुर्वी रात्रभर भरगच्च कार्यक्रम असायचे. काहीच नाही तर रात्रभर भजनं कुटत बसायची. पण आता रात्री दहा नंतर सरकारने स्पिकरवरच बंदी आणल्यामुळे आणि पोलीस एवढं काम तरी इमाने इतबारे करीत असल्यामुळे मराठी माणसाची 'जान'च हरवल्यासारखी झाली आहे. आणि आपण जे जे करतो आहे ते ते दुसर्‍याला कळल्याशिवाय मराठी माणसाला चैनच पडत नाही. शांततेने काही करण्याचा त्याचा स्वभावच नाही. त्यामुळे रात्र सामसूम. कदाचित मनातल्या मनात गणपतीबाप्पा सुप्रीम कोर्टाचे आभार मानत असेल. पण गणपती तर जागवला पाहिजे. त्याच्या समोरची वात जळत ठेवण्याच्या नावावर काही लोकांना पत्त्याचा डाव मांडता येतो. पत्त्याला जुगार म्हणणे या पवित्र दिवसात तरी बरे दिसत नाही. पण अनेक लोक या दिवसात देशोधडीला लागतात. नव्या खिलाडींची एन्ट्री याच दिवसात होते. 'ज्योत से ज्योत जगाते चलो' या धर्तीवर हा प्रकार दिवसेंदिवस वाढतोच आहे. वेळ घालवण्यासाठी सुरु झालेला हा डाव आयुष्य वाया कधी घालवतो कळत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी विसर्जन. म्हणजे एक प्रकारचं दु:खच. ते ज्या ज्या प्रकारे व्यक्त करता येईल ते केलं जातं. दु:ख पिण्यानं हलकं होतं हे पुरातन सत्य आहे. त्यामुळे ते इथंही असतंच. सजवलेल्या ट्रकावर गणपती. अंगाखांद्यावर विरघळलेला गुलालाचा घाम, डोक्याला भगवी पटटी, नाशिक बाजा किंवा पुना ढोलाचा खणखणाट, तो बजेट बाहेर असल्यास बेंजो किंवा नुसताच स्पिकर. त्या तालावर थिरकणारी गर्दी. पोटात कंट्री, कॉर्टर किंवा चपटी आणि मुखात गणपती बाप्पा मोरया. बघणार्‍याच्या डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय रहात नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;विसर्जनाला दरवर्षी पहाट होते. पुढल्यावर्षी लवकर या म्हणत दुसरा दिवस उजाडतो. दुसर्‍या दिवशी सकाळी किनार्‍यावर गणेशमुर्तींचे भग्नावशेष इतस्ततः विखरुन पडलेले असतात. त्याच अवयवांसारखा मराठी माणूसही उत्सवाची धुंदी उतरल्यावर सैरभर होतो. ते विखुरलेले तुटलेले अवयव संदर्भहीन असतात. त्यात देवत्व किंवा सत्त्व नसतं असं त्या क्षेत्रातले अधिकारी मानतात. भक्ताच्या मनातही त्याला काही किंमत नसते, तसं मराठी माणसाचंही! गेल्या दहा दिवसाचा रंग उतरवून मराठी माणूस डोळे चोळीत उठतो. सुकी भाजी चपातीत गुंडाळून खिशात नाहीतर रंग उडालेल्या प्लास्टीकच्या पिशवीत कोंबतो आणि नऊ सत्राच्या ट्रेन मध्ये घुसतो. ट्रेन प्लॅटफॉर्म सोडते आणि गर्दीचाच गजर होतो. गणपती बाप्पा ss मोरया sss , पुढल्या वर्षी ss लवकर या sss&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-8227292234850159914?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/8227292234850159914/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=8227292234850159914' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/8227292234850159914'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/8227292234850159914'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/09/blog-post_02.html' title='रात्र गणेशोत्सवाची आहे... मराठी माणसा जागा रहा...'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-8229793662438918268</id><published>2010-09-02T01:29:00.000-07:00</published><updated>2010-09-02T01:29:53.943-07:00</updated><title type='text'>सेक्सी छक्के</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- आपलं महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # सप्टेंबर-२०१०&lt;br /&gt;&lt;br /&gt;लालेलाल लिप्स्टीक, भडक मेकअप, कडक हावभाव आणि ढंगदार अदा. गोरेगावच्या चेकनाक्यावरचं रात्री आठ वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत हे चित्र नजर खेचून घेतं. प्रवासात असू तर पुढं जाणार्‍या वहानासोबत माना आपोआप मागे मागे वळत राहतात. चालत असू तर पाय आपोआप थबकतात. बोलत असू तर शब्द जिथल्या तिथे थिजतात. कुतूहल जागं होतं आणि जाणारा येणारा प्रत्येकजण तिथं मनातल्या मनात का होईना क्षणभर तरी रेंगाळतो. पुढं ज्याची त्याची कुवत, हिंमत, काळ, काम आणि वेळ. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गोरेगाव आरे चेकनाका. हायवेवर गाडयांची ये जा. आणि रस्त्यालगतच्या झाडीत उभ्या असलेल्या तृतीयपंथीचे इशारे. मधुनच भरदाव गाडयांना ब्रेक लागतो. साईडचा सिग्नल देत गाडया डाव्या बाजूला पार्क होतात. लघवीच्या बहाण्याने जो तो वळून वळून मागे बघतो. आणि हिंमत करुन थोडा मागे मागे सरकतो. उभ्या तृतीयपंथीतला कुणीतरी एक पुढं होऊन व्यवहार समजावतो. पटला तर झाडीत आत नेतो. पंधरा-वीस मिनीटांच्या अंतराने कुणीतरी इकडे-तिकडे पहात बाहेर. पुन्हा पुढच्या रस्त्याला. अडकलेल्या गाण्याचे तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा ऐकू यावेत तसं चित्र. रात्रभर. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री अकरानंतर बसेसची ये जा तशी कमीच. पण बसस्टॉपवर रेंगाळणार्‍यांची संख्या कमी होत नाही. कुणी सिगरेटच्या बहाण्याने, कुणी पाणीपुरीच्या बहाण्याने बिचकत विचकत जवळ जाऊन झाडीत काय दिसतंय का याचा अंदाज घेत राहतो. पण काळोख आणि घनदाट झाडी दाद देत नाही. मग सुरु होते पाणीपुरी वाल्या भैया जवळ चौकशी. तो ही कॅसेट वाजवल्यासारखा सांगत राहतो. ज्याला एवढंच ज्ञान पुरेसं होतं तो निघतो. त्याच बसस्टॉपच्या आजुबाजुला कॉलसेंटर वाल्या गाडयाही थांबतात. ज्याची वेळ भरते तो निघुन जातो बाकीचे थांबून राहतात डोळयांचे लाड पुरवीत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईतल्या रिक्षा-टॅक्सीवाल्यांना मुंबईचं विशेषतः रात्रीच्या मुंबईचं जे ज्ञान असतं ते त्याला तोड नाही. अनेकांना इथला व्यवहार माहीती असतो. काही रिक्षावाले बसस्टॉपच्या पुढे रिक्षा उभ्या करुन सराईताप्रमाणे बिनधास्त उभ्या कुणाच्या सोबतीनें आत जातात. बाहेत येतात. रिक्षात ठेवलेली पाण्याची बाटली हातावर, तोंडावर रिकामी करतात. कुणी पॅसेंजर मिळालाच तर त्याच्यासोबत पुढे नाहीतर स्टार्टर मारुन एकटाच तृप्त रिकामा होऊन जोगेश्वरीच्या दिशेने. त्यातलाच एकजण असाच बाहेर आल्यावर त्याला विचारलं, लुटेते नही? तर म्हणाला 'बिल्कुल नही, सबका एकही भाव रहता है. जादा कुछ रहेगा तो जादा पैसा'. जादा मतलब ? फ्रेंच करना है तो डबल... &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या डोक्यात खटाखट टाळ्या मारुन घाबरवणारे तृतीयपंथी होते. आडदांड, झगझगीत साडया. गालावर तुरळक दाढीचे खुंट वाढलेले किंवा गुळगुळीत दाढी करुनही चेहर्‍यावर उरलेल्या दाढीमिश्यांची जागा ओळखता येऊ शकणारे. पैसे मागणारे. शिव्या देणारे. आशीर्वाद देणारे. रागाला आले की नेसणं वर करु का असे विचारणारे. सिग्नलवर, रेल्वेत भीख मागणारे. अंगचटीला येतांना किळस वाटावी असे पुरषी छक्के. पण इथलं चित्र याच्या शतपटीनं उलटं. बारीक चणीचे. अपवाद वगळता सगळेच गोरेपान. पातळ पोटाचे. भरगच्च छातीचे. पंधरा ते पंचविशीतल्या मुलींसारखे बाकदार, नक्षिदार. क्षणभर या मुलीच असाव्यात अशी शंका येते. वॅक्सींग, आयब्रो, नेलपॉलीश, सेंट, मनगटावर सोनेरी घडयाळं, एखाददुसरी कचकडयांची बांगडी. कानात डौलदार डूल, उंच टाचांच्या चपला, उत्तम साज आणि नवथर अंदाज. एखाद्या नखरेल तरुणीला लाजवेल अशी अदा. ना अधिक ना उणं. सगळे रंग-ढंग मापासमाप, जिथल्यातिथे. कपडे कमीच. मीडी, नाहीतर फ्रॉक्स. चुकुन साडी किंवा पंजाबी ड्रेस. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ब्रीज वरुन जाणारे उघडया ट्रक- टेंपोतले माहितगार खुलेआप आवाज देतात. ' ए मामू ...' खालूनही त्याला लागलीच प्रतिसाद जातो' ए भडवे...'. तास-दिडतासानी असा सादप्रतिसाद चालू राहतो. रस्त्यावरुन छत्रीचा आडोसा करुन कुणी-कुणी दबकत जायला लागतो. ना धड त्याला त्यांच्याकडे बघण्याची हिंमत होत ना विचारण्याची. तेव्हा दुरुनच त्याला एखाद्या मालाची माहीती सांगावी तसं, 'आजा आरामसे करुंगी, क्या करना है ? आगेसे? पिछेसे? आजा... मुह मे भी लुंगी. पचास रुपया. आजा ये छोरा... ये राजा... ये मेरी जान... तरीही तो पुढेच चालला तर मागून कचकचीत शिवी आणि सोबतीला टाळी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पोलीसांची गाडी धिम्या गतीनं सिग्नल ओलांडते आणि यांची पळापळ होते. मागच्या झाडीत चिडीचुप आणि सामसुम. आता इथं काहीच घडत नसल्यासारखं. श्वास रोखुन धरल्यासारखी. आत गेलेली गिर्‍हाईकं आतल्याआत. आणि बाहेर पोलीसांची गाडी साईडचे पिवळे सिग्नल सुरु करुन पंधरावीस मिनीटांसाठी उभी. पोलीसांची ठरलेली गिर्‍हाईक आत दडून बसलेली असतानाही बाहेर उलटया दिशेनं गाडी हाकणारे रिक्षावाले, बाईक्सवाले, गाडीवान आपसूक गळाला लागतात. वाघ मारायला गेलेल्या शिकार्‍याच्या जाळ्यात ससेही अडकतात तसं होतं. पोलीस आत जातांना दिसले नाहीत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पोलीसांची गाडी दूर गेल्यावर पुन्हा रस्त्याच्या कडेने पहिल्यासारखा रंग भरतो. आता मी ही थोडं धाडस करुन पुढे होतो. एकासोबत बोलता बोलता चल अंदर चल म्हणत त्यानं हाताला धरुन मला आत झाडीत खेचलं. आता सुटका नव्हतीच. त्यानं क्या करना है विचारलं. मी पन्नास रुपयांची नोट काढुन पुढं धरली. झपकन खेचुन त्यानं ती नोट छातीच्या आडोशाला खेचली. मी विचारलं, पुलीसका डर नही. तो म्हणला, डर कायका ? पुलीसभी भडवे है... मी साधेसुधे प्रश्न विचारण्याच्या तयारीत आणि तो माझ्या पॅंटच बक्कल उघडण्याच्या घाईत. मी म्हणालो सिर्फ बात करनी है काम नही. तर म्हणाला रायटर है क्या? सिरीअल लिखनी है, पिक्चर निकालनेका है की पेपरमे छपवानेका है? मी म्हणालो ऐसा कुछ नही, बस जनरल बात करनेकी है. त्यानं टाळी मारुन अजुन एकाला आत बोलावलं. त्याला म्हणाला, रायटर है... काम नही करनेका. तर दुसरा सुरु... बोल क्या चाहिये इन्फॉरमेशन... हम काम भी करना चाहे तो क्या करे... कौन रखेगा काम पर... कौनसी नौकरी मिलेगी हमे... और कौन देगा... भीख मांगने गये तो भी कोई भीक नही देता. आंखे फाड फाड कर देखेते रहते है... उन आखोंको क्या चाहिये ओ हमे मालूम है... वही हम करते है... बोल काम करने का है क्या... मी पुन्हा नाही म्हणालो तर म्हणाला... तो फिर चल निकल... &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्रीचे अडीच वाजले होते. पावसाची रिपरीप चालू होती. चहा- सिगरेटच्या सायकलस्टॉलवर काही रिक्षावाले, काही फिरस्ते रेंगाळत होते. तिथंच पुलाखाली एक जोडपं इडली- डोसे काढीत होतं. तुरळक गाड्या रस्त्यावरुन चरचरत जात होत्या. आणि सस्त्यालगतच्या या खेळातले काही भिडू आत जात होते काही बाहेर येत होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-8229793662438918268?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/8229793662438918268/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=8229793662438918268' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/8229793662438918268'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/8229793662438918268'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/09/blog-post.html' title='सेक्सी छक्के'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-9205744615025485619</id><published>2010-08-17T04:57:00.000-07:00</published><updated>2010-08-17T04:58:30.977-07:00</updated><title type='text'>पार्वतीचं बाळ जन्माला येत आहे</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- आपलं महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # ऑगस्ट-२०१०&lt;br /&gt;&lt;br /&gt;इतस्ततः पडलेले शरीराचे तुकडे. कुणाचे हात तुटलेले. कुणाचे पाय. कुणाचं पोट फाटलेलं. तर कुणाचं डोकं फुटलेलं. रक्त साकळावं तसे रंगाचे डबे विखरुन पडलेले. सुकलेले डाग. शरीरातल्या धमन्या आणि शिरा लोंबकाळव्यात तसा तुटलेल्या हाता पायातून काथ्याचा गुंता. डोळ्याच्या खोबणीत फक्त पांढरी बुब्बुळं. उघडीबंब शरीरं. स्टोव्ह, एक्सॉ ब्लेड्स, चाकू अशी आजुबाजुला पडलेली हत्यारं आणि तिथल्या माणसांच्या अंगाखांद्यावर पिठाच्या चक्कीत धान्य पिसणार्‍या भय्याच्या अंगावर साचते तशी पांढरी पावडर. जमिनीवर, भिंतींवर, कपडयांवर रंगाचे डागच डाग.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे चित्र आहे कारखान्यातलं. जिथं गणपती आकार घेतो आहे. लालबाग, परळ, चिंचपोकळी भागातल्या हे सगळ्याच कारखान्यातलं प्रातिनिधीक चित्र. गणपती घरात किंवा मंडपात यायला आता पंचवीस दिवस उरले आहेत. मंडळांच्या वर्गणीचे जत्थे पिवळी पावतीपुस्तकं घेऊन घराघराच्या उंबर्‍यांवर, जाहिरात दारांच्या गारेगार ऑफीसेसमध्ये फिरु लागले आहेत. मंडप, चलचित्र, लाइटींग, मनोरंजनाच्या कार्यक्रमांची जुळवाजुळव चालू आहे ती गणपतीच्या स्वागतासाठी त्या गणपतीच्या मुर्तीला रुपरंग देण्याचं काम जोरात सुरु आहे. दिवस-रात्र.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री दहानंतर कारखान्यातलं काम तसं थंडावलेलंच. तरी कामावरुन सुटून आलेले कामगार इथं रात्रीचं काम करीत होते. दिवसभर काम करुन थकलेले तिथंच आडवे. तिथल्याच बाजल्यावर कुणी झोपलेले. कुणी लवंडलेले. आणि गणपतीच्या मुर्ती आपापल्या जागेवर शांत. निशब्द. मारकुटया मास्तरांनी दंगेखोर पोरांना शिक्षा करुन ठेवल्यासारखे एका जागी एका पोजिशन मध्ये बसलेले, उभे, लवंडलेले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सलूनमध्ये न्हावी आपल्याला खुर्चीवर बसवून त्याला पाहिजे तशी आपली मान तर कधी खुर्ची वळवून घेतो. तशी कारागीरा समोर फिरत्या स्टुलावर बसलेले गणपती. कॉप्रेसरची घरघर सुरु आहे आणि स्थीर नजरेनं स्टुलाची चक्ती फिरवत रंगाचा स्प्रे गणपतीच्या धोतराच्या सुरुकुत्यांवर, पोटाच्या, मानेखालच्या, हातांच्या घडीवर सरसर फिरवला जातो आहे. सराईताप्रमाने कारागीराचा हात चालत राहतो आणि गणपतीच्या शरीराचा एक एक अवयव जिवंत होत जातो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एका कारखान्यात गेल्या विस वर्षांपासनं गणपतीचंच काम करणारा चंद्रकांत भेटला. इथं संपुर्ण मोत्यात घडवला जाणार्‍या गणपतीची जबाबदारी त्याच्याकडं होती. शरीराच्या अववयापासून अंगावरच्या दागदागीन्या पर्यंत संपुर्ण मोतीच मोती. एक एक मोती ओळीत गुंफुन गणपतीला तो त्याच्या मनातलं रुप देत होता. त्या आधी त्यानं पंधराविस फुटाचे गणपतीही हाताळले आहेत. मी विचारलं, काम करतांना गणपतीला तुमचा पाय वैगेरे लागत असेल? तो म्हणाला, लागणारंच. दर वेळेला पाया किती पडायचं आणि काम कधी करायचं? एकदाच शेवटी सगळ्यांच्या पाया पडायचं. माफ कर म्हणायचं, झालं. रंगाचं काम असलं की पंखा पण लावता येत नाही. मच्छर फोडून काढतात. त्यामुळे शेवटी घाई होतेच. तेव्हा गणपतीच्या दर्शनी भागावरच जास्त लक्ष द्यावं लागतं. मागचं कोण बघतंय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एका कारखान्यात शिरतांना चप्पल चालेल का विचारलं तर त्यानं आपल्या पायातली चामडयाची चप्पल दाखवली. तो सेलीब्रेटीचंच कौतूक करण्यात रंगला होता. कोण कोण कलाकार कशी कशी ऑर्डर देतो त्याचं गुणगान करतांना तो क्षणाक्षणानं फुलत होता. तिथले वेगवेगळ्या स्टाईलचे गणपती त्यांच्या वैशिष्टयांसह स्पष्ट करीत होता. प्यायला पाणी मागितलं तर त्यानं बॅगपायपरच्या रिकाम्या खंब्याची बाटली पूढं केली. पाणी पिऊन मी बाटलीकडं बघून हसलो तर तो म्हणाला, रात्रंदिवस काम करायचं तर असं अधून मधून टॉनीक लागतंच आणि कामही कसदार होतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मातीच्या गणपतीला खूप झंजट असतं म्हणाला. आणि त्या गणपतीचा भावही जास्त. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गणपतीलाच मागणी जास्त असते. रंग गेला तर पैसे वापस म्हणाला. पण ते टेस्ट करायचं म्हणजे विसर्जनाचा दिवस उगावणार. आणि तेव्हा कलर गेला तरी त्या दिवशी एवढं दु:खाचं वातावरण असतं की पैसे परत मागायला कोण जाणार? त्याने एशिअन पेन्टचे ऑइलबॉन्ड कलर दाखवले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गणपतीचे डोळे काढणार्‍या कारागीराला या धंद्यात विशेष मान आहे. ते काम म्हणे जिकरीचं असतं. एक जण डोळे रंगवता रंगवता तल्लीन झाला होता. डोळ्यातल्या काळ्या वर्तुळावर मारलेला एकच सफेद ठिपका गणपतीच्या जीवात प्राण ओततो. गणपतीच्या उंचीनुसार तो या ठिपक्यांची जागा बदलत होता. तो म्हणाला जर गणपती आपल्या उंचीच्या पटटयात येत असेल तर ठिपके डोळ्यांच्या बाजुला आणि जर गणपतीची उंची जास्त असेल तर हेच ठिपके खालच्या साईडला काढावे लागतात. प्रत्येक भक्ताला वाटलं पाहिजे, गणपती आपल्याकडेच बघतो आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आजकाल ट्रेंड कश्याचा आहे विचारलं तर म्हणाला लालबागच्या राज्यासारख्या गणपतीचा. कुणाकुणाला तो नवसाला पावलेला असतो. पावलास तर तूला घरी आणू असाही नवस असतो. त्यामुळे अलिकडच्या काळात लालबागच्या गणपतीच्या प्रतिकृतीला बरीच मागणी असते. आणखी एक तो 'माय फ्रेंड गणेशा' सिनेमा आल्यापासनं पहिल्याच वर्षी विशेषत: मुलांच्या आग्रहाखातर गणपती आणणारे त्या गणपतीची ऑर्डर करतात. साईबाबाच्या खांद्यावर बसलेला. शिवाजीच्या आवेशात उभ्या असलेल्या, बालाजीची प्रतिकृती असलेला, टिळकांच्या सोबत असलेला, शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेला असे कितीतरी गणपती लोक आवर्जुन मागतात. म्हणजे एका दगडात दोनही पक्षी मारल्यासारखं होतं. उंचीवर मर्यादा आल्यापासनं लोक गणपतीच्या सुंदरपणाकडं अधिक लक्ष देतात. काही काही तर छापून आलेल्या गणपतीची पोस्टरही आणून देतात. पण त्याचा रेटही जास्त असतो. मागणी तसा पुरवठा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वर पत्रा बाजुला पत्रा आणि परातीवर आधारलेलं मंडप. अधुनमधून पाणी आत शिरु नये म्हणून त्यावर शाकारलेली ताडपत्री किंवा मेणकापड. सगळेच कारखाने कुठंतरी बिल्डींगच्या आधारानं किंवा मैदानात. तिन-चार महिन्यासाठी चालणारा खात्रीचा तरीही कुठलीही ठोस सोय नसलेला हा व्यवसाय. एका कारखान्याचा मालक म्हणाला की, जे आज कारखाना मालकांच्या हिमतीवर चालू आहे ते ही आता संपेल असं वाटतंय. लालबाग परळ भायकळ्याच्या आजूबाजूला आता उंचचउंच इमारती उभ्या राहायला लागल्याहेत. त्याच्या आधाराने पराती, मंडप बांधणं दुरच तिथं उभं रहायलाही मिळायचं नाही. इथला मराठी माणसाचा उत्साह फक्त मिरवणूकीत नाचण्यापुरता उरला आहे. बाकी उरलेले दिवस तेच ते बुजलेपण. इथली गणेश टॉकीज बंद झाली आणि भारतमातेच्या जागेवर मॉल, मल्टीप्लेक्स कधी उभं रहातंय याची फक्त वाट पहायची. एक एक करुन पायाखालची जमीन सरकते आहे. त्यामुळे शॉपिंग मॉल्स मध्ये गणपती विकायला ठेवण्याचे दिवस आता दुर नाहीत. हौस आहे. परंपरा आहे म्हणून करीत रहायचं एवढंच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;लालबागच्या राजा आता सेलिब्रेटींच्या दर्शनभेटीमुळे गणपतीमधला सेलिब्रेटी झाला आहे. तो गणपती तिथल्या तिथेच तयार केला जातो. त्याचं काम आजपासूनच सुरु होतं आहे. लालबागच्या राजामुळं आजुबाजुच्या इतर गणपतीचा म्हणजे मंडळांचा झगमगाट आता कमी कमी होतो आहे. त्याला इलाज नाही. जो पर्यंत इतर गणपती भक्तांना पावत नाहीत तो पर्यंत मंडळांचेही असेच हाल होणार. भक्तांच्या सोइसाठी कोंबडीगल्लीच्या परिसरात गरम खाडा इथं भलामोठा मंडप उभारला आहे. मागच्या बाजूला दिग्विजय मिलच्या मैदानात फक्त नवस फेडणार्‍यांसाठी निवारा केला आहे. योगायोगानं त्या गल्लीचं नाव चोर गल्ली असं आहे. रांगारांगातून गणपतीच्या पायापर्यंत पोचणारी जिन्याची वळणंही मजबूत आणि नयनरम्य आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या परिसरात अनेक छोटेमोटे मंडप असेही आहेत जिथं गणपती बनत नाहीत फक्त विकले जातात. चौकशी केल्यावर कळलं ते पेण वरुन आणलेले आहेत. तिथं फक्त धंदा आहे. इथ गणपतीच्या अंगावर एक बिल्ला लटकवलेला असतो. कधी कधी तो गणपतीच्या नंबरचा असतो तर कधी तो विकत घेतलेल्या मालकाचा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;फायबरच्या साच्यातून मातीचे किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे गणपती बनताना, त्यावर रंग चढताना, गणपतीच्या डोळ्यात भाव उतरतांना बघणं हा एक सोहळा आहे. वेळ, मेहनत आणि कारागीराला पैसे मिळणं हा व्यवहार आहे. तो कश्यातूनही साधता येतो. पण आज पेण वरुन गणपती आणून त्याचा रस्त्यावर बाजार मांडणं हे बघायला बरं वाटत नाही. उद्या कदाचीत काळाच्या ओघात लालबाग-परळचे कारखाने उठतील. पेण वरुन रेडीमेड गणपती आणले जातील. पण त्यानंतर एक लक्षात ठेवलं पाहिजे की, 'पेण' आणि 'चिन' काही दूर नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-9205744615025485619?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/9205744615025485619/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=9205744615025485619' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/9205744615025485619'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/9205744615025485619'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/08/blog-post_17.html' title='पार्वतीचं बाळ जन्माला येत आहे'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-2302068272914935021</id><published>2010-08-15T03:37:00.000-07:00</published><updated>2010-08-15T03:38:53.652-07:00</updated><title type='text'>स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?</title><content type='html'>पूर्वप्रसिध्दी # मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरिष पारकर # ऑगस्ट २०१&lt;br /&gt;&lt;br /&gt;काल त्रेसष्ठावं सरलं म्हणून आजपासून चौसष्ठावं लागलं. घडयाळाची टिकटिक रोखता येत नाही. सरणारी वेळ थांबवता येत नाही. सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष या क्रमानं काळ आपलं एक एक पाउल टाकत पुढं सरकत राहतो. आणि आपण योगायोगानं किंवा ठरवून साधलेली वेळ वर्षावर्षानं साजरी करीत राहतो. १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिवस म्हणून साजरा करण्याचा दिवस आहे. हे आता सवयीनं आपल्याला माहित झालेलं आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या दिवशी दरवर्षी सकाळी 'कर चले हम फिदा जान और तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियो' या गाण्यानंच जाग येते. हक्काची सुटटी म्हणून उशीरापर्यंत ताणून द्यायचं तर हमखास झोप येत नाही आणि सकाळी झोपेच्या ऐन मोसमात स्पिकरवर 'कर चले..'. अशी दिवसाची अनवॉन्टेड सुरुवात. टिव्ही लावावी तर पुन्हा मनोज कुमार 'मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती' उगाळत बोंबलत असतो. चॅनेल बदलावा तरी तेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सालाबाद प्रमाणे या ही वर्षी, शाळेच्या पटांगणात (अर्थात ज्यांची शिल्लक आहेत त्यांची, उरलेली वर्गातल्या वर्गात) उभे राहुन मुले झेंडयाला अभिवादन करतात. एकुणच आज तरी देशभक्तीपर आवेशात वंदे मातरंम आणि जनगणमन. शेवटी कुणीतरी... कुठुनतरी... 'भारत माता की... जय'. या दिवशी हौशी शिक्षक गांधी टोप्या घालतात. काही नेहरुंचे कपडे. शिक्षिका तिरंगी किंवा पांढर्‍या साडयात. बर्‍याच जणांच्या खिशाला टाचणीत अडकवलेला झेंडा दिसतो. नंतरही काही दिवस मुख्याध्यापकांच्या टेबलावर एकमेकांना तलवारीसारखे छेद देऊन दोन झेंडे दिसत राहतात. अशा देशप्रेमानं भारलेल्या दिवसात कुणीतरी त्यांना ते भेट म्हणून देतोच. शाळेतल्या काही हुशार मुला-मुलींची तिच ती तोंडपाठ भाषणं होतात. झाशीच्या राणीपासून टिळक, गांधी, बोस, सावरकरांपर्यंत सगळ्यांची उजळणी होते. ज्या शाळेत संगीत शिक्षक असतील तिथे कंपल्सरी एक देशभक्तीपर समुहगीत. अर्थात मुला-मुलींच्या वेगवेगळ्या तसंच उंचीनुसार रांगा लाऊन आणि संगीत शिक्षक मधोमध उभे राहुन हातवारे करीत तबला-पेटीच्या नादात-ताला-सुरात (?) गाणं सादर केलं जातं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आज काही पालक आपल्या गाडयातून प्रवास करतांना आणि आपल्या मुलांवर संस्कार व्हावे म्हणून मुद्दामहुन सिग्नलवर तिरंगी झेंडे विकत (ते ही भीख मागितल्यासारखं) असलेल्या मुलांकडूनच घासाघीस करुन का होईना घेतात. तेवढंच आपलं देशप्रेम आणि गरीबालाही मदत. गाडीच्या डॅशबोर्डावर गणपतीच्या शेजारी आपला काही दिवस शोभा म्हणूनही झेंडा बरा वाटतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सरकारी कचेर्‍यात आज गांधीजीना भिंतीवरुन खाली उतरवलं जातं. बाकीच्यांचे फोटो उपलब्धतेनुसार आजुबाजुला. काही ठिकाणी शिवाजी महाराजांनाही त्या रांगेत बसवतात (बिचार्‍या महाराजांना कल्पनाही नसेल की अश्या काही स्वातंत्र्यदिवसासाठी आपल्याला इथं बसायला लागेल) पण फोटोला इलाज नसतो. तो जिथं बसवला किंवा ठोकला जातो तिथं बसतो किंवा लटकतो. मग तो फोटो शिवाजीचा असो नाहीतर गणपतीचा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;देशातर्फे दिल्लीच्या लाल मैदानात आणि महाराष्ट्र राज्यातर्फे शिवाजी पार्क वर पोलीसांचे बँड, लेझीम पथक आपली कलाकारी सादर करतात. सराव कर-करुन आज मुख्यमंत्र्याना, राज्यपालाना, गॉगल वाल्या प्रेक्षकांना आणि टिव्हीवाल्यांना शिस्तीत चालून दाखवतात. काही दुचाकीवरुन तर काही विमानातूनही कसरती करुन आपलं प्रदर्शन मांडतात. अश्यावेळी लोककला पाहिजेच. ती असतेच. याठिकाणी कुठुन कुठुन कश्या कश्यात पहिल्या आलेल्या लोकांचे सत्कार केले जातात. प्रशस्तीपत्रकं, शाली किंवा श्रीफळं दिली जातात. ती कुणाकुणाला वाटायची यासाठी काही कमिटया, समित्या वर्षभर कार्यरत असतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या दिवशी चढाओढ दिसते ती बॅनरची. वेगवेगळ्या पक्षांचे नेते-उपनेते-कार्यकर्ते आपापल्या वकुबाप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा देत झळकतात. आजकाल कुणी कुणाला शुभेच्छा द्यायच्या याचाही धरबंद राहिला नाही. जो तो उठतो. फ्लेक्स वाल्याला गाठतो. कटींग-पेस्टींग करतो. दोन-चार पोरांना हाताला धरुन रातोरात झळकतो. नजर जाईल तिकडे तिरंगा. डोळ्यासमोर, पायाखाली तिरंग्याचा कचराच कचरा. म्युनसीपालटी देशाच्या नावानं बोटं मोडीत डंपिंग ग्राउंडवर दुसर्‍या दिवशी शिळं झालेलं देशप्रेम जाळून टाकते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बिल्डर सुध्दा या दिवशी वर्तमानपत्रात पान पान जाहीराती देतात. वेगवेगळया बिल्डरांच्या रंगीबेरंगी, गगनचुंबी जाहिराती बघुन आपल्यालाच आपण 'बेघर' आहोत असं वाटायला लागतो. मनातल्या मनात आपण रस्त्यावर आल्यासारखे वाटतो. चित्रातल्या गाडया, झाडं, रस्ते, तलाव, माणसं, फर्नीचर पाहिलं की वाटायला लागतं की आपण एखाद्या गुहेत वैगेरे रहात आहोत की काय. शक्य आहे ते आजच्या दिवशी बुकींग करतात बाकीचे चोळत चडफडत राहतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही बाजार आजच्या दिवशीच किंवा मागे पुढे दोन-चार दिवस 'बीग' सुट देतात. त्या दिवशी आपल्याला कळत नाही. भावनेच्या भरात आपणही खर्च करतो. अमुक घेतलं तर तमूक फ्री. येवढं घेतलं की तेवढं फ्री. या फ्री फ्री च्या नादात माणूस फिरफिर फिरतो. नंतर कळतं की सुट-बीट झुट है. पण त्याला काही इलाज नसतो. सर्वसामान्य माणसालाही वाटत राहतं की, आपण काळाला धरुन असलंच पाहिजे. काळाबरोबर वहात गेलंच पाहिजे. मार्केटला- जाहिरातीना बळी पडलंच पाहिजे. आता सगळ्यांनाच दरवर्षी येणार्‍या अश्या 'सुटी'चे दिवस पाठ झाले आहेत. त्या दिसवांसाठी तरी यापुढे आपण १५ ऑगस्टची वाट पहायला पाहिजे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;भारत आपला देश आहे. हा देश शेतीप्रधान आहे. त्यामुळं इथं आत्महत्येसाठी शेतकर्‍याला प्राधान्य दिलं जातं. इथं अजुनही दारिद्रय रेषेखाली जगत राहणार्‍या माणसांचं प्रमाण ३७ टक्के आहे. इथं छोटे उद्योग धंदे जन्माला आल्यापासून एक दोन वर्षात बंद पडतात. आणि मोठया व्यावसाईकांच्या प्रगतीपुढे आकाशही ठेंगणं पडतं. जन्माला येण्याआधीच किमान शंभरातल्या दहा मुलीना मारलं जातं. कुपोषणानं अजुनही १७ टक्के मुलं मरतात. इथं प्राथमीक शाळेत गळती होणार्‍या मुलांचं प्रमाण २.७ दशलक्ष इतकं आहे. अजुनही राज्याराज्यात सिमेवरुन, पाण्यावरुन आपापसात भांडणं आहेतच. इथलं हजारो टन धान्य साठवायला गोदाम नाही म्हणून सडतं आणि इथंच भुकेपाठी गरीबाचा जीवही जातो. इथं दिड-दोन लाखाचा पगार घेणार्‍याला आणि दोन-चार हजारात काम करणार्‍यालाही एकच बाजार आहे. इथं काही गाडीवानांच्या समोर पार्कींगसाठीचा प्रश्न आहे तर काहींच्या पायात फाटक्या चपला नाहीत. इथं आपल्या मतावर निवडून आलेल्या माणसाची झटपट प्रगती कशी, का आणि कधी होते हे कळत नाही. टिव्हीवरच्या बातम्यामुळं काल काय झालं ते आठवत नाही. आता काय चाललंत ते समजत नाही आणि उद्या काय होणार आहे याचा अंदाज येत नाही. नुसता किचाट, गोंधळ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा लोकशाही देश आहे, हे माहीत आहे. पण लोकांचं लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य म्हणजे काय रे भाऊ? कुठले लोक, कुणाचं राज्य, कश्याचं कल्याण? &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट.&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;a href="mailto:pravindhopat@gmail.com"&gt;&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-2302068272914935021?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/2302068272914935021/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=2302068272914935021' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/2302068272914935021'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/2302068272914935021'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/08/blog-post_15.html' title='स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-4723543193756905484</id><published>2010-08-06T11:45:00.000-07:00</published><updated>2010-08-10T04:29:26.170-07:00</updated><title type='text'>भाजीचा बाजार</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- आपलं महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # ऑगस्ट-२०१०&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्रीचे बारा वाजले आहेत. दोघा-तिघांचा घोळका दोन-चार ठिकाणी गप्पा छाटत. एखाद-दुसरी गाय इतस्ततः पडलेला पाला हुंगत, चरत. काही गाई त्यांची वासरं मस्त रंवंत करत रस्त्यात कुठेही कशीही निवांत बसलेली. गेटवर चहा वाल्याच्या आजुबाजुला माणसांचा गराडा. स्टोव्हच्या फरफरणार्‍या आवाजाशी स्पर्धी करीत गावगप्पांचा फड रंगलेला. पिंपातलं पाणी प्लॅस्टीकच्या मगातून घटघटा पिऊन वर चहाचा झुरका त्यावर तंबाखुचा बार. दोनचार ठि़काणी ओळीत काही हातगाडया काही सायकली काही मोटारबाईक्स एखाद-दुसारा ट्रक टेम्पो. बाकी सुनसान मैदान आणि बाजूला दुकानाचे गाळे काळोखात निपचित. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वाशीच्या सेक्टर १९ मधलं एपीएमसी मार्केटचं हे चित्र त्यानंतर रात्री क्षणाक्षणानं बदलायला लागतं. माणसं, टेम्पो, ट्रक्स, लाईटस, हॉर्न्स, गाडयांचे आवाज, पेट्रोल-डिझेलचा धूर, धावपळ, पळापळ, आरोळ्या, किचाट गोंधळानं वातावरण भरुन जातं. बघता बघता रात्र चढत गेली आणि भाजीपाला मार्केटमध्ये सकाळ कधी झाली हे कळत नाही. इथं कुणाच्या डोळ्यावर पेंग नाही की कुणी झोपलेला नाही. उत्साहाला उधाण आल्यासारखं हलतं, बोलतं, चपळ वेगवान चित्र. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री साडेबारा पाऊणच्या आसपास भाजीनं भरलेला एक ट्रक गाळ्याच्या कठडयाला लागतो आणि पंधरा-वीस कामगार झटापटीनं त्यातला माल उतरवायला लागतात. ट्रकातल्या काळोखातही नेमक्या व्यापार्‍याचं किंवा त्याच्या गाळ्याचं नाव घेतलं जातं, हातात विळ्यासारखा काटा गोणीत अडकवून तिघांनी उचललेला डाग एकाच्या डोक्यावर जातो. तो वळताना त्याच गतीनं दुसरा, तिसरा, चौथा... वेगवान लयीत ट्रक केव्हा खाली झाला कळला नाही. अर्ध्या चडडया, अंगात बनीयान, खांद्यावर भगवा टॉवेल, डोक्यावर चुंबळीसाठी खोलगट गोणी आणि तोंडात चित्रविचित्र हेल. यातले बहुतेक कामगार सोलापुर बॉर्डरवरचे त्यामुळे भाषा मराठी कानडी मिश्रीत. कष्टाचं काम पण त्यातल्या गतीमुळं त्याला आनंदाची, उत्साहाची झालर लागते आणि तेच काम हलकं फुलकं होऊन जातं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळेजण आपापल्या कामात गर्क. एक सफारीतला तरुण मागे हाताचा गुणाकार करुन ट्रकाच्या आजुबाजुला खालीफुकट फिरत होता, म्हणून त्याला विचारलं तर म्हणाला, 'मी डायवर हाय, मला काय माहित नसतंय.' ... काय आहे, म्हणून एक म्हातारा पुढं आला. त्यानं एका झटक्यात सांगून टाकलं. 'शेतकर्‍याचा काय संबध नसतोय इथं. शेतकरी तिथल्या हुंडेकर्‍याकडं माल देतोय. हुंडेकरी सोताच्या नाहितर भाडयाच्या गाडीनं त्या त्या नावाच्या चिटटया लिहुन माल इथल्या व्यापार्‍याकडं धाडतो आनं इथनं पुढं मुंबयचा व्यापारी, त्याच्याकडनं भय्याकडं आनि तिथंन पुढं तुमच्या घरात'. एवढं बोलून तोही सटकला. त्याला कुणीतरी मास्तर अशी हाक मारली. असे अनेक मास्तर पुढे भेटले. नासीक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर कडून आलेल्या ट्रक-टेम्पोमधुन एक कागद ड्रायव्हरकडून थेट त्या मास्तरांच्या हातात पडत होता. प्रत्येक चिठठीबरोबर दहा-वीस रुपयाची नोट चिकटलेली असायची. तिथून पुढे जो तो त्या मास्तरच्या मार्गदर्शनानुसार. एकामागून एक असे ट्रक टेंम्पोची गर्दी आता वाढत चालली. एकाला लागून एक अश्या शिस्तीत गाडया उभ्या रहात आणि त्याच शिस्तीत माल उतरवला जाई. एका ड्रायव्हरला गाईड करायला पंधरावीस आवाज. व्यापार्‍यांच्या लगतलगतच्या मोकळ्या गाळ्यातही नुसत्या नंबरावरुन नेमका माल नेमक्या गाळ्यात येऊन पडत होता. अडाणीपणातही एक शहाणपण दडलेलं असतं त्याचा एक सुंदर नमुना. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री दोन-अडीचच्या सुमारास मार्केटच्या गेटमधुन चारचाकी सुंदर चकचकीत गाडया येतांना दिसतात. त्या असतात मुंबईच्या व्यापार्‍यांच्या. घामानं भिजलेल्या हमालांच्या दुनियेत, चेहर्‍यावर झोपून उठल्यानंतरची तॄप्ती,. ताज्या चेहर्‍यावर पावडरचा हलका हात, कपडयांवर सेंटचा अंधुक वास. मनगटावर घडयाळ, एखाद्याच्या हातात ब्रेसलेट किंवा बोटात अंगठी, खिशात मोबाईल घेऊन व्यापारी प्रवेश करतो. बहुसंख्य मराठीच. पण गुजरात्यांनाही या धंद्यातली गंमत कळायला लागली आहे. हमालांच्या यादीत युपी-बिहारींची नावं केव्हाच घुसली आहेतच. मैदान ते गाळ्यामधली धावपळ सुरुच राहते. पण आता लक्ष वेधून घेतो तो दुकानाचा गाळा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संपुर्ण मैदान ट्रक-टेम्पो-हातगाडया आणि माणसांच्या लगबघीनं भरुन गेलेलं असतं. दुकानाचे गाळे आता स्वच्छ प्रकाशात उजळतात. वांगी, पडवळ, भेंडी, कारले, काकडी, कोबी, वाटाणा, दुधी, भोपळा, तोंडली, दोडका, रताळी, पालक, मेथी, कोथींबीर, मिरच्यांची पोतीच्या पोती. एकावर एक रचुन ठेवलेल्या गोण्यांच्या मधोमध भाजी विक्रीचा घाऊक धंदा सुरु होतो. मुख्य व्यापार्‍याच्या आजूबाजूला भाजी घेण्यासाठी उत्सुक चार-सहा जणांचा कोंडाळा. मुख्य विकणारा हातरुमालाच्या खाली समोरच्याच्या हाताची बोटं नेमक्या पेरात दाबून भाव पक्का करतो. भाव पटला तर टाळी कडाडते. (अंतराअंतरावर वेगवेगळ्या गाळ्यावर अश्या टाळ्या कडाडत राहतात आणि त्याचाच एक उत्सव बनुन राहतो.) सांकेतीक भाषेत व्यापारी भाव उच्चारतो, झरझर डाग (गोणी) वजन काटयावर येते. काटयावर वहीत लिहित असतो कृषी उत्पन्न बाजार समीतीचा एक माणूस. प्रत्येक वजनातला आठ टक्के हिस्सा त्याचा. शेतकर्‍याची फसवणूक होऊ नये म्हणून तो उभा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या दिवशी भेंडीचा किरको़ळ बाजारातला भाव चाळीस रुपये किलो होता. तेव्हा ती भाजी इथे चौदा रुपये किलो होती. जो विकत होता त्या अडत्याचं कमिशन, त्याआधी काटेवाल्याचा पगार, समितीचं कमिशन, ट्रक-टेंपोचं भाडं, शेतापासून इथपर्यंत किमान चारवेळा मालाची चढउतार करण्यासाठी हमालांची मजूरी, ड्रायव्हर, डिझेल, मेंटेंनन्स, जाग्याचं भाडं. आणि या सगळ्याच्या खाली शेतकरी. ज्याच्या वाटयाला याच भाजीचा भाव किलोला तीन ते पाच रुपयाच्या आसपास मिळतो. ज्यासाठी तो किमान चार-सहा महिने शेतात राबतो. खतासाठी, पावसासाठी, पाण्यासाठी, विजेसाठी, कर्जासाठी कायम दुसर्‍यावर अवलंबून राहतो. शेतकर्‍यानं या सगळयासाठी हुंडेकर्‍याकडून आगाऊ घेतलेली उचल शेतातला माल उचलता क्षणीच काटली जाते. त्याच्या वाटया येणारा पैसा हा सगळ्यांच्यापेक्षा कमी. निसर्गापासून व्यापार्‍यापर्यंत आणि सरकारपासून अधिकार्‍यापर्यंत सगळ्याकडूनच शेतकर्‍याला नाडलं जाण्याची हमी आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्रभर आपल्या खांद्याला झोळी लटकवून काही बाया काही पोरं फिरतांना दिसत होती. सुरुवातीला लक्षात येत नव्हतं, पण नंतर तेच चित्र डोळयापुढून हलेना. त्यांची लाचार लगभग बघण्यासारखी असायची. ट्रक-टेंम्पो खाली करतांना फाटलेल्या गोण्यातून काही भाजीपाला खाली पडायचा. तो उचलण्यासाठी यांची झुंबड उडायची. पण रात्रभरच्या या झटापटीत त्यांच्या झोळ्या भरुन जायच्या. इतक्या मेहनतीनंतर मिळवलेल्या या सप्तरंगी भाजीवर त्यांच्या दिवसाचा भार असायचा. ती उचललेली भाजी दिवसभर नाक्यावर विकायची. आणि पुन्हा दुसर्‍या रात्री इथंच. पु.ल.देशपांडेच्या 'ती फुलराणी' नाटकात एक वाक्य होतं की, 'आपल्यासारख्या माणसांचा उकीरडा तो कावळ्यासाठी घास असतो' त्याची आठवण झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भाजी उतरता उतरता चहावाला यायचा. सगळ्या हमालाना आहे त्याच जागेवर चहा दिला जायचा. ट्रकावर वेगवेगळ्या पोजमध्ये उभे असलेले हमाल युध्दानंतरच्या विजयी विरांसारखे वाटले. चहा म्हणजे कामगारांसाठी अमृत-विसावा. चहावर तंबाखू किंवा त्याचीच सुधारीत आधुनीक आवृत्ती गुटखा आणि पुन्हा त्याच उत्साहात मर- मर. तेवढया मिळालेल्या वेळेत बाजुलाच लटकवलेल्या पिशवीत पसा दोन पसा भाजी जायची. शेजार्‍या पाजार्‍यांना फुकट वाटायला नाहितर खानावळ वालीला द्यायला. प्रत्येकाच्या डोक्यावर मागून उघडी खोल गोणी असायची. सहज हाताला लागतील त्या भाज्यानी आपसूक भराल्या जायच्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भाजी मार्केटच्या दक्षीण बाजूला संडास मुतार्‍यांची रांगच रांग. रात्रभर गर्दीत. तिथंच एका टोकाला विठ्ठल रखुमाइचं मंदीर. कुलूपात. विठोबाच्या अंगणात शनीचं मंदीर. उघड्यावर. शनी कोणात्याही सिझनमध्ये किमान बारापैकी एका राशीला नडतच असतो. त्याची उठबस झाली पाहिजे. विठोबाची आठवण दर एकादशीला नाहीतर आषाढी कार्तीकीला तर दर शनिवारी शनीचा टिळा लावणारे अनेक. &lt;br /&gt;पुढे त्याच रांगेत चहा, वडा, मिसळच्या टपर्‍या रात्रभर भरात असतात. नदीच्या पाण्यातल्या भवर्‍यासारखा पितळेच्या पातेल्यात चहा उकळत रहातो. आधी सफेदच पण पिळून पिळून काळ्या चॉकलेटी पडलेल्या फडक्यात गुंडाळून चहा गाळला (पिळला) जातो. चहा वर चहा संपत रहातो.&lt;br /&gt;दाना बाजार, कांदा बटाटा बाजार, फळ बाजार आणि हा भाजी पाला बाजार. सुधाकर नाईकांच्या काळात मुंबईच्या बाहेर नवी मुंबई वाशी इथं हलवलेला हा शेती उत्पन्न बाजार आता इथं चांगलाच रुळला आहे. कितिही महागाई असो दोन वेळच्या जेवणाच्या ताटात आपल्या हक्काची जागा राखुन ठेवणारी भाजी आपल्यापर्यंत पोचण्याआधी शेतकर्‍यापासून ते भाजी विकणार्‍या शेवटच्या भय्यापर्यंत हजारो हात खपत असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट. &lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-4723543193756905484?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/4723543193756905484/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=4723543193756905484' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/4723543193756905484'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/4723543193756905484'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/08/blog-post_06.html' title='भाजीचा बाजार'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-4488017596045305384</id><published>2010-08-06T11:40:00.000-07:00</published><updated>2010-08-10T04:29:59.586-07:00</updated><title type='text'>महाराष्ट्राच्या सीमा जळताहेत</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक - शिरीष पारकर # ऑगास्ट -२०१० &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीला या वर्षी पन्नास वर्षे झाली. तो दिवस साजरा करुन तीन महिने उलटले नाहीत तोवर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांचा सिमावाद उफाळून आला. जो वाद गेली पन्नास वर्षे चालूच आहे. पुढेही चालू राहील, कारण महाराष्ट्राचे बेळगाववरचे आणि बेळगावकरांचे महाराष्ट्रावरचे प्रेम कमी व्हायला तयार नाही. खरंतर कर्नाटक राज्याच्या बाजुने हा वाद संपला आहे कारण बेळगाव आणि सिमेवरची गावं कर्नाटकातच राहतील असा निर्णय केंद्राने दिला आहे. कॉग्रेसला हा प्रश्न मिटवण्यात कधीच रस नव्हता. भाजपच्या मनात काय आहे हे कळायला मार्ग नाही. कारण कर्नाटक राज्यात भाजपचे सरकार आहे. भाजप शिवसेनेचा मित्र पक्ष आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आहेत. आणि ते मराठी आहेत. तरीही हा प्रश्न मिटावा असे भाजपलाही वाटत नाही. शिवसेना निवडणूका आल्या की गरजेपुरता हा प्रश्न गरम करुन पुरवते आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्राचं केंद्रातलं सर्वपक्षीय खासदारांचं बळ लक्षात घेता हा प्रश्न आजही धसास लावता आला असता पण त्यात बिचार्‍या बेळगावच्या मराठी जनतेपलिकडे कुणालाही या प्रश्न सोडवावा असे सध्या तरी वाटत नाही. महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेले शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि मनोहर जोशी असे चार मुख्यमंत्री केंद्रात आहेत. पण या निर्णयानं कुणाच्याही अस्मितेला तडा गेलेला नाही. राजीनामा वैगेरे दुरच साधी प्रतिक्रीयाही कुणी दिली नाही. शरद पवारानी या प्रश्नाची उडवलेली खिल्ली सर्व टिव्ही धारकांनी पाहिली आहे. अशोक चव्हाणांनी आपल्या अर्ध्या कच्या मराठी (महाराष्ट्रासाठी) इंग्लीशमधे (दिल्ली(मॅडम)साठी) चष्म्याआडून आपली मते मांडली. 'वर्क इन प्रोग्रेस' या धर्तीवर त्यांचे उपाय चालू आहेत. केंद्राकडून हा निकाल जाहीर झाला त्या दिवशी आणि काही दिवस नंतरही त्याचे पडसाद कोल्हापुरात (कदाचित शेजारधर्म म्हणून) उमटत राहिले. बाकी महाराष्ट्र तसा थंडच होता. वर्तमानपत्रांच्या बातमीपलिकडे त्या प्रश्नाला मुंबईत आणि उर्वरीत महाराष्ट्रात जागा नव्हती. जाळणे, तोडणे, फोडणे, मोडणे, फासणे, फेकणे, मारणे हे शिवसेना पुरस्कृत सगळे सोपस्कार झाल्यावरही प्रश्न आहे तिथंच आहे. त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी दोनचार टिव्ही बाइटच्या पलिकडे कोणतंही आंदोलन केलेलं नाही. मागच्या विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेनेला बेळगावच्या मराठी माणसानी त्यांची जागा दाखवली आहे. आता मनसेच्या भीतीने शिवसेनाही या बेळगाव सिमावादाच्या प्रश्नातून काढता पाय घेईल असे वाटते. वाट बघण्याशिवाय आता कुणालाच पर्याय नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कर्नाटकचा धुरळा बसतो न बसतो तोच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बाभळी बंधार्‍यावरुन घेतलेला पवित्रा हा सुध्दा महाराष्ट्राच्या सिमावादाची नवीन नांदीच म्हणावी लागेल. चंद्राबाबूनी केवळ पोटनिवडणूकीसाठी केलेली स्टंटबाजी आहे असे म्हणून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर उद्या हा वाद आणखी पेटल्याशिवाय राहणार नाही. चंद्राबाबू नायडूं बरोबर ५० आमदार, २ खासदार आणि २३ कार्यकर्त्यांना अटक झाली होती. आपल्या किती आमदारानी कुठल्या प्रश्नासाठी अशी एकत्रीत अटक करुन घेतल्याची आठवतेय? नांदेड जिल्ह्यात आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र सिमेवर असलेल्या धर्माबाद तालूक्यात गोदावरी नदीवर जो बाभळी बंधारा बांधाण्यात येणार आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशातील पोचमपाड धरणातील एकूण क्षमतेच्या फक्त अर्धा टक्काच पाणी अडणार आहे. हे वास्तव माहिती असूनही चंद्राबाबूनी सर्वशक्तीनीशी हा प्रश्न पणाला लावला आहे. आणि त्याची सुनावनी सर्वोच्च न्यायालयात १६ ऑगस्ट २०१० ला होणार आहे. प्रश्न मानला तर समजूतीनेही सुटू शकतो पण तो संबधीताना सोडवायचा असला तर... कर्नाटकाचाही प्रश्न सोपाच वाटला होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कर्नाटक आणि आंध्रप्रदेश सिमावादाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतर काही सिमांचाही विचार करुया. जो कदाचीत महाराष्ट्रासाठी भविष्यातली डोकेदुखी ठरणार आहे. गेल्याच आठवडयात सिमांन्तच्या (मुंबईतल्या पत्रकारांचा गट, ज्याच्यावतीने महाराष्ट्राच्या सिमेवर वसलेल्या तालूक्यांच्या आर्थीक-सामाजीक- शैक्षणीक आणि राजकीय परस्थीतीचा अभ्यास केला जातो) निमित्ताने जळगाव जिल्यातल्या चोपडा तालूक्याला जाणे झाले. चोपडा तालूका मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर आहे. ही बॉर्डर म्हणजे वणेर नदी. मुख्यथा आदिवासी वस्ती असलेला वणेर नदीचा परिसर जंगलानी व्यापलेला आहे. खरतंर आता होता असे म्हणायला हवे. कारण गेल्या चार-सहा वर्षात इथे भरमसाठ जंगलतोड झाली आहे. सरकारी नोकरदार म्हणतात याला केंद्रीय वन संरक्षक कायदा २००६ जबाबदार आहे. जंगलतोडी संबधी कलेक्टर म्हणतात या जमिनींवर आमचा अधिकार नाही. या जमिनींचे सात-बाराचे उतारे देण्याचा अधिकार आमच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे कलेक्टर म्हणजे महसूल विभाग मोकळा. फॉरेस्ट खाते म्हणते आम्ही काही करु शकत नाही. लोक रात्रीची झाडं तोडतात. आमच्या हातात बंदुका आहेत पण त्या चालवण्याचं स्वातंत्र्य नाही. जंगल तोडणार्‍याना कायद्याचं छुपं संरक्षण आहे. आणि परिसरातले लोक म्हणतात फॉरेस्ट खात्यात भ्रस्टाचार आहे. तेच जंगलतोडीला प्रोस्ताहन देतात आणि पैसे खातात. राजकीय अनास्था इथेही आहे. या तालूक्यातून तिन आमदार आहेत. त्यातलेच एक राष्ट्रवादी कॉग्रेसचे अरुण गुजराथी. त्याच्या रसाळ वाणीतून स्त्रवणार्‍या मधाळ कविता आपण ऐकल्याच असतील. &lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्राच्या जंगलांची कत्तल करुन ८३ हजार हेक्टर जमीन सपाट झाली आहे. जंगलतोडीचं दु:ख आहेच पण त्याहीपलिकडचं वास्तव म्हणजे त्या सपाट झालेल्या जमिनीवरची मालकी मध्यप्रदेशच्या आदिवासी शेतकर्‍यांची आहे. जमीन महाराष्ट्राची आणि शेती मध्यप्रदेशची ही स्थिती म्हणजे अगामी सिमावादाची चाहुल आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर जिथं सुरु होते त्या सुरगणा तालूक्याची सिमारेषा अगदी न आखताही स्पष्ट दिसते. जिथून गुजरात बॉर्डर सुरु होते तिथून हिरवळही सुरु होते. आणि उलटया दिशेला रखरखाट. इथुन महाराष्ट्र सुरु होतो हे ओळखता येते. या दोन्हीच्या सिमारेषांवर चेकपोस्ट आहेत. एक गुजरातचा जो गुजरातच्या हद्दीत आहे आणि एक महाराष्ट्राचा जो महाराष्ट्राच्या हद्दीत आहे. काही मिटर अंतरावर असलेल्या ह्या दोनही चेकपोस्टवर महाराष्ट्राचे जे उत्पन्न आहे त्याच्या शंभर पट गुजरातचे उत्पन्न आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्राच्या एकूण ३६ जिल्यातल्या ३५६ तालूक्यांपैकी २० तालूके दुसर्‍या राज्याना मिळतात. ज्यांच्या सिमारेषा अगदीच पुसट आहेत. अर्थातच अशा बॉर्डरवर भींती घालणे हा उपाय होऊ शकत नाही. पण तरिही इथे त्यांचे आपापसात रोजच्या भेटीगाठीतून काही प्रश्न तयार होतात. त्या प्रश्नाना काही नाजूक वळणं असतात. ती समजून घेऊन वेळीच सोडवली गेली नाहीत तर पुढे त्याचे स्वरुप भयंकर होऊ शकते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इथं बॉर्डरवर राहणार्‍या लोकांच्या मनातून राज्यांच्या सिमारेषांची गणीतं पुसून गेलेली असतात. त्यांचे आपापसात रोटी-बेटीचे, सलोख्याचे, प्रमाचे संबध असतात. महाराष्ट्रात लग्न होऊन आलेल्या मुलीचे बाळंतपण तिच्या माहेरात म्हणजे परराज्यात होते आणि मग जन्माला आलेल्या मुलाची गिनती कुठे करायची हा पेच कलेक्टरला पडतो. कुणी महाराष्ट्राचा असून इतर राज्यात नोंदवला जातो तर कुणाची स्थीती ना घर का न घाट का अशी. काही बिलंदरांची नावे दोन्ही राज्यात. दोन दोन रेशन कार्ड आणि दोन दोन मतदार ओळखपत्र. भाषा हा प्रश्न नसतो. पण तो प्रश्न मानला तर त्याचंही शेवटी राजकारण होतंच. बॉर्डरवर राहणारा दोन्हीकडच्या भाषा लिलया बोलतो. सहज वागण्यातून, बोलण्यातून, व्यवहारातून इथं राहणार्‍या लोकांचे रोजचे प्रश्न जरी सुटले, तरी कदाचित तेच उद्याचे वाद ठरु शकतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-4488017596045305384?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/4488017596045305384/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=4488017596045305384' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/4488017596045305384'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/4488017596045305384'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/08/blog-post.html' title='महाराष्ट्राच्या सीमा जळताहेत'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-4342751995323101014</id><published>2010-07-19T21:35:00.000-07:00</published><updated>2010-07-20T12:00:29.792-07:00</updated><title type='text'>करवटे बदलते रहे....</title><content type='html'>पूर्वप्रसिध्दी : महानगर (संपादक- वृंदा&amp;nbsp; शरद बाळ) : जुलै-२०१०&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र. निसर्गाचं चक्र वर्षानुवर्षे असंच चालू आहे. त्यात आपण आपला क्रम आखलेला असतो. प्रत्येकाला निसर्गानं दिलेली वेळ सारखीच. त्यात ज्यानं-त्यानं आपापली वेळ साधायची. कधी कुणाला हा दिवसाचा वेळ पुरत नाही तर कधी कुणाला तोच दिवस जाता जात नाहीत. दिवस सरतो पण रात्र छळत रहाते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शेता-शिवारात राबणार्‍या, दिवसभर मान मोडून काम करणार्‍याला गाढ झोप लागते. तर काहिना झोपेच्या गोळ्यांचा डोस घेतल्याशिवाय झोप लागत नाही. मनगटाच्या घडीवर डोकं ठेऊन आणि शरीराची पुरचुंडी करुन झोपणार्‍याला पेकाटात लाथ पडल्याशिवाय जाग येत नाही आणि गुबगुबीत गालीछावर लोळत पडलेल्यांच्या डोळ्याला झोप शिवत नाही. कुणाच्या झोपेचा ताबा गोड स्वप्नांनी घेतलेला असतो. तर कुणाच्या झोपेला चिंता कुरतडत असते. दिवसरात्रीचा हा खेळ कुणाच्या वाटयाला कसा येईल हे सांगता येत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे. पावसाची रिपरिप. बाजूलाच बसस्टॉपच्या आडोशाला मी उभा.भरदाव वेगात जाणार्‍या गाडयांचे टायर्स रस्त्यावरच्या पाण्यात सुंदर नक्षी उठवतात. ती ही क्षणभरच. पुन्हा एकजीव पाणी. पुन्हा एकादी नवीन नक्षी. झरझर बदलणारे हे रस्त्यावरचे नक्षीकाम आपल्याला गुंतवून ठेवतं. त्यात वरुन मिसळणारा दिव्यांचा उजेड त्या नक्षित आणखीनच रंग भरीत रहातो. गाडयांच्या वेगाबरोबर वाढत आणि विरळ होत जाणारा आवाज. टायर्सच्या आवाजाची चरचर. पेट्रोलच्या धुरात मिसळणारा प्रकाश आणि पावसाच्या रेघा खिळवून ठेवतात.... आणि तिथं सिटखाली झोपलेला एकजण आपली कुस बदलतो. आपले हातपाय आपल्या अंगाशी आक्रसुन पुन्हा झोपेच्या कुशीत. जन्मापुर्वी आईच्या पोटात बाळ असतं तसं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री दिड वाजता हवा खायला म्हणून हायवेलगतच्याच झोपडपटटीतून आलेलं एक तरुण जोडपं. त्यातला तो म्हणाला आम्ही इथं नेहमीच येतो. त्याची बायको गर्भार होती. मला त्या झोपलेल्याचं कुतुहल होतं. मी त्याला विचारलं तर हा म्हणाला की तो गेली सहा-सात वर्षे इथंच झोपतो. युपी वरुन आलेला आहे. प्लास्टीक मोल्डींगच्या कारखान्यात दिवसभर काम करतो. घरदार नाही. खाणं पिणं इथं तिथंच. आंघोळ कारखान्यातल्या नळाखाली. कपडे साधेसुधे दोनचार. आणि झोपायला इथं बसस्टॉपवर. हा म्हणाला. आता चांगलीच सोय झाली आहे. पुर्वी साधे उघडे बसस्टॉप होते. तेव्हा याचं कठीण व्हायचं. मग कुठंतरी दुकानाच्या वळचणीला. पण आता किमान पाट टेकता येते. तो उठायची वाट बघत होतो. पण उठला नाही. ते ही दोघं निघुन गेले. मी ही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढ चेकनाक्यावर. ओळीत पंधरा विस रिक्षा. काही काही रिक्षामधून मागच्या सिटमधून बाहेर आलेले पाय. जवळ जाऊन बघीतलं तर आत शरीराची मुटकुळी करुन झोपलेले रिक्षावाले. कुणी जाडजुड मागची सिट बसायच्या सिटच्या वर मागून आडवी टाकतो आणि तिच्या उतारावर उताणी झोपतो. त्यातलेच काही जागे. घोळक्याचे चार-सहा. नाक्यावर, अण्णाकडची चहा पिता पिता मी विचारतो, सोये नही? नही, मच्छर काटती है. जब ऐसी नींद आयेगी की काटनेवाली मच्छर भी याद न आये तब जा के सोयेंगे. तब तक चलता है. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तिथंच दोनचार रिक्षा. गिर्‍हाइकाची वाट बघत. कुणी येणारा जाणारा दिसला की कशीही आडवीतिडवी रिक्षा चालवीत त्याच्या समोर. किधर? गिर्‍हाईक असेल तर निघायचं नाहितर पुन्हा आपल्या घोळक्यात. विचारलं नाईट करते हो? तर हां म्हणाला. पर, आज कल कोई मजा नही है. कोई फॅमीली है तो आती है. बाकी साले सब बेवडे. दो चार रहते है. जबरदस्ती घुस जाते है. ना बोलने पर भी सुनते नही. और भाडा देने के टाईम गालीया देते है. रात का टाईम कौन क्या करे. जादा बोलूं तो मारते भी है. क्या करे? ...धंदा है. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरी बात आज कल ये कॉल सेंटर का धंदा बहुत जोर मे है. उनके लिये रात और दिन एक जैसा. रातभर उनकी गाडीया घुमती है. सबको मालूम है. बस के भाडे मे वो छोडते है. कौन जाएगा रिक्षे से. जहां रिक्षा का भाडा सौ होगा वहा ये लोग दस रुपये मे छोडते है. आजकल रात का धंदा करना बहुत कठीन हो गया है. एखाद-दुसरा भाडा मिल गया तो मिल गया नही तो जय सिया राम.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कभी कभी कोई जंटलमन आता है. हात मे बक्सा. दुर का भाडा. मन मे डेढ-दो सौ की गिनती करते करते उसका ठिकाना आता है. लेफ्ट मे खडी करके दो मिनट मे आता हुं करके चला जाता है. और वापिस नही आता. बक्सा खोलके देखे तो खाली. मन मे ही उसको दो चार गाली दे के रातभर जागते रहने का. उस रात निंद आती नही. और दुसरा भी दिन खराब हो जाता है. &lt;br /&gt;&lt;br /&gt;हायवे वर ब्रीज होऊन ट्रॅफीकचा प्रश्न किती सुटला माहीत नाही. पण त्या पुलाखाली काही गरीबांची, भिकार्‍यांची झोपायची मात्र मस्त सोय झाली. इथं झोपणार्‍यासोबत त्याची बायको, दोन चार पोरं टोरं आणि इतरही सगेसोयरे. आजुबाजुला विखुरलेलं सामानसुमान. पुलाखाली एकदम सुरक्षीत. एकमेकांवर तंगडया टाकून, अंगावरचे अस्ताव्यस्त कपडे, आणि बिनधास्त झोप. ताणून दिल्याचा आनंद आणि बेफिकीरी. अधुनमधुन उठणार्‍या खाजेला शांत करीत त्यांची रात्र 'करवटे' बदलत निघुन जाते. पहाटे पहाटे छोटया मोठ्या धंद्याना सुरुवात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रिक्षा-टॅक्सीवाले, भिकारी, चहा-सिगरेटवाले यांच्या सोबतीने मुंबईतली रात्र पेंगत रहाते. काहींची रात्र छपरांच्या आडोशा- आडोशाने सरत असताना. याच मुंबईत काहींची रात्र मूउशार गादया गिरदयात लोळत असते. एसी बेडरुम, त्यात ऐसपैस आकर्षक बेडस, दिलखेचक रंग-संगती, चकचकीत आरसे, मंदसा उजेड आणि गुलाबी स्वप्न पहात रात्रही रंगीबेरंगी होत असतांना. दुसर्‍या दिवसाची वाट पहात जागणारी, पेंगणारी, काम करणारी मिळेल तिथं डुलक्या काढणारी, विश्वासानं कुठेही मान टाकणारी माणसं मुंबईच्या कुशीत आपापले दिवस रात्रीच्या भयाण वास्तवाच्या आधाराने ढकलत असतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-4342751995323101014?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/4342751995323101014/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=4342751995323101014' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/4342751995323101014'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/4342751995323101014'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/07/blog-post_2703.html' title='करवटे बदलते रहे....'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-3583408351861288972</id><published>2010-07-19T10:02:00.000-07:00</published><updated>2010-08-14T04:54:47.383-07:00</updated><title type='text'>तू भिजत रहा</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक - शिरीष पारकर # जुलै-२०१० &lt;br /&gt;&lt;br /&gt;अन्यतः नकाशे बनवण्याची कटकट वाढलीच असती. पुन्हा गेली पन्नास वर्षे नजरेत भरलेला किंवा बसलेला आकार बिघडला असता ते आणि निराळंच. वर फटाक्यांचा, बॅनरवरचा आपला खर्च वाचला तो वाचलाच ना? (...नाही ...नाही, रांगोळ्या वैगेरे आत्ता नाहीत, पुढच्या वर्षापासून. त्याला आधीपासनंच तयारी करायला लागते.) त्यामुळे एका अर्थानं झालं ते बरं झालं. जर तर चा खेळ नेहमी हरण्यातच मजा असते. कारण हारलेल्याचा सल नेहमी माणसाच्या आशा आकांक्षाना अधिक उर्जा पुरवीत राहतो. विजयाचा आनंद एकदाच किंवा वर्षावर्षानं आठवत राहिला असता एवढंच. एक मे ला कंपनी म्हणून आणखी एक दिवस. त्यावरुन पुन्हा भांडणं किंवा सुवर्णमध्य. मग पुन्हा (शिवाजी महाराज जयंती स्टाईल) शिवसेना, मनसे, भाजपा यांची सुटटी एक मे आणि कॉग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे सरकारी हॉलीडे&amp;nbsp;7 जुलै. थोडक्यात बेळगावने महाराष्ट्रात येण्याचा मुहुर्त तुर्तास टळला आहे. हे बरंच झालं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण एक ना एक दिवस बेळगाव महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हे केंद्रालाही माहीत असणार. तिथंली बहुसंख्य जनता मराठी आहे. अगदी आकडेवारीतच बोलायंचं झालं तर ५४.७ % मराठी तर कन्नड भाषिक २३.८ % आणि इतर उरलेले. बेळगावचा मराठी भाग ऐतिहासिक, भाषिक, वाडमयीन, धार्मीक अंगाने महाराष्ट्रीयन आहे. ज्योतिबा, खंडोबा, विठोबा, तुळजाभवानी ही त्यांच्या श्रद्धेची ठिकाणं आहेत. या शहरात एकुण दहा वाचनालयं आहेत. त्यापैकी सात पुर्णपणे मराठी. दोन द्विभाषिक तर एक कन्नड. बहुसंख्य शाळांचे माध्यम मराठी. उर्दु भाषिकांची दुसरी भाषा मराठी. १ डिसेंबर १८९१ साली पंच कमिटी म्हणून स्थापन झालेल्या आणि आता महानगर पालिकेत रुपांतर झालेल्या बेळगाव शहरातील या १३५ वर्षे जुन्या संस्थेचा कारभारही पुर्णपणे मराठीतूनच होत आला आहे. पण पुढे महाजन समितीनेही या मुद्यांकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करुन महाराष्ट्राच्या विरोधीच सुर लावला. ते या ठिकाणी इतरत्र देत असलेल्या तक्त्यातूनही लक्षात येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तालूका&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;गावे&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;भाषिक टक्केवारी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; मराठी&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; कानडी&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; इतर &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;बेळगाव शहर&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ...&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ५२.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; २३.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; २५.०० &lt;br /&gt;&lt;br /&gt;बेळगाव तालूका&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ९&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;९६.१६&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ...&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ... &lt;br /&gt;&lt;br /&gt;अथणी&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; १०&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ६१.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ३३.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;६.०० &lt;br /&gt;&lt;br /&gt;खानापूर&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;५०&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;८६.७०&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ...&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ... &lt;br /&gt;&lt;br /&gt;कारवार&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;५०&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;७८.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; १५.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;७.०० &lt;br /&gt;&lt;br /&gt;सुपा&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; १३१&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;८४.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ६.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; १०.०० &lt;br /&gt;&lt;br /&gt;हल्याळ&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; १२०&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; &amp;nbsp;६२.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;३२.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ६.०० &lt;br /&gt;&lt;br /&gt;हुमनाबाद&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; २८&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ६३.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; १६.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;२१.०० &lt;br /&gt;&lt;br /&gt;भालकी&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ४९&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;५९.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ३०.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ११.०० &lt;br /&gt;&lt;br /&gt;संतपूर&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ६२&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ६०.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; २६.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;१४.०० &lt;br /&gt;&lt;br /&gt;आळंद&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; १०&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ६८.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; २४.००&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp;&amp;nbsp; ८.०० &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या जनतेला महाराष्ट्रात येण्याची आस आहे. बेळगावातल्या 'महाराष्ट्र एकीकरण समिती' नावाच्या पक्षाचे चार-सहा आमदारही निवडून येतात. अपवाद गेल्या निवडणूकीचा त्याची कारणंही आता आपल्या सगळ्यांना माहिती झाली आहेत. तिथल्या महानगरपालिकेतले बहुसंख्य नगरसेवक मराठी असतात. किंबहुना १९८४ सालापासून आजपर्यंतचे १९ महापौर मराठीच आहेत. आपल्याला माहित आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्य वेगवेगळी असली तरी त्यांचा देश एकच आहे. म्ह्टला तर प्रश्न चुटकीसारखा सुटू शकतो. पण तरीही तो भिजत ठेवलेला आहे. आणि तो भिजत राहण्यातच खरी गंम्मत आहे. लोकशाहीत खरंतर लोकभावनाच प्रबळ ठरायला हवी. तरीही बेळगावचा प्रश्न सुटत नाही. त्याला उत्तरोत्तर आणखीनच पेच पडताहेत. हे खरंच अनाकलनीय आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;इथे एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी ती म्हणजे, सिमाभाग हा प्रश्न इतिहासाचा आहे, भुगोलाचा आहे अर्थात भावनेचाच आहे. आणि काँग्रेसला त्यांच्या विरोधकांना फक्त भावनांचे खेळ खेळायला द्यायचे आहेत. भावनेच्या खेळात सामील होणार्‍यांचं शेवटी हसंच होतं. गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रात हा खेळ चालला आहे. या पुढेही चालणार आहे. त्यामुळे काँग्रेस सहजासहजी बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याच्या भावनेला भीक घालणार नाही, हे नक्की. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बेळगाव, निपाणी, खानापूर,कारवार, बीदर, भालकी असा मराठी बहुभाषिक सिमाभाग महाराष्ट्राला न देता तो गेली ५० वर्षे हा विषय कुजत ठेवण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी केंद्राने हा मराठमोळा भाग मैसूरच्या (कर्नाटक) घश्यात ढकलला होता. भाषावार प्रांतरचनेचे नियम धाब्यावर बसवले गेले. असं करण्यामागे कोणतेही निकष नव्हते. असलेच तर ते महाराष्ट्र द्वेशाचे. खरंतर याच बेळगावात १९४६ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाच्या निमित्तानेच संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं गेलं होतं. पण अजून झोप उडाली नसल्यामुळे स्वप्नही तशीच आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गुजरात राज्याची निर्मीती करतांनाही खुद्दा बाळासाहेब खेर, मोरारजी देसाई यांनी डांगी भाषा मराठीला जवळची आहे असा अहवाल दिला होता. तरीही लोकल बोर्डाच्या ठरावावर डांग आणि उंबरगाव हा भाग गुजरात मध्ये घालण्यात आला. तेही घोंगडं अजून भिजतंच आहे. उपरवालेके घर मे देर है अंधेर नही असं आपण म्हणतो किंवा मानतो. सर्व पक्षांनी आपली सर्व शक्ती एकवटून 'जोर लगा के...' म्हणत शेवटचा टोला हाणला, सर्व बळ पणाला लावून एक जोराचा धक्का दिला तर बेळगावचा सीमाप्रश्न धक्क्याला लागू शकतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बेळगावची जनता दुरदैवाने कर्नाटकासोबत नांदत असली तरी तिचं प्रेम महाराष्ट्रावर आहे. खरंतर ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच लग्न करायला मिळावं असं वाटतंच. वाटायलाच पाहिजे. पण तसं न होण्यातही एक गंम्मत असते. ती हुरहुर आयुष्यभर तरी जपता येते. लग्नानंतरच्या नवलाईचे नऊ दिवस संपले की प्रेम, लग्न, संसार या मार्गाने पुढे सरकलेला गाडा नंतर आयुष्यभर ओढत रहावा लागतो. मग 'याच साठी केला होता का अटटाहास?' असं म्हणण्याची पाळी येते. पण नाईलाजाने का होईना वडीलधार्‍याच्या शब्दाला मान म्हणून आपल्याला न आवडणार्‍या माणसाशीही संसार करावा लागतो. तो जर प्रमाणीकपणानं केला तर पुढे बर्‍याच वेळेला (म्हणजे अश्या प्रकारच्या सगळ्याच सिनेमात) एका पावसात प्रियकराची भेट होते. याची बायको आणि तिचा नवराही अकाली गेलेला असतो. भुतकाळातल्या रम्य आठवणी निघतात. नियतीचे आभार मानले जातात. फुलं फुललेलीच असतात. झरे झुळझुळत असतात. वारे वहात असतात. पक्षी गात असतात. वासरं बागडत असतात. मुलं नाचत असतात. झाडं-वेली डोलत असतात. त्याच वेळी यांनी त्यावेळी गायलेलं गाणं बॅगराउंडला पुन्हा वाजत असतं आणि द एंड. तसं विरोधकांचं राज्य येवो अशी कार्नाटकी विठोबाला आपण प्रार्थना करुया. तेवढीच आपली गंम्मत. गेली हजारो वर्षे कानडा असुनही विठोबाला आपण आपला मानला. आता आपल्याला माहितच आहे की बेळगाव आपलाच आहे पण त्याना काही वर्षे त्याला आपला मानु दे. कारण आपल्यापेक्षा इतिहास, भुगोल आणि परमेश्वराचंही वय जरा जास्तच असतं, नाही का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-3583408351861288972?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/3583408351861288972/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=3583408351861288972' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/3583408351861288972'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/3583408351861288972'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/07/blog-post_19.html' title='तू भिजत रहा'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-7098454173062389620</id><published>2010-07-11T09:13:00.000-07:00</published><updated>2010-08-10T04:31:43.113-07:00</updated><title type='text'>केईएम ला केईएम सारखंच ठेवायंच आहे...!!!</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जुलै-२०१० &lt;br /&gt;&lt;br /&gt;केईएम म्हणजे आरोग्य क्षेत्रातली दंतकथा. जन्म मृत्युसोबत इथं जगण्यातल्या तमाम दुखांचीही नोद होत असते. माणसा-माणसातले संबंध, नात्या-नात्यातली वीण, कुटुंब, आप्तेष्ट, मित्रपरिवार, सगे-सोयरे यांच्यातल्या भावभावनांचा खेळ इथंच बघायला मिळतो. आपल्या-परक्याची सिमारेषा सुस्पष्ट दिसायला लागते ती इथंच. आपल्या माणसासाठी रात्र रात्र जागणारी आणि केवळ उपचार म्हणून मारी बिस्कीटाचा पुडा आणि नारळातलं पाणी पुढे करुन तोंडदेखली चुकचुकणारी कित्तेक माणसं याच केईएमनं पाहिली आहेत. वेदना, यातना, पिडा या शब्दांचा कचरा इथं जागोजाग साचलेला दिसतो. आक्रोश आणि आसवांची तर गिनतीच नाही. 'मी'च का? माझ्याच वाटयाला हे सर्व का? असं म्हणून परमेश्वरालाही थेट जाब विचारावा, धारेवर धारावं अशी ही जागा. पाप-पुण्याचा हिशोब मांडायला फुरसत मिळते ती ही इथंच. इथून निघतांना माणूस दोनच गोष्टी बाहेर घेऊन जातो, ते म्हणजे आनंद किंवा दु:ख. कुणाचा वाटा कोणता आहे, कुणाच्या नशीबी कोणते भोग यावेत याची कुंडली काळ मांडत असतो आणि या भोगाची तिव्रता कमी करण्यासाठी अहोरात्र कष्टत असतात डॉ. संजय ओक आणि त्यांचा परिवार. &lt;br /&gt;डॉ. संजय ओक केईएमचे आजचे डीन. पाउणशे वर्षांच्या इतिहासाचे आत्ताचे साक्षिदार. नुकतीच आरोग्य सेवेतली त्यांनी एकवीस वर्षे पुर्ण केली. त्या निमित्तानं त्यांच्याशी बातचीत. गरीब कुटुंबातून वर आलेल्या डॉक्टरचा प्रवास आणि त्यांच्या भविष्यातील स्वप्नांचा लेखाजोखा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;डॉक्टर व्हावसं का वाटलं?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकतर आपल्या हुशार मुलांनी डॉक्टर व्हावं असं स्वप्न आपल्या आईवडीलांनी पहाण्याचा तो काळ. माझ्या वडिलांची मी डॉक्टर तेही सर्जन व्हावं अशी इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. घरातलं वातावरण मी डॉक्टर होण्यास अनुकुल ठेवलं. त्यामुळंच मी शिवाजी विद्यापीठातून एम.बी.बी.एस आणि एम.एस पुर्ण केलं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मुंबईत कसे, कधी आलात? केईएम चे डीन होऊ असं वाटलं होतं?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;१९८६ साली. माझं अकॅडेमीक करिअर चांगलं होतं. ते बघून डॉ. स्नेहलता देशमुख यांनी मला एक पत्र पाठवलं आणि मुंबईत बोलावून घेतलं. आणि मग सुरुवातच झाली. गेल्या १ जुलैला या गोष्टीला एकवीस वर्षे पूर्ण झाली. आजही मला ते दिवस लख्ख आठवतात. मुंबईतलं असं कोणतही मोठं हॉस्पिटल नसेल जिथे मी नोकरी केली नाही. केईएम चा डीन होईन असं स्वप्नातही नव्हतं. मी माझं काम करीत गेलो. डीन होणं ही चांगल्या कामाची पावती आहे असं मी समजतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;रॅगींग या विषयाकडे तुम्ही आज कसे बघता? मुन्नाभाई एमबीबीएस मुळे तो विषय जरा जास्त अधोरेखीत झाला होता. अधुनमधुन वर्तमानपत्रात वाचायलाही मिळतं..&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी ही विद्यार्थीदशेत असतांना सुरुवातीला रॅगींगचा बळी होतो. पण त्याचं प्रमाण अगदीच मामुली होतं. व्हर्बल कमेंटस किंवा गाणी म्हणून दाखव या टाईपमधलं. पण पुढे पुढे धीर चेपला. नंतर याच कॉलेजात मी विद्यार्थी नेता होतो. खाजगीकरणाविरोधी आम्ही आंदोलनंही केली होती. &lt;br /&gt;आज रॅगींग प्रतिबंधक कायदा अस्तीत्वात आहे. त्याला कठोर शिक्षाही आहेत. त्यामुळे काही प्रमाणात त्याला आळा बसला आहे. पण बळी तो कान पिळी या न्यायाप्रमाणं काही गोष्टी छुप्या पध्दतीनं चालू असतात. आज त्याचं प्रमाण निश्चितच कमी झालं आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;डॉक्टर झाल्यावर स्वतंत्र खाजगी प्रॅक्टीस करावी असं वाटलं नाही? काय कारणं होती पैसा, आत्मविश्वास की मराठी माणूस...? &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याही काळी सरकारी नोकरीपेक्षा खाजगी क्षेत्र चढणीलाच होतं. पण नोकरीच करायची असं पहिल्यापासूनच ठरवलं होतं. आणि या माझ्या ठरवण्याला पुर्ण आकार दिला तो देशमुख बाईनी. ज्या मला माझ्या आई समानही आहेत. आजही त्यांच्याशी माझे स्नेहाचे संबध आहेत. त्यांनी माझ्यातला शिक्षक जागा केला. माझ्या भविष्याची दिशा ठरवून दिली. त्याचबरोबर डॉ. प्रकाश जहागीरदार. असे शिक्षक मार्गदर्शक मिळायला भाग्य लागतं. ते मला मिळालं. त्यामुळं इतक्या वर्षातल्या सरकारी सेवेचा मला पश्चाताप नाही. आज सहावा वेतन आयोग आहे. तेव्हा तो ही नव्हता. महिन्या अखेरीचा पगार मध्यमवर्गासारखा मलाही जेरीला आणायचा. पण कामाचं समाधान त्याच्याही पेक्षा शतपटीनं असायचं. जे सुख शांती, समाधान आणि सौभाग्य मला सरकारी नोकरीनं दिलं ते खाजगी प्रॅक्टीसनं कधीही दिलं नसतं. मला आजही माहीत आहे आणि तेव्हाही माहीती होतं की मी जे महिन्याला कमावतो आहे ते मला रोज छापता आलं असतं. पण पैशापेक्षाही वेगळी दुनीया असते ती मला या नोकरीनं दाखवली. खाजगी प्रॅक्टीस करुन मिळवलेला निव्वळ पैसा ते करु शकला नसता.... आणि मराठी म्हणशील तर तो मी आहेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;या व्यवसायात कट प्रॅक्टीस, रिपोर्ट्सचं रॅकेट जोरदार आहे...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे अगदी सुश्रुताच्या काळापासनंच चालत आलं आहे. डॉक्टर म्हणजे देव तरी असतो किंवा यम तरी, अश्या स्वरुपाचे श्लोक तेव्हाही पहायला मिळायचे. सरकारनं काही थेट ह्स्तक्षेप केला नाही तर हे टाळता येणं अश्यक्य आहे. आणि आपला वेळ प्रसंगी खिश्याला चाट देऊन रुग्णांना मदत करणारेही अनेक डॉक्टर आहेत. जिथं वाईट आहे तिथं चांगलंही आहे. आज केईइएम मध्ये कधी कधी अडीच अडीच लाखाच्या सर्जरी विनामुल्य होतात. तपासण्या, औषधांचा खर्चही नगण्य असतो. हे ही आहेच की...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;बोगस किंवा अनधिकॄत डॉक्टर झोपडपट्ट्यातून दिसतात. त्यांच काय?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांना आळा घालणं हे राज्य सरकारचं काम आहे. महाराष्ट्र मेडीकल कौन्सील सारख्या संस्था आहेत. जे याला आळा घालू शकतात. आम्ही म्हणजे महानगरपालिकेच्या असे डॉक्टर निदर्शनास आले तर आम्ही त्याची यादी सरकारकडे सोपवतो. त्यांचं पुढ काय करायचं हा निर्णय सरकारचाच असतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;सरकारी नोकरीच्या काही मर्यादा असतात का? तुमचा काय अनुभव...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सरकार ही एक चौकट असते. पण त्या चौकटीतही स्वातंत्र्य असतं. ते आपलं आपल्याला कळलं पाहिजे. या चौकटीत काहीही न करताही रिटायर्ड होता येतं. पण चॉईस आपला असतो. काही निर्णयांना उशीर होतो. मंजूरी लागते. पण ही त्या कामाची, यंत्रणेची गरज असते. ती गरज आपल्याला कळली की काम सोपं होतं. नुसतंच सरकार वाईट असं म्हणून चालत नाही. त्याच्या चांगल्या बाजू लक्षात ठेऊन आपल्याला नांदावं लागतं. कारण आपला संबध काम होण्याशी असतो. ते करवून घेण्याचं कौशल्य कलेकलेनं आपल्यात डेव्हलप होत जातं. जर ही यंत्रणा नाकाम असती तर ती इतके दिवस टिकून राहिली नसती. तीची म्हणून तिला एक स्ट्रेन्थ आहे. ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आज मी इथपर्यंत पोहोचलो म्हणजे हे मला कळलं आहे, नाही का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;डॉक्टरांचे संप त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. या व्यवसायाला काही पथ्य असावीत की इतर व्यवसायासारखाच हा ही व्यवसाय मोजला जावा? आपल्याला काय वाटते? &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुर्दैवानं आता डॉक्टरी पेशालाही व्यवसायाचं स्वरुप आलंय. ते टाळता येण्यासारखं नाहीये. पण व्यवसायाच्या पलिकडेही जाउन जेव्हा रुग्णांच्या जीवाशी खेळ चालतो तेव्हा ते फारच भयावह वाटतं. आणि संपाचं म्हणशील तर आता सगळ्याच क्षेत्रात एक प्रकारची जागरुकता आलेली आहे. प्रत्येकाला आपल्याला मिळणार्‍या सुखसोई कायम कमीच वाटतात. ज्यानी त्यानी आपल्या मागण्यांसाठी आग्रह धरणं चुकीचा नाही म्हणता येणार. पण त्यासाठी दुसर्‍याला वेठीस धरणं चुकीचंच आहे. डॉक्टरांच्या संपाच्या वेळी रुग्णांचे हाल होतात. हे खरं आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्रत्येक डॉक्टरने खेडयामध्ये जाऊन काही काळ प्रॅक्टीस करावी असा कायदा आहे. पण तो मात्र मानला जात नाही... &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;याला कारण विद्यार्थ्यानी डॉक्टर होण्यासाठी घातलेला पैसा. डॉक्टर म्हणजे पैसे छापण्याचं मशीनच बनला आहे. आणि कायद्याच म्हणशील, तर कायदा म्हणतो खेडयात जा नाहीतर एक लाख भरा. आज लाख रुपये सरकारच्या तोंडावर फेकून आपली सुटका करुन घेणारे कित्तेक आहेत. खरंतर खेडयात आज डॉक्टरांची सगळ्यात जास्त गरज आहे. अगदी ठाण्यापलिकडे चार्-पाच किलोमिटर गेलात तरी तिथं कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या सोई नाहीत. मला वाटतं हे जर खरोखरच असं व्हावं असं सरकारला वाटत असेल. तर तो अभ्यासक्रमाचाच भाग बनला पाहिजे. प्रत्येक डॉक्टरला खेड्यात जाणं कम्पलसरी करायला हवं यातूनच ते हाऊ शकतं. जसं परदेशात मिलिटरीची नोकरी करणं प्रत्येक डॉक्टरला सक्त्तीचं असतं, तसं इथंही व्हायला पाहिजे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;सरकारी खात्यात नवीन दाखल झालेल्या मशीन्स/उपकरणे बिघडली तर ती दुरुस्त करण्याची तजवीज नसते. आपल्या हॉस्पीटलमध्ये असे बंद पडलेले विभाग किती आहेत? &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुदैवानं केईएम मध्ये असं नाही. आज प्रत्येक विभागात बसवलेली अद्ययावत यंत्रणा चालू स्थीतीत आहे. याला कारण म्हणजे आम्ही तशी सोयच करुन ठवलेली आहे. कोणतही नवीन मशीन घेण्याबरोबरच आम्ही कमीतकमी पाच वर्षाचं अन्युअल मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्टच करतो. प्रत्येक मशीन बरोबर मुळ कंपनी तीन वर्षांची वॉरंटी देते. त्यानंतरची पाच वर्षे. कदाचीत यात अधीक पैसे जातात. पण हेतू साध्य होतो. आणि केइएम सारख्या रुग्णालयात कुठलंही मशीन आठ वर्ष राहिलं तरी खुपच झालं&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;रात्री अपरात्री कधीही केईएममध्ये कुणालाही मुक्त प्रवेश घेता येतो? केइएम हॉस्पिटलच्या सुरक्षे विषयी कोणत्या सोयी आहेत? त्या पुरेशा आहेत का?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुरक्षेच्या बाबतीत मी समाधानी नाही. कारण सुरक्षा रक्षकांची संख्या फारच कमी आहे. इथं महिला सुरक्षारक्षकांचीही गरज आहे. कारण काही महिला मार्‍यामार्‍याही करतात. त्यावेळी पुरुष सुरक्षारक्षकाला नुसतं बघत राहण्यापलिकडे काहिच करता येत नाही. अठराशे बेडचं हॉस्पिटल. तेवढेच किंबहुना याहुन जास्त रुग्ण. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक. त्याना बघायला येणारे असा पाच-सात हजार माणसांचा जथा रोज केईएमच्या आवारात असतो. त्याला आवर घालणं निश्चीतच सोपं नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि केईएम्च्या सुरक्षा यंत्रणेचा कार्यभार डीन च्या अखत्यारीत येत नाही. त्याला स्वतंत्र खातं आणि त्याचा कमिशनर वेगळा असतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;स्वच्छतेच्या बाबतीतही इथं अशीच अवस्था आहे...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असतो. पण येणारी माणसं आपल्या सवयीनाही बरोबर घेऊन येतात. थूंकणे हा आपला जन्मसिध्द अधिकार असल्यासारखी माणसं वागतात. जिथे थुंकु नका असं लिहिलेलं असतं त्यावरही माणसं थुंकतात. आम्ही एक रंगरंगोटीचा अभिनव उपक्रम केला होता. प्रवेशद्वाराजवळचे खांब आम्ही रोज सकाळी रंगवून घ्यायचो. पुन्हा रात्रीपर्यंत तो पिचकार्‍यानी रंगलेला असायचा. स्वच्छतेच्या बाबतीत आमच्या कर्मचार्‍यांनी कितीही खबरदारी घेतली तरी ती कमीच वाटते. लोकांनीही आम्हाला मदत,सहकार्य करायला हवे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;खाजगी मदत किंवा कॉर्पोरेट पार्टनरशीपचा काही विचार करता...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;असे अनेक प्रस्ताव आहेत. पण हे मानायला युनीयन्स तयार होत नाहीत. त्याना खाजकीकरण होईल की काय याची भीती वाटते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युनीयनचा आणि व्यवस्थापनेचे संबंध कसे आहेत? &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जसे इतर ठिकाणी असतात तसेच. प्रत्येकानी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली की आम्ही व्यवस्थापन म्हणूनही आमची जबाबदारी टाळत नाही. माझे सगळ्याच म्हणजे जवळजवळ सहा युनीयन्सची संबध चांगले आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तुमच्या कारकिर्दीत सुरु झालेला एखादा उपक्रम...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;इथे जवळजवळ साडेतीन हजाराहुन जास्त स्टाफ आहे. ज्यांचा रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी रोजचा संबध येतो. कर्मचारी आणि इथं येणार्‍या माणसांचं प्रमाण कायम व्यस्त असतं. डॉक्टरांनी, नर्सेसनी, वॉर्डबॉयनी आपल्याशी बोललं पाहिजे. आपलं दु:ख समजून घेतलं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण ते शक्य होत नाही. त्यामुळे कधी कधी गरज नसतांनाही एकमेकांतले संबध ताणले जातात. आणि मग मारामार्‍यापर्यंत प्रकरणं येऊन पोचतात. याला आळा बसावा त्यासाठी अगदी ऑर्डबॉय, आया पासून ते डॉक्टरांपर्यंत आम्ही सॉफ्टस्किल डेव्हलप करण्याचा प्रोग्राम आयोजीत केला आहे. त्याचे परिणामही चांगले दिसताहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;लिखाणाची सवय कधीपासूनची...&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिल्यापासूनच लिहितो. आजवर माझी छत्तीस पुस्तकं प्रकाशीत झाली आहेत. कधी व्यवसायाचा भाग म्हणून तर कधी मनातलं सांगावसं वाटलं म्हणून. लिहित असतो. आजही माझं काही वर्तमानपत्रात स्तंभलेख लिहिणं चालू असतं. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. यातून लोकांशी थेट संवाद साधता येतो. लिहित राहणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आजवरच्या सेवेत आपण समाधानी आहात? पुढची काय स्वप्नं आहेत?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हो नक्कीच... मला सरकारी नोकरीनं जे दिलं आहे ते खाजगी प्रॅक्टीस नक्कीच देऊ शकली नसती. आणि स्वप्नाचं बोलायचं झालं तर मला केईएम केइएमसारखं ठेवायचं आहे. जिथं जात, धर्म, राज्य, प्रदेश याच्या सिमा ओलांडून माणसं आपल्या बरेपणासाठी येतात. इथं येतांना त्यानी हक्कानं यावं. संगवरवरी फरश्यानां, रंगीबेरंगी भिंतीना, कडेकोट बंदोबस्ताला आणि थंडगार एसीच्या गारव्याला बघुन बुजता कामा नयेत. हा परिसर, इथला स्टाफ, इथली जमीन त्याना आपली वाटायला पाहिजे. आज वाटते तशी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-7098454173062389620?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/7098454173062389620/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=7098454173062389620' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/7098454173062389620'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/7098454173062389620'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/07/blog-post_4717.html' title='केईएम ला केईएम सारखंच ठेवायंच आहे...!!!'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-3329990632119941080</id><published>2010-07-11T09:02:00.000-07:00</published><updated>2010-08-14T05:29:16.595-07:00</updated><title type='text'>जिथे सागरा धरणी मिळते...</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जुलै-२०१०&lt;br /&gt;&lt;br /&gt;अथांग निळा समुद्र. सुसाट सळसळता वारा. लाटांची गाज. आजुबाजुत पसरलेला ओला गारवा. क्षितिजावर काळ्या प्रकाशाची आभा. लाटेमागून लाट एका संथ लयीत किनार्‍यावर उतरत रहाते. मनाला गुंतऊन शरीराला रिझवत ठेवते. समुद्रावर लवलवणारा वारा पाण्याला खेळवत राहतो आणि काठावरुन पाण्यात पडणारे प्रकाशाचे कवडसे वरवर नाचत राहतात. मधुनच पडणारी पावसाची सर पाण्यावर थरथरत रहाते. दिवसभराचा शीण मऊशार वाळूत निथळत राहतो आणि आपण अधिक ताजेतवाने, फ्रेश होत जातो. मन वाळूत रुतुन बसतं. पाय निघायचं नाव घेत नाहीत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;...आणि शिटयांच्या आवाज कानावर येतो. ती पोलिसाची असते म्हणून. आता निघावंच लागतं. आणि आपण पुन्हा सिंमेंटच्या चकचकीत जगात. माणसांच्या दुनियेकडे पाठ फिरवून उभं राहिलं तर जगातल्या कोणत्याही समुद्राची गोष्ट वेगळी नसावी. आपल्याच तंद्रीत, आपल्याच नादात. असाच मुंबईचा जुहु समुद्रकिनारा. मुंबईच्या सौंदर्यातली एक नखरेल अदा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास बांधाच्या आडोश्याने, दगडांच्या कुशीत, वाळूत, बसलेली-लपलेली जोडपी घराकडे निघायच्या तयारीत. अंगाला चिकटलेली वाळू झटकत रुतलेल्या पावलांना ओढत सोबतचा आधार घेत धिम्या पावलांनं परतीला लागतात. जशी रात्र चढायला लागते तसे एक एक करुन माणसांचे पाय उलटया दिशेने चालायला लागतात. बारा साडेबारा नंतर उरतात ते श्रीमंत आणि सडाफटींग. त्यांच्यावर लक्ष ठेवायला पोलीस. त्यांच्या पोटाची भुक भागवणारी दुकानं आणि पेटलेल्या शिरीराची आग शमवणार्‍या पोरी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जुहु पोलीस चौकीच्या तोंडावरुन समुद्रकिनार्‍यावर प्रवेश केला की उजव्या अंगाला लागतात ती खानपानाची दुकानं. पण पुर्वीसारखां मुंबईच्या किनार्‍यावरचा ऐसपैसपणा गेला आणि त्यांची जागा या पॉश दुकानांनी घेतली. दिलखेचक रंग, आकर्षक सजावट, भगभगणारा उजेड माणसाना आपल्या दिशेनं ओढत रहातो. पुर्वीचे भेळवाले, पाणिपुरीवाले भय्ये नेस्तनाबूत झाल्यासारखे. आता बहुतेक दुकानांचे मालक मुसलमान, गुजराती, मारवाडी. पावभाजीच्या दुकानावरची दोन पोरं ओरडून ओरडून दुकानाकडे गिर्‍हाईकं खेचत होती. त्यातल्याच एक म्हणाला, 'अभी बारीश है ना. इसलिये. पयले जैसा मजा नही. अभी कुछ नही. पयले घोडा गाडी थी. घोडे की सवारी थी. बच्चोंके लिये गेम थे. सर्कल थे. सोरट था. क्या नही था इधर. पुरा एंजॉयमेंट था. अभी चौपाटीका नक्षा ही बदल गया. मजा नही. कुछभी मजा नही.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपला कॅमेरा आणि सँपलचे लॅमिनेट केलेले फोटो हातात घेऊन एकानं विचारलं, तर नाही म्हणाल्यावर खट्टु झाला. हमारे पास मोबाईल है उससे खिचेंगे तर म्हणाला' ये मोबाईलने हमारे धंदे की गांड मारी है. त्याच्यासारखी विस-बावीस वर्षांची पाच-सहा पोरं डिजीटल कॅमेरा घेउन हा फिरता धंदा करीत होती. पुर्वी पैसे पुर्ण चुकते करुन घरी पोस्टाने आठ-दहा दिवसानी फोटो मिळायचे. आता तिथल्यातिथे पाचएक मिनिटात कॉपी काढुन देण्याची सोय आहे...तरीही ही अवस्था. त्यातूनही काही हौशी असतातच. &lt;br /&gt;&lt;br /&gt;समुद्रकिनार्‍यावर उजाव्या साईडला चालत दोन-तिनशे मिटर गेलं की काली बस्ती आहे. हॉटेल रामदा पाल्म ग्रोव्हच्या मागच्या बाजूस. अंधुकसा उजेड. लांबून पाहिलं तर माणसांच्या काळोख्या प्रतिकृती. दहा एक मिटरवरचं दिसतं. जवळ गेल्यावर तिथं तुरळक पंधरा-वीस माणसं काही बसलेली काही भिरभिरलेली. कुणा कुणाशी तुकडया तुकडयानं बोलत काही बायका. एक बाई जवळ आली. बंगाली होती. गोरीपान. मध्यम बांध्याची. चमकदार साडी. चेहर्‍यावर जाडसर मेकअप. म्हणाली, क्या ...टाईमपास? मी म्हणालो, नही ऐसाही. ...चलेगा? किधर? इधरही. तिनं बोट दाखवलं तिथं चिंचोळा बोळ होता. क्या करोगी. क्या करनेका बोले तो... हिलानेका, दबानेका, इंजॉय करनेका. कितना? सौ रुपया. वो काम नही करती? ...उसका तिनसो रुपया. मी काहीच बोललो नाही...ती, जाने का है क्या? घर जाने का टाईम हो गया. खाली पानी निकालने का है तो बोल पचासमे...मी तरीही काही बोललो नाही तर म्हणाली फोकट का टाईमपास.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मघापासून तिथंच रेंगाळत एकजण उभा होता. ती त्याच्याकडे सरकली. दोन-चार सेकंदाचंच बोलण झालं.. आणि ती दोघं आत समुद्राकडे निघाले. आता वीसेक पावलं चालल्यावर त्यानं इकडेतिकडे पाहिलं. पोजिशन पक्क्या झाल्या. गरजे पुरते कपडे वर(तिचे) खाली(त्याचे) गेले. उभ्या उभ्याच ती दोघ एकमेकांत घुसली. ती अनुभवी होती. त्याला पुरेसा स्पेस करुन देत होती. पाच सात मिनिटांचा हा समागमाचा खेळ सागराच्या पार्श्वभुमीवरचा अजिंठया-वेरुळाची आठवण देऊन गेला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्रीचा दिड वाजतो. शिटया वाजवत पोलीस यायला लागतात. माणसं आपलं आपण समजतात. हातात काठी, बॅटरी घेऊन इथं तिथं शोधत राहतात. कुणी भेटलाच तर निघायची खुण करतात. दोन पर्यंत किनारा सुनसान होतो. आता एखाद-दुसर्‍या कुत्र्यापलिकडे तिथं कुणीही नसतं. आता खाण्याच्या स्टॉल्सवर गर्दी उसळते. पावभाजी, कालाखटटा, भेळपुरी, ज्युस, पानाची दुकानं आपोआप फुलतात. गळ्यात टोपली अडकवून सिगरेट- गुटका विकणारा विकता विकता थकुन जातो. आणि मागून पोलीस शिट्या वाजवीत, काठ्या आपटीत राहतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;निघताना सुर्यही रेंगाळतो. माणसांचंही तेच. मधल्या चौकात फॅशन परेड असावी तसा आठ-दहा पंधरा ते पंचवीसमधल्या तरुण पोरींचा घोळका हसत खिदळत असतो. कुणी झुलत, कुणी बिचकत, कुणी थेट एखाद्या पोरीला गाठतो. बोलतो. पटलं तर तिला रिक्षात बसवून निघून जातो. अडीचच्या सुमारास पोलीसांच्या शिट्यांचा जोर आणखीन वाढतो. हा शेवटचा इशारा आता प्रत्येकालाच कळतो. आता चौकीच्या कठड्याला रेलून चार-सहा पोलीस. रस्ता, मैदान, बससॉप निर्मनुष्य. रिक्षा, टॅक्सीज, बाईक्स, श्रीमंत मुलांच्या कार्स झर झर डोळ्यापुढून सरकत रहातात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता सारं संपलं आहे असं वाटायला लागतं आणि एका गावावरुन दुसर्‍या गावावर ढग सरकावेत तसं जुहु तारा रोड माणसानी भरायला लागतो. आता त्या मुली तिथं जाऊन उभ्या राहतात. पंधराशे रुपयाच्या खाली उतरत नाहीत. सि-प्रिन्सेस होटेलपासून जुहुतारा रोडपर्यंत रिक्षांची प्रदक्षिणा चालू असते. त्यात बसलेल्या पोरी रस्त्यावर उभ्या असलेल्या, बाईक्सवर रेललेल्या, आणि कारच्या काचा खाली सरकाऊन वाट बघत असलेल्या गिर्‍हाईकांशी दोन-दोन शब्द बोलत रहातात. संभाषणाची क्लोजींग लाइन रिक्षावाल्यालाही कळते त्यानुसार तो आपल्या एक्सलिएअटरवरची मुठ फिरवत, आतल्याआत त्यांच्या बोलण्याला गती देत रहातो. त्याच रस्त्यालगत काही मध्यमवयीन माणसं उभी असतात. येणार्‍या जाणार्‍या कारमधुन- बाईकवरुन कुणीतरी त्यांच्याजवळ थांबतं, बोलतं, निघुन जात. त्यांच्याशी बोलल्यावर कळलं, तिथं (आता जिथं बांधकाम चालू आहे) काही छोटेखानी बंगले होते. त्यात पंधरा-वीस पोरी ठेऊन बंदिस्त धंदे चालायचे. ते आता बंद झाल्यामुळे गिर्‍हाईकांचे वांदे होऊ नयेत म्हणून ती माणसं मार्गदर्शन करीत होती. खारला सोळाव्या रस्त्याला शेर्-ए-पंजाब नावाचं हॉटेल आहे तिथं कुठतरी फ्लॅटवर हे लोक गरजवंताला घेऊन जातात. तिथं घेऊन जायचे यांना पन्नास-शंभर रुपये द्यायचे. जमलं तर तिथं बाविसशे रुपये खर्च करुन पोरीसोबत तास घालवायचा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्ध्या किलोमिटरच्या जुहुच्या रस्त्यावर एकच धंद्यातील मालाचा दर पन्नास रुपयापासून बाविसशे रुपयांपर्यंत. साईज इधर्-उधर. मुंबईनं गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांच्या जगण्याची सोय केली आहे, हेच खरं. कुणाच्याही वेळेची आणि भुकेची गाठभेट करुन द्यायला मुंबई सदैव एका पायावर तयार असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-3329990632119941080?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/3329990632119941080/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=3329990632119941080' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/3329990632119941080'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/3329990632119941080'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/07/blog-post_11.html' title='जिथे सागरा धरणी मिळते...'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-2582839373185474242</id><published>2010-07-02T23:03:00.000-07:00</published><updated>2010-07-02T23:03:35.293-07:00</updated><title type='text'>सैनिकहो तुमच्यासाठी...</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # जुलै-२०१० &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सैनीकांच्या आधी महाराष्ट्रात कार्यकर्ते रहात होते. महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचं मोहळ ही ओळख महाराष्ट्र अनेक वर्ष अभिमानानं अंगाखांद्यावर खेळवत आला आहे. आजही कुणी तसं म्हटलं तर पुर्वीचा काळ आठवून माणूस भुतकाळात रमतो. गांधीवादी, समाजवादी, मार्क्सवादी विचारानं या कार्यकर्त्यांची फळी महाराष्ट्राला दिली. मंथन, मनन, चिंतन, वाचन, श्रवण हे शब्द नव्या परिमाणासकट कार्यकर्त्यांच्या रोमारोमात भिनायचे. कार्यकर्ता बोलायला लागला की त्याच्या शब्दाशब्दातून विचाराची एक एक लडी उलगडत जायची. 'आपण समाजाचं काही देणं लागतो' हे केवळ वाक्य नसायचं तर त्यासाठी माणसं आपल्या आयुष्याची आहुती द्यायचे. आपापल्या कुवतीप्रमाने जो तो समाजाला आपलं योगदान देण्यासाठी आतुरलेला असायचां. भारलेला असायचा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या काळात नेताही आपली ओळख 'कार्यकर्ता' अशी करुन द्यायचा. तेव्हा तो आपला, आपल्यातलाच वाटायचा. आपल्यासारखेच त्याचे कपडे असायचे. आपल्यासारखंच त्याचं घर असायचं. असलीच तर आपल्यासारखीच त्याची नोकरी असायची. आपल्यासारखेच त्याचेही प्रश्न असायचे. आपलेपणावर वसलेली समाजाची व्यवस्था असायची. सामान्य कार्यकर्यांची दु:खं नेत्याला माहीत असायची आणि नेत्याच्या घरातला रुबाब कार्यकर्त्यालाही माहीत असायचा. नेत्याच्या साधेपणाची समाजात चर्चा असायची आणि कार्यकर्त्याच्या तडफेचं नेत्याला कौतुक असायचं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवसेनेच्या जन्माबरोबर कार्यकर्ता मेला. त्याच्या जागी सैनीक आला. पण त्याच्या ठाई जुन्या कार्यकर्त्याचा आब, पोक्तपणा नव्हता आणि सैनीकाची शिस्तही नव्हती. शिष्ठाईची जागा हुल्लडपणानं घेतली. विचाराची जागा आदेशानं घेतली. विचार आचरणासाठी असतो आणि आदेश फक्त पाळण्यासाठी. विचारांच्या आचरणात भुतकाळाचं तारतम्य असतं आणि भविष्याचं भान असतं तर आदेश पाळण्यात निव्वळ वर्तमानाचं दडपण आणि अस्तीत्वाची भीती असते. या अस्तीत्वाच्या भीतीनं माणूस फक्त गांगरुन जातो. भेदरुन जातो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवसेनेच्या जन्मापासून आजतागायत मराठी माणूस फक्त भेदरलेल्या अवस्थेत आहे. त्याला कसल्यातरी अनाठाई भीतीनं, चिंतेनं ग्रासलं आहे. ही भीती ही चींता कशाची आहे हे त्यालाही अजून कळलेलं नाही. आपण मराठी असल्याचा अभिमान वाटण्याऐवजी तो त्याचा न्युनगंड बनला. मराठी माणसाचं मराठीपण समजून घेण्यात मराठी माणूस कायम चुकत राहिला. त्याला फक्त सण-समारंभ साजरे करण्यात गुंतवून ठेवण्यात आलं. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला शिकवलं पण महाराजांची थोरवी शिकवली नाही. इतिहासाची पानं चाळून दाखवली पण वाचायला दिली नाहीत. वर्तमानातली तत्कालीक दु:ख दाखवली पण भविष्याचं स्वप्न दिलं नाहीत. त्यामुळे गेली चाळीस बेचाळीस वर्षे मराठी माणूस फक्त शाखेभोवती घुटमळत राहीला. न चुकता दसर्‍याला शिवाजी पार्कवर आणि वाढदिवसाला मातोश्रीवर हजेरी देत राहीला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;इंग्रजांच्या काळापासनच मुंबई ही एक व्यापारी पेठ आहे. इथे कुणासाठीही व्यापार- उदीमाची संधी सारखी आहे. हे दुर्दैव आता आपण मुकाटपणानं सोसतो आहोत. पण वडापावच्या गाडया, आणि झुणका भाकरीची केंद्र उभी करण्यापलिकडे शिवसेनेनं मराठी व्यावसाईकाला कोणतीही ताकद दिली नाही. शिवसेनेने व्यावसाइक तयार केले असतील तर ते फक्त कॉन्ट्रक्टर धर्तीचे. त्याना व्यावसाईकाच्या दॄष्टीपेक्षा मुकादमाची नजर दिली. नोकरीच्या लढयात त्याला जेवढं गुंतवून ठेवलं त्याच्याऐवजी जर त्याला व्यवसाय-धंद्याचेही धडे दिले असते तर आज पाचाचे पंचवीस झाले असते. त्यामुळे आज मराठी माणसाला आहे त्या परस्थीतीत मारुन-मुटकुन जगावे लागत आहे. नोकरी सांभाळण्याच्या कसरती करीत आयुष्यभर नोकरदार बनुन राहण्यापेक्षा तो आज मालक बनून ऐशोआरामात राहिला असता. तरीही जे मराठी व्यावसायीक म्हणून मोठे झालेले आहेत ते स्वतःच्या कष्टानं उभे राहिलेले दिसतात. पण त्यांचाही वर्गणीपलिकडे आणि सोविनिअरच्या जाहिराती पलिकडे यांनी कधी विचार किंवा वापर केला नाही. त्याचे भोग मराठी माणूस भोगतो आहे, भोगणार आहे. आज नोकर्‍यांची संधी नाही आणि भांडवलांची तजवीज नाही. त्यामुळे मराठी माणसाची 'ना घर का ना घाट का' अशी अवस्था आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवसेनेच्या पाठीपुढे असलेला बहुसंख्य मराठी माणूस हा अर्धामुर्धा शिकलेला आहे. गावातून मुंबईत आलेला आहे. झोपडपट्टीत, चाळीतून राहणारा आहे. त्याला शिवसेनेचा आधार वाटणं हे स्वाभावीकच होतं. अर्थकारणाच्या लढाईत त्याला गोंजारणारं कुणीतरी हवंच होतं. या अर्ध्याकच्या मराठी माणसाच्या हातात कायमचं जगण्याचं हत्यार देण्यापेक्षा शिवसेनेनं त्यालाच आपलं हत्यार बनवलं. त्यामुळे मोर्चा असेल, बंद असेल, सभा असेल तेव्हा हाच मराठी माणूस व्यवस्थीत वापरला गेला. मोर्च्याला, सभेला, बंदला वेगळे आणि सेटींग, मांडवलीला वेगळे. त्यामुळे यातली काही मराठी माणसं कायमची मोठी झाली आणि उरली ती कायमसाठी आहे तिथंच राहीली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्रात गेली पन्नास वर्षे (मधली साडेचार वर्ष वगळता) सत्तेच्या मखमली खुर्चीवर काँग्रेसचं सरकार आहे. आणि लोकशाही शासन व्यवस्थेत कोणत्याही खुर्चीला सर्वसामान्याच्या दु:खापेक्षाही हितसंबधाचं राजकारण करण्यातच जास्त रस असतो. ते राजकारण खेळण्यात काँग्रेस पटाईत आहे. सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी कोणताही संबध नसतांना ते निवडणूकीच्या शर्यतीत कायम निवडून येतात यातच सारं येतं. आणि अशीच अवस्था राहिली तर कदाचीत यापुढेही हेच होत राहील. कोणतेही सरकार समाजाच्या विकासाचा विचार करीत नाही असे नाही. पण त्यात सर्वसमावेशकता असते. अमुक एक समाज त्यांच्या डोळ्यासमोर नसतो. त्यामुळंही सरकार मराठी माणसाचा विचार करीत नाही असं वाटत रहातं. आणि हे वाटत रहाणं अनेकदा गैरसमजातून अधीक गहीरं होत जातं. त्यामुळं वेळीच सत्तेचाही अर्थ शिवसेनेनं मराठी माणसाला समजून द्यायला हवा होता. ते ही ते करुन देण्यात चुकले. त्यामुळं १९९५ साली एकदा संधी दिल्यानंतर पुन्हा मराठी माणसांनी शिवसेनेला सत्तेत येऊ दिलं नाही. यापुढे येऊ देतील असं वाटत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवसेनेनं मराठी माणसाला मराठीचा गोजीरा गुलाबी गाजर दाखवून हिंदुत्वाचा कडवट सफेद मुळा हातात दिला तो भाजपमुळं. पण ती व्यापक सत्तेची निकड होती. ती काळाची गरज होती. हे समजावून सांगण्यात शिवसेना अपयशी ठरली. आणि टिकेची धनी झाली. आता आपली गरज संपल्याची भावना मराठी माणसात बळावत गेली. आणि शिवसेनाही सैरभर झाली. ते सैरभैरलेपण ना बाळासाहेबाना थोपवता आलं त्या त्यांच्या वारसांना. त्यामुळे शिवसेना आतून फुटत गेली. दुभंगत गेली. शिवसेनेतले काही महत्त्वाचे आधार दूर गेले हे त्याचे दृष्य परिणाम. पण शिवसेनेनं मराठी माणसाला वेळीचं शहाणं केलं नाही. श्रीमंत केलं नाही. सत्तेचं, बेरजेचं गणीत समजावून सांगीतलं नाही ही खरी मेख आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाळासाहेब आता वयानं थकले आहेत. त्यांच्या चित्तवृती अजुनही जाग्या आहेत, ताज्या आहेत. तोच करिश्मा आजही आहे. पण त्यालाही फक्त भावनांचा आधार आहे. आणि मराठी समाजात त्यांच्यासाठी दयेची, केविलपणाची झालर आहे. बाळासाहेबांच्या बोलण्यात पुर्वीच्या राजकारणाची, सत्तेची आग नक्कीच नाही. असूही शकत नाही. उध्दव ठाकरे उसनं अवसान आणतात पण अजुनही कठीण समय येता ते बाळासाहेबांच्या पाठीमागे लपतात. राऊत, जोशी, देसाई, नार्वेकर यांना आपल्याच जीवावर शिवसेना आहे असं वाटतं पण यांच्यावर मराठी माणसाचा विश्वास नाही. त्यामुळे आता असलेला मराठी माणूस फक्त पुर्वपुण्याईवर शिवसेनेच्या पायाजवळ बसला आहे. पण ही मृत्युसमयी रात्र जागवण्यासारखी स्थीती आहे. भविष्यात शिवसेनेत उरलेले काय दिवे लावणार हे कोणत्याही दिवशी कोणतंही चॅनेल पाहिल्यावर समजतं. कुठलंही वर्तमानपत्र काढलं की वाचता येतं. समाजात खाजगीत बोलल्यावर कळतं. मराठी माणसाचा कानोसा घेतल्यावर लक्षात येतं. वाईट याचं वाटतं की शिवसेनेचा अंत अश्या पध्दतीने व्हावा असं मराठी माणसाला नक्कीच आधी कधीच वाटत नव्हतं याचं. शिवसेनेचा मृत्यु समोर दिसतो आहे. हे मानायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-2582839373185474242?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/2582839373185474242/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=2582839373185474242' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/2582839373185474242'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/2582839373185474242'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/07/blog-post.html' title='सैनिकहो तुमच्यासाठी...'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-8013840673506495097</id><published>2010-06-22T03:07:00.000-07:00</published><updated>2010-06-22T03:07:46.333-07:00</updated><title type='text'>मदनपुरा</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जून-२०१०&lt;br /&gt;&lt;br /&gt;"गांडू, अपनी मा चुदा रहा है क्या?", कितनी बार तेरेको बोला की कपडे को हात मत लगा, फिर भी सुनता नही है साला. भैंचोत. झटापटीचे शब्द कानावर आले आणि मागे वळून पाहिलं. तर एका फळं विकणारा पोरगा शिरा पराठा विकणार्‍या पोराची कॉलर धरुन त्याच्या कानाखाली खेचण्याच्या तयारीत होता. आजू-बाजूचे चार-सहा जण गोळा झाले आणि ते दोघं आपापल्या धंद्यावर जाऊन बसले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;भांडणाचं कारण साधं होतं. एकमेकांना लगडून गाडया लाऊन बसलेले हे धंदेवाले. शिरा पराठा विकणार्‍या पोरानं हाताला तेल लागलं ते पुसण्यासाठी फळवाल्याच्या धंद्यावरचा फडका वापरला होता. त्यामुळं चिडून जाऊन त्यानं त्याच्यावर हात उगारला होता. क्षणभर असं वाटलं ते एकमेकांचा जीव घेतील. पण पाच-दहा मिनिटातच ते नंतर पुन्हा काहीच न घडल्यासारखे शांत. आपापल्या गिर्‍हाइकात गढून गेले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री साडेबाराची वेळ. मदनपुरा. नागपाडा जंक्शनजवळ रात्रभर जागा असलेला हा इलाका. खाण्यापिण्याच्या स्टॉलनं सजलेला. रंगारंग लाईटसचा उजेड. वीस-बावीस वर्षांच्या तरुण पोरांची तोबा गर्दी. हलचल. गडबड. गोंधळ. मेणकापडाच्या छपरांनी झाकलेले छोटे छोटे स्टॉल्स. पावसाची चिकचिक. पायात लुडबुडणारा चिखल. रस्त्यावरच्या डबक्यात साचलेलं गढूळ पाणी. बकर्‍या, गुरा-वासरांची चरण्यासाठीची धडपड. बाईक्स, टॅक्सीची ये-जा. आणि हातगाडया, दुकानाच्या पायर्‍यांवर लवंडलेली माणसं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;झियाउद्दीन बुखारी चौकापासून बाबा सरवर चौका पर्यंत पसरलेला लांबचलांब साधारणतः अर्ध्या किलोमिटरचा हा रस्ता चोवीस तास गजबजलेलाच असतो. जरीकाम करणारे छोटे-छोटे व्यवसाय. बॅगा, चपला बनवण्याचे कारखाने इथे दिवसरात्र सुरु असतात. मुख्यतः युपी-बिहार वरुन आलेले कारागीर आपली रोजीरोटी इथं कमावतात. कुणीही सोबत आपल्या कुटुंबाला बायकापोराना आणलेलं नसतं. एखादाच या धंद्यातून वर आलेला आणि पुढं शेठ बनलेला आपला कुटुंबकबीला आणतो. तोपर्यंत त्यांच्या पोटापाण्याची सोय लावण्याचं काम हा रस्ता करतो. मौलाना आझाद रोड असं याचं नाव.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;इथला कामगार म्हणजे साधारण आठ-दहा ते विस-पंचविशीतला तरुण वर्ग. घामानं मळकट कळकट झालेले कपडे. पायात रबरी-प्लॅस्टीकच्या चपला. वर भोकाभोकांची बनीयन किंवा टिशर्ट. बर्‍याचजणांच्या डोक्यावर मुसलमानी जाळीदार गोल टोपी. हातात सिगरेट-वीडी नाहीतर मोबाईल. वयस्कर कामगारांच्या कमरेवर चौकटची लुंगी, वर बनीयान किंवा कुर्ता. जुन्या जाणत्या अनुभवी धंदेवाल्याच्या अंगावर पांढरेशुभ्र झब्बे-लेंगे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मोकाट बकरे, वासरं केळ्यांच्या सालीवर, कागदांवर ताव मारीत होती. कोंबडयांची हाडं म्हणजे कुत्र्यांसाठी मेजवानीच. अधुनमधुन पावसाची सर यायची आणि ती दुकानांच्या वळचणीला घुसायची. मधेच झोपलेल्यापैकी कुणीतरी झोपमोड झाली म्हणून त्यांना शिवी हासडत उठायचा. पुन्हा मुकाट ती आपला रस्ता बदलायची. रात्रभर ही मुकी जनावर इकडून तिकडे फिरत राहतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अधुनमधुन बाटल्यांची किणकीण ऐकायला येते. ती खुण असते मॉलीशवाल्याची. दारोदार कपबशी विकणारे ज्यापध्दतीनं आपल्या कपबशीचा आवाज करतात. तसाच तो वाटतो. चिराबाजार, मरीनलाईन्स, कामाठीपुरा ते मदनपुरा अशी पायपीट करीत ते मॉलीशवाले आपलं गिर्‍हाईक शोधत फिरत असतात. हाफ कॉर्टर (मराठी माणसाला ती 'चपटी' या नावानं परिचीत आहे) साईझची एक खोबरेल तेलाची आणि दुसरी राईच्या तेलाची अश्या दोन बाटल्यांच्या भांडवलावर कुणीही रात्रभर अडीचशे तिनशेचा धंदा करतो. २५ वर्षाचा अमित इथे गेल्या चार वर्षा पासून हा धंदा करतो. माहीमला राहतो. रात्री आठच्या दरम्यान तो इथे पोचतो. आणि रात्रभर मॉलीशचा धंदा करतो. एवढी मेहनत करुन एखादया गुजराती भाभीचं आमंत्रण म्हणजे दिवाळी. पैसेही चांगले मिळतात आणि टिंबटिबही, असं तो म्हणाला. वेश्याही त्यांच्याकडून मॉलीश करुन घेतात. पण पैसे देत नाहीत. शिव्या देतात. ओळख झाल्यावर फुकट अंग दाबून घेतात. पण त्याला इलाज नसतो. अमित या धंद्यात चांगला मुरलेला दिसला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;नर्गीस बुरखा, ए१ मुस्तफा ज्युस सेंटर, शबरी बेकरी, बिसमिल्लाह रेस्टोरंट, नॅशनल हॉटेल, मामू फिटींग्ज, समुंदर, नॅशनल हॉटेल्स यासारख्या दुकानांवर खास टिपिकल पाटया इथे दिसतात. अधेमध्ये उर्दु-हिंदीतले पोस्टर्स, स्थानीक नेत्यांची पोस्टर्स आपले लक्ष वेधुन घेतात. मशीदीतही रात्री उशीरापर्यंत लोकांची ये-जा चालू होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;डॉ. मोहम्मद रफीक या नावानं इथला दवाखाना रात्री उशीरापर्यंत खुला होता. त्या दवाखान्यावरच बंद करण्याची अधिकृत वेळ रात्री अडीचची होती. त्यानंतरही माणसं बाहेरच्या बाकडयांवर बसून होती. दवाखाना अर्थातच नोंदणीकृत (रजिस्टर्ड) आहे. त्यावर आय-३३७९३ असा नंबर आहे. डॉक्टर एम.डी. आहेत पुढे कंसात ए.एल.टी अशी इंग्रजीत अक्षरं लिहिलेली आहेत. त्यानंतर बी.यु.एम.एस., सी.सी.एच. अशी अक्षरंही आहेत. त्यामुळे डॉक्टर भरपूर काही शिकलेला आहे असा भास होत राहतो. इंग्रजी अल्फाबेटसचा इतका अर्थशुन्य तरीही अर्थपुर्ण उपयोग दुसरा कुठेही पहायला मिळणार नाही. चौकशीत लक्षात आलं की इथं येणार्‍या तरुणांचे आजार सर्दी, ताप-खोकल्याचे असतातच पण बहुतेक करुन गुप्तांगाचे जास्त असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;इथुन पाचच मिनिटाच्या अंतरावर कामाठीपुरा सुरु होतो. कामातून वेळ मिळाला की तिथं विरंगुळयासाठी जाणारे असतात. तिथुनच काहीजण असे कमरेखालचे रोग घेऊन आलेले असतात. पाच-दहा मिनिटांच्या अंतराने त्या रस्त्यावर वळणार्‍या चार-पाच जणांचे घोळके दिसतात. बाकी दिवसरात्र कोंदट जागेत काम करुन, त्याच त्याच कपडयात वावरुन, घामाचे कपडे तसेच अंगावर वाळगून, आंघोळीचा पत्ता नाही, स्वच्छतेचा मागमूसही नाही यामुळे बर्‍याच जणांना चामडयाचे आजार झालेले असतात. ती सगळी तरुण पोरं या डॉक्टराच्या टार्गेटवर असतात. भगंदर, बवासीर, मुळव्याद च्या इलाजाच्या एका डॉक्टरचं क्लिनीकही याच भागात दिसलं. त्याचीही चलती असावी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;खाणं-खिलवणं हे या गल्लीचं वैशिष्टय. चरचणार्‍या तेलाचा, डालडयाचा खमंग वास वातावरणात भरुन राहिलेला असतो.. चिकन बिर्याणीचा घमघमाट. लालेलाल दगडी निखार्‍यावर भाजलं जाणारं सिख कबाब- चिकन तंदुरी, बुर्जी पाव, भगव्या रंगाचा शिरा (हलवा) आणि त्यासोबत मैद्याचा पराठा, बेकरीतली बिस्कीटं, केक, पाव. शानदार रचुन ठेवलेले चिकट मातेरी खजूर, केळ्यांचा ढिग आणि फळांची आरास सोबत पानीकम चहाचा झुरका आपल्याला हैराण करते. नसलेलीही भुक चाळवते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री झोपेत एकजण मोबाईलवर काहीतरी पहात पडला होता. आम्हाला पाहिल्यावर गडबडीन मोबाईलची स्क्रीन त्यानं फिरवली. विचारलं काय? तर 'कुछ नही', म्हणाला. मी म्हणालो, मेरे पास भी है, चाहिये क्या? तर खुलला. त्यानं सांगीतलं. मेरेको उदर (कामाठी पुर्‍याकडे बोट दाखवून) जाना अच्छा नही लगता. तो अपना टाईमपास मोबाईलपर. त्याच्या मोबाईलमध्ये सेक्सी फिल्म्स होत्या. तो म्हणाला, अभी आदत सी हो गयी है. फिल्म देखे बिना निंद नही आती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री तीनच्या सुमारास धिम्या गतीनं एक पोलिस व्हॅन कॉलीस येताना दिसली. झरझर मॅसेज फिरला. आणि चालू असलेले बल्ब गेले. भरभरणारे स्टोव्ह गप्प झाले. मोबाईल आणि सीडी प्लेअरवरच्या कवाल्या बंद झाल्या. हातगाड्यांवर पसरलेल्या खाण्याच्या जिन्नसांवर पांघरुणं पडली. गाडयांजवळचे कामगार पांगले. दोन क्षण चिडीचुप. पोलीसांची गाडी पुढे सरकत गेली. आणि पुन्हा दिवे लागले. स्टोव्ह सुरु झाले. पुन्हा गलबला झाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी विचारलं, पुलीस को इतना क्युं डरते हो? हप्ता नही देते क्या? तर म्हणाले, उनका जितना पगार नही उतनी आमदानी इस रोड से उनको हप्तेसे मिलती है. ऐसे तकलीफ नही देते किसिको. लेकीन उनकी इज्जत रखनी पडती है. एक पन्नाशीतला माणूस पोलीसाला शिव्या द्यायला लागला. तो तिथंच एरियात बफ मशीन चालवतो. म्हणाला, पुलीस की जात हरामी है. उनको कितना भी खिलाव उनकी आदत नही छुटती. लेकीन ये हराम का पैसा है. इसलीये गरीब मजदूरकी हाय उनको लगती है. उनके बालबच्चे देखो. लुले निकलते है. अच्छे निकले तो बेकार, लफंगे निकलेंगे. बीवी बीमार रहेगी. मी विचार केला. कुठं बघायला गेला असेल हा त्या पोलीसांची कौटुंबीक पार्श्वभुमी. पण तो त्याच्या मनातला राग बोलत होता. कदाचीत पोलीसांचं असंच व्हावं असं त्याला वाटत असावं का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईतल्या कित्तेक खाऊ गल्यांची कौतुकं मी ऐकली आहेत. पण तिथं पोटापेक्षा जिभेचेच चोचले जास्त पुरवले जातात. इथलां खाउ हा कष्ट करणार्‍या माणसासाठी आहे. रात्री फक्त पन्नास ग्रॅम शिरा-पराठा किंवा दोन केळ्यांच्या वर पाणी पिऊन झोपणार्‍या माणसाचं जेवण मला पुर्णब्रम्हापेक्षाही ग्रेट वाटलं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-8013840673506495097?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/8013840673506495097/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=8013840673506495097' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/8013840673506495097'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/8013840673506495097'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/06/blog-post_22.html' title='मदनपुरा'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-6590768767731316920</id><published>2010-06-14T07:42:00.000-07:00</published><updated>2010-06-14T07:42:00.459-07:00</updated><title type='text'>अंदाज म्हणाला चुकलो...!!!</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # जून-२०१०&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अंदाज हा माणसाच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. माणसाच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं याना धीर देण्याचं काम अंदाज करतो. अंदाजावर आंधळा चालतो, शेतकरी धान्य पेरतो, व्यावसाईक पैसा फेकतो, जुगारी बोली लावतो आणि सर्वसामान्य माणूस आपलं आयुष्य ढकलत असतो. अंदाजाच्या आधारावर माणसाचं सगळं जगणं उभ असतं. माणसाच्या भविष्यातील प्रत्येक कृतीचा आधार पुन्हा अंदाजच असतो. अंदाजाशिवाय माणूस शुन्य आहे. अंदाजानं चुकू नये नेहमीच बरोबर आणि वेळेवर यावं असं आपल्याला वाटतं ते याचसाठी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अंदाज हा काही हवेत बांधायचा इमला नव्हे. त्याला काही घटनांची, संदर्भांची साथ असते. इतिहासाची जोड असते. आणि एकाच घटनेविषयी जेव्हा एकापेक्षा अनेकजण एकाच पातळीवर येऊन एकसारखा अंदाज व्यक्त करतात तेव्हा त्याला एका अर्थानं समाजाची मान्यता असते. अणि अनेक अर्थानं तो अंदाज ती त्या समाजाची मागणीही असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे अशासाठी, की याआधी प्रत्येक वेळी मराठी माणसाचा अंदाज चुकला आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीची प्रक्रीया इतकी जिवंत होती की त्यावेळी वाटले होते. आता मराठी माणसाचे, मराठी भाषेचे राज्य येणार आणि मराठी माणसाचे भले होणार. त्याला कारणेही तशीच होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातील नेते खर्‍या अर्थाने सर्वसामान्यांचे प्रतिनीधी होते. एस.एम., डांगे, ठाकरे, अत्रे या नेत्यांचे आर्थीक, सामाजीक, सांस्कृतीक जीवन सर्वसामान्याच्याच पंक्तीतले होते, सर्वसामान्य माणसाच्या घरातल्या अडचणी त्यांच्याही घरात होत्या. त्यांच्या व्यक्त्तीगत इच्छा आकांक्षा कवडीमोलाच्या होत्या. सार्वजनीक जीवन उघडया पुस्तकासारखे होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला तर मराठी माणसाचं नक्की भलं होणार असा अंदाज होता. लढयाचं सुत्रही तेच होतं. १ मे १९६० साली संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला. पण त्यामुळे मराठी माणसाच्या आयुष्यात काहीही बदल झाला नाही. मुंबईचा भुगोल आहे तसाच राहिला. इतिहासाच्या पानात संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाची नोंद झाली. नागरीक शास्त्र नेहमीच काळानुरुप आपलं स्वरुप बदलत राहतं. फक्त यानिमित्ताने मराठी माणसाला साजरा करायला आणखी एक दिवस मिळाला इतकंच. लढयातले नेते वयानं थकले. काही गेले. सगळेच संदर्भ बदलले. सर्वसामान्य माणसाचा चेहरा फक्त लढतानाच दिसतो. इतरवेळी तो आपल्या पोटापाण्याच्या, घरादाराच्या व्यापात असतो. तसं यावे़ळीही झालं. पुढचे चालक-वाहक बदलले. त्यांनी आपले मार्ग आपल्या सोईनुसार बदलून घेतले. खादी-कुर्त्यातलं, फाटक्या चपलेतलं समाजकारण मागे पडलं. धोतरांचं, सफेद कपडयातलं, गांधी टोपीचं राजकारण सुरु झालं. सत्तेच्या राजकारणात मराठी माणसाचं भलं करायचं राहुन गेलं. यावेळीही अंदाज चुकला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे १९६६ साली शिवसेना जन्माला आली. मराठी माणसाला पुन्हा हुरुप आला. आता आपलं नक्की भलं होणार असं वाटलं. आपले रोजगार चोरतात म्हणून दाक्षिणात्यांवर राग निघाला. काही प्रमाणात मराठी माणसाला नोकर्‍या मिळाल्या. वडापावच्या गाडया, झुणका भाकर केंद्र, वर्गणी, वसुली असे छुटुरफुटुर धंदे सुरु झाले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेनं मराठी माणसाला सत्तेचं स्वप्नही दाखवलं आणि विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या राजकारणाला मोठा धक्का दिला. शिवसेनेची आंदोलनं, सार्वजनीक बंद मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही लक्षात रहावी अशी झाली. तळागाळात शाखांचा वचक वाढला. कपाळावर केशरी टिळा, वाढलेल्या दाढया-मिश्या, सफेद चपला, सफेद कडक सफारी, क्रमाक्रमानं मोटारसायकली, चार चाकी गाडया, मनगटावर सोनेरी सैलसर घडयाळ, ब्रेसलेट, बोटात चार-सहा अंगठया, गळ्यात दोन-चार चैनी त्याला लटकवलेली वागनखं (यानीच वाघ संपवले असतील काय?), मागेपुढे आठ-दहा चेले-चमचे, तोंडात आवाज कुणाचा आणि गरजेला....जय भवानी-जय शिवाजी. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;१९९५ साली भगवा झेंडा विधानसभेवर फडकला. नंतर मराठी सोडून हिंदु सुरु झालं. साडेचार वर्षांच्या सत्तेनं यांना पार बिघडवलं. काही जणांच्या पुढच्या पिढयांची सोय झाली. पण यात मराठी माणसाची कुतरओढ झाली. सत्तेत गेले ते काय बोलून गेले ते विसरले. त्यामुळे मराठी माणसानी त्यांची जागा त्याना दाखवली. यापुढे पुन्हा सत्तेत दिसलात तर याद राखा कामा अशी सक्त ताकीदच मराठी सांनी शिवसेनेला दिली आहे, असे वाटते. शिवसेना नावाचा विश्वास तुटला. मराठी माणसाचा पुन्हा एकदा अंदाज चुकला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता याच मराठी माणसाच्या खांद्यावर मदार आहे ती राज ठाकरे यांची. किंवा हेच वाक्य उलट करुनही वाचता येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निमित्ताने मरगळलेला मराठी माणूस पुन्हा एकदा जागा झाला आहे. त्यामुळे जे शिवसेनेला द्यायला अनेक वर्ष लावली ती सत्ता किंवा सत्तेचा काही हिस्सा मराठी माणसानं मनसेच्या हातात पदार्पणातच दिला आहे. मराठी माणसानं ही घाई अश्यासाठी केली असावी की त्याला माहित आहे की आता फारच उशीर झाला आहे. आणि कदाचीत ही शेवटची संधी आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईत माझं माझं म्हणावं असं मराठी माणसाच्या हातात आता फार कमी शिल्लक आहे. आशा लावावी असं एकच नाव आहे ते म्हणजे राज ठाकरे. त्यामुळे जे उरलं आहे ते टिकवण्यासाठी तुमचाच आधार आहे. गोरगरीब, सर्वसामान्य माणसाबरोबर तरुण, शिक्षित असा एक मोठा वर्ग आपल्या पाठीशी उभा राहतो आहे. तुम्ही काय बोलता, काय करता याकडे प्रत्येक मराठी माणूस डोळे लाऊन बसला आहे. तुम्ही त्यांचे आशास्थान बनला अहात. बलस्थान बनला अहात. ...मेरे पास राज ठाकरे है असं तो गर्वानं म्हणतो आहे. मराठी माणसानं विश्वासानं मान टाकावी असा एक शेवटचा खांदा आहे. मराठी माणसाचा हा विश्वास तुम्ही जपायला हवा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज सत्तेत असलेले तेरा आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी मिळालेल्या वेळेत जर आपापल्या विभागाचा स्वर्ग बनवला तर पुढचा उरलेला महाराष्ट्र यांच्या गळ्यात संपुर्ण सत्तेची माळ घालेल. पण जर हेच आता कारणं सागंत बसले तर मराठी माणसांनी यांना कोणती कारणं सांगायची?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या ५० वर्षाचा महाराष्ट्राचा, मुंबईचा, मराठी माणसाचा इतिहास बघितला तर त्याचा पुन्हा पुन्हा तेजोभंग झाला आहे. यानिमित्ताने त्याने तुमच्यावर टाकलेला विश्वास खरा ठरो. मराठी माणूस आणि आपण यानी एकमेकांसाठी घेतलेली ही शेवटची संधी आहे. तुमच्याविषयी मराठी माणसाने बांधलेला अंदाज अभंग राहो. खरा ठरो. मराठी माणसाच्या राजकारणात आणि सत्तेच्या सारिपाटात पुन्हा पुन्हा चुकलेला हा अंदाज कदाचित उद्या मराठी माणसाला म्हणेल मी हरलो तुम्ही जिंकलात आणि तुमच्यासमोर होत जोडून हाच अंदाज म्हणेल साहेब माफ करा चुकलो! &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-6590768767731316920?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/6590768767731316920/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=6590768767731316920' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/6590768767731316920'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/6590768767731316920'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/06/blog-post_14.html' title='अंदाज म्हणाला चुकलो...!!!'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-7534219111193406018</id><published>2010-06-08T00:05:00.000-07:00</published><updated>2010-06-08T00:05:27.629-07:00</updated><title type='text'>व्हिटी ते सिएसटी: रात्री १२.४३ नंतर</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जून-२०१०&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री १२.४३ ला पनवेलला जाणारी शेवटची गाडी निघाली की सातही ट्रॅक सुनसान होतात. मागे उरतात त्या फक्त ट्रॅकच्या लांबचलांब ओळी. डीजीटल घडयाळंयातल्या सेकंदांची जलधगती हालचाल. आणि बंद इंडीकेटरच्या कडांवर पेटलेल्या लाल दिव्यांच्या उभ्या माळा. अंधुक प्रकाश. चालू पंखे आणि लक्ष वेधुन घेणार्‍या जाहिराती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;व्हिटी स्टेशनाचं भव्य छत आता आपली नजर वर खेचून घेतं. उंचच उंच नक्षिदार लोखंडी कमानी. काळ्या पाषाणात कोरलेले कसदार खांब. गोल घुमट. भव्य दरवाजे. खांबावर कोरलेल्या पशुपक्षांच्या चेहर्‍याचे आकार. हे बघतांना आपल्याला फक्त इंग्रजाच्या कामाची, कलाकुसरीची आठवण येते. आपोआप आपल्या मुखात त्यांच्यासाठी कौतुकाचे, आभाराचे दोन शब्द आणि आताच्या प्रशासनासाठी दोन शिव्या. त्यानंतर व्हीटी स्टेशनाशी आपलाही संबध तुटतो. आणि आपला प्रवास सुरु होतो छत्रपती शिवाजी टर्मीनसवरुन. जे आपल्याला आपल्यासारखं आहे असं वाटतं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरच्या लाद्या उखडलेल्या आहेत. लाकडांचे, डबराचे,लाकडी घोडयांचे, तुटक्या-फुटक्या सामानाचे ढीग इतस्ततः पडलेले आहेत. नवीन लावलेल्या (चिकटवलेल्या) लाद्यावर त्या अधिक चमकाव्या म्हणून एकजण पॉलीश मशीन फिरवतो आहे. त्या मशीनचा आवाज आपल्या मस्तकात जातो आहे. सफेद चिखलाचे पाट आपलीच आपल्यासाठी वाट काढताहेत. त्याचे ओघळ प्लॅटफॉर्म वरुन सरळ ट्रॅकवर पडताहेत. रेल्वेतून उतरणारी माणसं त्या ओघळावरुन लटपटताहेत. काही शिताफीनं त्या ओघळावरुन उडया मारुन जाताहेत. गाडया येत आहेत. जात आहेत. माणसं उतरताहेत. चढताहेत. वेळ चालला आहे. चालणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर असलेल्या सुरक्षा चौकीतून कुणीतरी एखाद-दुसरा एकदोनदा आतबाहेर करतं. इकडेतिकडे बघुन परत आत. पोलीस उरलेल्यांना पळवायच्या मागे. पोलीसाच्या हातातला दांडा उगारुन मागे जातो त्यासरशी गुढग्यात जरासा वाकलेला कुणीही दुसर्‍या क्षणाला सटकलेला असतो. एक वेडसर बाई पोलिसाच्या अंगाशी झटत रहाते. दांडा उगारल्यावरही ती हटत नाही. हसत- बडबडत राहते. तिथं आधिच ठरल्यासारखी एक महिला पोलिस पुढे येते आणि आता तीच बाई तिला बघुन सरळ चालायला लागते. थेट बाहेरचा रस्ता धरते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री कुणालाही प्लॅटफॉर्मवर वस्ती करायला थांबायला बंदी असते. तरीही प्लॅटफॉर्मचे सगळेच दरवाजे बंद होत नाहीत. शेवटाची ट्रेन गेल्यावरही काहीवेळ दोन स्टॉल सुरु असतात. रिफ्रेश नावाच्या हॉटेलात आवराआवर चालू असते. पोलिस कक्षात दोन-चार पोलीस गप्पा छाटत बसलेले असतात. माणसं इकडून तिकडे करत राहतात. पोलिसातले काहीजण नकळत आल्या-गेल्यावर लक्ष ठेवतात. विपरीत काही घडण्याची शक्यता मावळते. कोपर्‍यावरची मुतारी रात्रभर उघडी असते. बंद असती तरी फरक पडला नसता. स्टेशनच्या पच्छिमेला अनेक ठिकाणी छोटया-छोटया कोपर्‍यात धारेचा आवाज ऐकू येत राहतो. उजेड मिसळलेल्या काळोखातही मुताचा वास आपल्याला ऍलर्ट करीत राहतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता हार्बर- मध्य रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाडया जिथुन सुटतात तिथंल्या मोलळ्या जागेत माणसं आपल्या सामानासह स्थिरावतात. बायका-पोरं-सामानाचा गलका झालेला असतो. लांबरुद मोकळ्या जागेत किमान दोन-अडीच हजार माणसं असावीत. कुणाला बाहेरगावी जाणार्‍या रात्रीच्या गाडया पकडायच्या असतात. कुणी कुणाला सोडायला आलेले असतात. तर कुणी येणार्‍याची वाट पहात असतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मेन लाईनच्या प्रवेश दारावरच चौकशीची खिडकी आहे. खिडकीचा व्यास दहा बाय दहा इंचाचा असावा त्यात आळीपाळीनं किंवा कसंही विसेक माणसं भांबावल्यासारखी काहीही विचारीत असतात आणि आत बसलेला त्याना शांतपणे उत्तरे देत रहातो. कुणाच्या प्रश्नाचे उत्तर कोणते हे ज्याने त्याने समजून घ्यावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मागच्या बाजुने टॅक्सीना आत यायला रस्ता आहे. टॅक्सी तडक आत आल्यावर तिथे ट्रॅफीक पोलिस असतात. ते टॅक्सीला मार्ग दाखवतात. जो टॅक्सीचालकांना अधिच माहित असतो. पण डयुटी म्हणजे डयुटी. सामानाच्या बॅगा, खोकी, माणसं जिथुन आतल्या लॉबीत प्रवेश करतात तिथं ACIL REPISCAN नावांच एक मशीन आहे. त्याच्या घरंगळत्या पटटयावर सामान ठेवलं जाणं अपेक्षीत असतं. पण तिथं ऐछिक असतं. ज्याला सामान ठेवायचं तो ठेवतो. ज्याला नाही, त्याला कुणी विचारीतही नाही. सोईसाठी एन्ट्री आणि एक्झीट साठी वेगवेगळे गेट आहेत. पण वेळेला जे गेट मोकळं आहे तिथुन माणसं पोलिसांच्या समक्ष इकडून तिकडे करीत असतात. साडे-दहा अकरापर्यंत पोलीसांचे घोळके दिसतात. नंतर एखाद-दुसरा. इकडे-तिकडे. ACIL REPISCAN जवळच्या गेटमधून आतबाहेर जाणार्‍या माणसांची मोजदाद होते. वाचले तर दोन गेटवर वेगवेगळे आकडे होते. एकात ५३,३०४ तर एकात ७०. पुन्हा आतबाहेर केलं आता पहिल्या गेटवर एक आकडा वाढला होता. दुसर्‍या गेटवर सत्तरच. आजही सत्तरच असेल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कॅमेरे जागोजाग दिसतात. दिसणारच. २६ नोव्हे.२००८ चा हल्लाच तसा होता. पण जर माणसांच्या, मशीनच्या परिणामकारक वापराविषयी जर अशी हेळसांड होत असेल तर पुन्हा एखादं अघटीत घडल्यानंतरच त्या कॅमेरात टिपलेली चित्र चॅनेलसाठी फक्त ब्रेकींग न्युजच्या कामी येणार आहेत काय? असा प्रश्न पडतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्टेशनवर जिथेजिथे गेट आहे तिथेतिथे एक चौकोनी प्रवेशदार आहे. त्यातून आत-बाहेर जाताना टूं टूं असा आवाज येतो. आवाजाची मजा वाटते म्हणून एखादा बालबुध्दीचा माणूस पुन्हा पुन्हा आत-बाहेर करतो. त्या चौकोनांचा संबध सुरक्षेशी असावा. पण तिथं रक्षकच हजर नसतो. त्या चौकोनांचा उपयोग फक्त वर्धापन दिन किंवा सत्यनारायणाच्या महापुजेच्या दिवशी बल्बच्या माळा सोडायला होत असावा. रेतीच्या गोण्या रचुन ठेवलेल्या चौकोनात पोलीस बंदुक रोखुन उभे असतात. हे कसाबच्या हल्ल्यानंतर सुचलेलं असावं. एक जागी न हलता-बोलता उभ राहणं ही एक प्रकारची शिक्षाच आहे. ती उभ्या असलेल्याच्या चेहर्‍यावर जाणवते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री दोन-अडीच नंतर प्रवासी माणसंही पेंगलेली असतात. काही गाढ झोपेत असतात. झोपेत आपलं अंग/ अवयव खाजवणार्‍या किंवा आपलीच लाळ गिळणार्‍या माणसाकडे बघतांना कसंसंच वाटतं. मजाही वाटते. किळसही वाटतो. अधुन मधुन स्पिकरवर होणारी अनाउन्समेंट गर्दीला चाळवते. सगळ्यानाच आपल्या गाडीचं नाव, वेळ माहीत असते. सामानाची उचलापाचल, झोपलेल्याला जागवणं हा एक अनोखा खेळ रात्रभर फरका-फरकाने चालू राहतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जवळजवळ प्रत्येक गेटपाशी एक लाल रंगात रंगवलेलं टेबल दिसतं. ते खुर्चीला चिकटलेलं असतं. त्याच्यावर 'सुविधा' द कम्प्लेट फॅमिली शॉप ची जाहीतात असतेच. समर्थ सिक्युरीटी सर्वीस कडूनही होलसेल मध्ये फ्लेक्सचे बॅनर छापून घेतलेले दिसतात. एका बाजूला एक ऍबुंलन्स उभी असते. तिचा ड्रायव्हर कुठे आजुबाजूला दिसत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रेल्वेच्या आवारात जिथं जिथं जागा मिळेल तिथं पाटया, बॅनर लावलेले आहेत. त्यावरच्या सुचना आपलं मनोरंजन करतात. म्हणजे 'स्वच्छता हे परमेश्वराचे दुसरे नाव आहे', 'स्वच्छतेसाठी रेल्वेला सहकार्य करा'. प्रश्न पडतो 'स्वच्छता' हे कुठल्या देवाचे नाव आहे? कचरा डब्यातून ओसंडत असतो. जो उचलायला माणूस येतो तो पहाटे. तो नुडल्स उचलल्यासारखा कचरा उचलत होता. सकाळ पर्यंत कचर्‍याचा व्यास वाढतच जातो. फुकट पाण्याच्या नळाभोवती पाणी सांडतेच. त्याच्यावर फडका मारायला कुणीही नसतो. माणसं दिवस असो रात्र असो अखंड खातपीत असतात. कचरा साचतच जातो. माणसानी सहकार्य करायचे म्हणजे काय करायचे? 'कार इज नॉट वर्कींग' असं एअरटेलची जाहीरात असलेली चारचाकी खुली मोटारगाडी सामानाची ने-आण करण्यासाठी बाहेर उभी आहे. कुणी अपेक्षा केली आहे असल्या गाडया चालू असण्याची? लाल डगल्याचे हमाल आहेतच की..! 'प्रवासी सुरक्षा हेच आमचे ध्येय','सुरक्षा पडताळनीस मदत करा',आणि 'सुरक्षेला तडजोड नाही' ...हे करायला माणसं जाग्यावर तर असायला हवीत? आणि सुरक्षेच्या बाबतीत सर्वात मह्त्वाचं वाक्य म्हणजे, "स्वयं की सुरक्षा स्वयं के हात" ही सुचना वाचली की सुरक्षेचे सगळे प्रश्न निकालात निघाल्यासारखे वाटतात. पहाटेच्या दरम्यान एक सुरक्षारक्षक गेटवरच्या मशीनमध्येच डोक खुपसुन झोपला होता. एक पोलीस पायात चपला घालून आणि हातात दांडा घेउन फिरत होता. असे कर्मचारी दुश्मन फुटाच्या अंतरावर आल्याशिवाय काय करु शकतात? सगळ्यानाच आतंकदाद्याला मिठी मारायची संधी दरवेळी मिळेल, असं होणार नाही. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत नुसती बॅनरबाजी करण्यापेक्षा सतर्कच रहाणे फायदेशीर ठरावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;री-फ्रेश नावाचे एक हॉटेल चोवीस तास चालू असते. बाकी सगळ्या गोष्टींबरोबर तिथे दहा रुपयात जनता थाळी मिळते. त्याविषयी काही तक्रार असल्यास एक टोलफ्री नंबरही दिलेला आहे. चेक केला, तर तो चालूही आहे. असा नंबर झुणका भाकर केंद्रासाठीही दिला असता तर ती केंद्र आजही कदाचीत चालू असती. त्याच्याच बाजूला एक मुतारी आहे. मुतारीचा ऑपरेटर जुन्या हिंदी गाण्यांचा शौकीन आहे. पेन ड्राइव्हवर लोड केलेली गाणी तो रिमोट कंन्ट्रोलच्या आधारे बदलत रहातो. स्पिकरच्या आवाजाचा दणकाही मोठा असतो. त्या सुरेल आवाजात इतर आवाज मारला जातो. मुतारीत दोनच संडास आहेत. पाच-सहा माणसं एकाचवेळी एकामागुन एक अशी उभी असतात. लग्नातल्या थाळी सिस्टीमची आठवण होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्टेशनच्या पच्छिमेला मधल्या मोकळ्या आवारात पंधरा-वीस पुरुष-बायका आपल्या पोराबाळांसह, बोचक्यांसह रात्रभर पडलेले होते. तिथंच त्यांच जेवणखाण करणं, मशेर्‍या लावणं, थुंकण, चुळ भरण चालू होतं. दिवसभर फिरुन भांडी विकून कपडा गोळा करायचं काम ते करतात. आणि गोळा केलेले कपडे सकाळी पाच वाजता चिंधी मार्केट मध्ये जाऊन विकतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक चायवाला अण्णा सकाळी चार वाजता गेटवर चहा-सिगरेटी विकत उभा होता. त्या आधी त्याचा भाऊ होता. याच्याकडे धंदा सोपऊन तो स्टेशनात जाऊन झोपला होता. तो वॉचमनची नोकरी संपऊन आला होता. गेली चाळीस वर्ष हे त्यांच काम चालू आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या मागच्या झोपडपट्टीतच तो राहतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री अकराच्या सुमारास एक बावीस-तेवीस वर्षांची मुलगी आपल्याच मुडमध्ये चालत स्टेशनच्या मागाच्या बाजुस असलेल्या बसस्टॉपकडे जाताना पाहिली. अंदाज होताच. खात्री नव्हती. कुतुहलानं तिच्यामागनं गेलो. बसस्टॉपचा काळोखा कोपरा धरुन ती उभी राहिली. आळीपाळीनं तिच्याजवळ माणसं जात- येत होती. दोनचार वाक्यानंतर मागं वळत होती. मी ही गेलो. म्हणाली हजार. लॉज का तिनसो. एसी रुम का पाचसो. आता ती गप्प. मी ही. तिनं माझ्या पायापासनं डोक्यापर्यंत नजर मारली. मला कळलं. मीही मागं वळलो. इकडे तिकडे पाहिल्यावर लक्षात आलं. तिच्याच सारख्या त्याच धंद्यातल्या आणखी पाच-सहा जणी. एकीकडे प्रवासी बॅग होती. मला ही तिची बॅगेची आयडीया आवडली. पन्नाशीची असावी. मराठी वाटली पण तेलगू निघाली. तिनं मला तेलगु येतं का असं तेलगुत विचारलं. मी नाही म्हणालो आणि हिंदीत सुरु झालं. तीनं, 'क्या हुआ' असं विचारलं. तिचा रोख मघाच्या मुलीबरोबर मी बोललो होतो त्याच्याकडे होता. तिनं तिची थोडक्यात बदनामी केली. वो लोग कैसा फसाते है सांगीतले. चलो, म्हणाली छेसो. मी विचारलं, लॉजका कितना? तर म्हणाली नही इसमेही सब हो जाएगा. माझ्या मित्राकडे बघुन ती म्हणाली, दोनोका आठसो. मी काहीच बोललो नाही. ती हसली. आणि चार-सहा पावलं दुर जाऊन उभी राहीली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री दोन वाजेलेले असावेत. दिनशॉ पेटीट गार्डन समोर एक बाई आपल्या तहान्या मुलासह झोपली होती. झिंगलेली होती. तिथं एक घाइघाईत तिच्याच वयाचा पंचविशीतला एक गर्दुल्ला आला. ती बाई कुशीवर होती. त्यानं तिला उताणी केलं. तिच्या पायजम्याची नाडी सैल केली आणि पायजमा गुढग्यापर्यंत खाली खेचला. त्यानं त्याच्या पॅन्टची चैन स्वत:च काढली. पुढची पाच-सात मिनटात काम संपलं. तो उठला. निघुन गेला. त्या बाईनं आपलाच आपण पयजमा वर केला आणि कुशीवर पुन्हा झोपली. पहिल्यासारखी निर्जीव. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे डी.एन रोडवर एक चकाचक मुतारी आहे. इंग्लीश वाटावी अशी. रात्री बंद असते. तिच्या दारासमोर चटई टाकून एक काटकुळा भय्या एका जाडजुड बाईला दाबत बसला होता. ते बघत असताना एका माणसानं हटकलं. क्या देखते हो, असं सुरात विचारलं. कुछ नही. मी म्हणालो. त्याच्या कानाच्या पाळीत हिर्‍याचा खडा चमकत होता. त्यानं गेली दोन-अडीच तास आमच्यावर पाळत ठेवली होती. आणि त्याच्या रेंजमध्ये आल्यावर तो खुश झाला होता. चलो ना...जाओगे क्या?... त्यानं विचारलं. तेव्हा खात्री पटली. तो ही याच धंद्यातला 'माणूस' होता. प्रत्येक शब्दागणीक तो गालातल्या गालात हसत होता. एक बार आओगे तो बार बार आओगे असं आत्मविश्वासानं म्हणाला. बाईमध्ये आणि पुरुषामध्ये (अर्ध्या) काय फरक असतो ते त्यानं सोदाहरण समजाऊन सांगीतलं. त्यान मला विचारलं काय करतो म्हणून मी ही त्याला विचारलं. तर तो लिफ्टमन होता. त्याच बिल्डींगच्या जिन्याखाली तो रात्रीही झोपतो. त्याचं नाव अनील. मुळ दिल्लीचा. थर्माकोलसारखी त्याची गोरी कातडी होती. खाजवली-खरवडली तर पाढंरा भुसा उडाला असता. खुपच खनपटीला आला. म्हणाला देखो तो सही. त्यानं तिथंच बाजुला असलेल्या जिजाऊ लेनमध्ये त्याची झोपायची आणि काम करायची जागा दाखवली. त्याचा नंबरही स्वतःहुन दिला. म्हणाला तुमको नही सही लेकीन दिलवालोंके काम आयेगा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-7534219111193406018?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/7534219111193406018/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=7534219111193406018' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/7534219111193406018'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/7534219111193406018'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/06/blog-post_08.html' title='व्हिटी ते सिएसटी: रात्री १२.४३ नंतर'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-8611081599032157150</id><published>2010-06-03T03:12:00.000-07:00</published><updated>2010-06-03T03:12:36.227-07:00</updated><title type='text'>हो जाएगा साब...!!!</title><content type='html'>पुर्वप्रसिध्दी # महाराष्ट्र माझा - संपादक: शिरीष पारकर # जून २०१०&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्रीचे साडे दहा वाजलेत. दारावरची बेल वाजते. समोर सत्तरीतला म्हातारा. घामानं नखशिखांत भिजला आहे. डोक्यावर पाटी. त्याच्या थरथरत्या देहाकडे पाहतांना अंदाज येत होता, त्या पाटीत तिसेक किलोचं वजन असावं. तो हसत विचारतो, बेटा कलिंगड लोगे क्या? ...मी काहीच बोलत नाही! बोलूही शकत नव्हतो. मी त्याच्या ओघळलेल्या अवताराकडे बघत बसलो. सफेद रंगाचा मळकट कुडता आणि त्याच रंगाचं धोतर. पायात चपला. झिजलेल्या. काळपट रापलेलं शरीर. तिसर्‍या मजल्यापर्यंत तो चढून आला होता. त्याला धाप लागली होती. त्याच्या दोन श्वासामधलं अंतर पार मिटून गेलेलं होतं. आशाळभूतपणे तो माझ्याकडे पहात होता. आणि मी त्याचा चेहर्‍यात माझ्या आजोबांचा चेहरा शोधत होतो. मला कळत होतं, की आत्ता त्याच्याकडचं कलिंगड विकलं जाण्यापेक्षाही त्याला कुणीतरी किंवा मी तरी म्हणायला पाहिजे की, बसा इथं दोन मिनटं पाणी प्या. मग काय ते बोला...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;'बहुत मिठा है बेटा' तो पुन्हा बोलला. भानावर आलो. मी म्हणालो, 'नही चाहिये. माफ करना 'तो पुढच्या दारावर गेला. एक एक दरवाजा करीत आल्या पावली निघून गेला. (मनात होतं पण फक्त दयेपोटी मला कलिंगड घ्यायचं नव्हतं. भावनेच्या भरात केलेले व्यवहार फसतात असा माझा अनुभव आहे. त्या अनुभवाचा राग मी त्याच्यावरही काढला होता.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी विचार करीत राह्यलो, दिवसभर तो अशीच वणवण करीत किती भटकला असेल? तो आज किती चालला असेल? त्यानं दुपारी काय खाल्लं असेल? किती विनवण्या केल्या असतील? किती याचना केल्या असतील? किती शिव्या खाल्या असतील? आणि किती कलिंगड विकली असतील? कुठल्या मराठी माणसाच्या डोक्यावरची पाटी या भय्यानं हिसकाऊन घेतली असेल? कुणाची रोजी-रोटी छिनली असेल?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या भय्याला असं वाटलं नसेल का की, मराठी माणसासारखं संध्याकाळी वेळेवर घरी जावं. गरमागरम चहा घ्यावा. दिवसभराचा राग घरादारावर काढावा. बायकापोरांना शहाणपणा शिकवावा. आजुबाजुचे आपल्यासारखे चार-सहा गोळा करावे. उघडया गच्चीत उघडया अंगाने पत्याचा डाव मांडावा. गरम हवेवर, हापूस आंब्यावर, क्रिकेट, राजकारण, सिनेमा यावरती तोंडसुख घ्यावं. सिरिअल, रिऍलिटी शो यांच्या संगतीत रमाव. सत्संगाला जावं. बाबाबिबांच्या बैठकांना हजेरी लाऊन अध्यात्म समजून घ्यावं. त्यांच्याकडून आपण मेल्यानंतर आपलं काय होणार हे जाणून घ्यावं. पण तो यातलं काहीच करीत नाही. तो काम करीत राहतो. अधिक मेहनत करतो. चार पैसे अधिक मिळवतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या एका मित्राला एका मंत्र्याला पत्र द्यायचं होतं. ते हातानं लिहिलेलं कसं द्यायचं म्हणून तो टायपिस्ट शोधत फिरला. सापडला तो एकदम कंप्युटराइज्ड. म्हणजे सोने पे सुहागा. टायपिस्टही तेज निघाला. खटा-खट पत्र मारुन झाल्यावर, कितना कॉपी असं त्यानं मित्राला विचारलं. आधी वाचायला दे, असं म्हटल्यावर हा गडी भडकला. टाईम नही है. चाहिये तो लेलो...नही तो डिलीट करु क्या? यावर मित्र म्हणाला एका कॉपीचे जादा पैसे घे पण मला वाचायला दे, कुठं काही चुक रहायला नको. असं म्हणाल्यावर हा भाई जास्तच भडकला. आम्हाला काय टायपींग येत नाही काय. उगाच बसतो काय इथं मंत्रालयासमोर. शेवटी टाईप केलेल्या कागदाचे प्रींट आणि पैसे न देता- घेताच विषय संपला. कुतुहल म्हणून त्यानं त्याच्याशीच चौकशी केली तर तो मराठी निघाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या मराठी माणसाच्या डोक्यात एखाद्या गुजराती-मारवाडी माणसासारखा विचार का आला नसेल? की या जागेत बसायचं मला भाडं द्यावं लागतं. विज, कम्पुटर, इंटरनेट, स्टेशनरी, कम्युनिकेशन साठीही खर्च करावा लागतो. हाताशी माणूस ठेवलेला असतो. त्याच्यासोबत आपलाही मेहनताना असतो. सगळा खर्च भागून काही अधिकचंही उरायला पाहिजे कारण आपण व्यवसाय करतो. आणि सगळ्यात मह्त्वाचं की, आता झाला त्या व्यवहारात 'डिलीट' हे बटण प्रेस करायला जेवढा वेळ लागतो तेवढीच ताकद आणि वेळ 'प्रिंट' हे ही बटन प्रेस करायला लागतो. पण प्रिंट हे बटण दाबल्यामुळे त्याला त्याचे पैसे मिळाले असते. आणि प्रिंट मारायच्या आधी तर त्याने टाईपही केलं होतं. म्हणजे वेळ आणि मेहनत दोनीही खर्च झाले होते. अधिक कॉपीचे अधिक पैसेही द्यायला समोराचा माणूस तयार होता. तरी ही तो असं करत नाही. चिडतो, भडकतो. या वागण्याच्या पध्दतीला "मराठी बाणा" असं म्हणतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझा मित्र ज्ञानेश्वर यानं सांगितलेल्या एकाच दिवशी अनुभवलेल्या या दोनही घटना. काल्पनीक नाहीत. वास्तवावर आधारलेल्या आहेत. या दोनही घटनेतली पात्र नावं बदलून मुंबईत इथे-तिथे भेटतच असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सेवा क्षेत्रात (म्हणजे सर्व्हीस इंडस्ट्री. समाजसेवा नव्हे. जो मराठी माणसाचा अत्यंत आवडीचा पार्टटाईम उद्योग असतो) मोडणारा कोणताही व्यवसाय घ्या. इथं कौशल्याला, वेळेला, शब्दाला अधिक किंमत असते. दिलेल्या शब्दात, दिलेल्या वेळेत दिलेलं काम पुर्ण झालं की कोणताही ग्राहक संतुष्ट होतो. तिथं पैसा ही दुय्यम गोष्ट असते. इथं एकच सेवा पुरवणार्‍या दोन माणसांना भेटा. त्यातला एक मराठी आणि दुसरा अमराठी निवडा. काही ठरावीक साच्यातले शब्द दोघाच्याही मुखातून बाहेर पडतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुठल्याही दुरुस्तीच्या धंद्यातल्या माणसाला भेटा. तो भय्या असेल तर म्हणेल ...हो जायेगा साब. तो तुम्हाला पुर्णपणे विश्वासात घेऊन त्या कामाला सोपं करुन टाकतो. कोणताही पर्याय त्याला मान्य असतो. म्हणजे तुम्ही त्याला पुर्ण कॉन्ट्रक्ट द्या, मटेरिअल आणून द्या, किंवा नुसतीच मजूरी द्या. कामाच्या कुठच्याही पायरीवर तो नेहमी 'तयार' असतो. आपल्यासमोर तो काम सुरु करतो. तो धंद्याचं टायमींग साधतो. ऍडव्हान्स घेतो. पुर्ण पैसे येइपर्यंत तो तुमच्यासमोर रडतो. आणि काम पुर्ण करुन लवकर अश्यासाठी देतो की त्याला पुढचा माणूस, गिर्‍हाईक किंवा कदाचित बकरा शोधायचा असतो. तो गुंतून रहात नाही. रिसर्चच्या भानगडीत तो अजिबात पडत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;याउलट मराठी कारागीर बघा. आधी तो धंद्याच्या जागेवर पहिल्या भेटीत भेटला तर एक लाख. भेटला तर तो आपल्या तोंडावर पहिलं वाक्य फेकतो की, साहेब परवडत नाही. म्हागाई वाढली. धंद्याच्या लायनीत पयल्यासारखी मजा नाही. वैगेरे. तरीही मराठी माणूस म्हणून त्याच्याकडे आपण काम देतो. कामाचे पैसे त्यानं जास्तच सांगीतलेले असतात. आपण ते अश्यासाठी देतो की........ राज ठाकरे! भय्यासारखी तो थुकपटटी लावणार नाही, असं आपल्याला उगाचंच वाटतं. तो काम घेतो पण ते आपल्यासमोरच बाजूला ठेवतो. खोलायला लागेल, बघायला लागेल, दाखवायला लागेल म्हणतो. उद्या या असं सांगतो. चहा पिणार का, विचारतो. आपण साशंक मनाने तिथुन निघतो. त्यानं दिलेल्या वायद्यापेक्षा एक दिवस उशीराच जाउया म्हणून पोहचतो तर त्यानं कामाला हातच लावलेला नसतो. आपल्यासमोर तो धुळ झटकतो आणि आत्मविश्वासाने सांगतो. साहेब उद्या...उद्या....नको नाही तर असं करा...परवा नक्की अगदी हंड्रेड पर्सेंट घेऊन जा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-8611081599032157150?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/8611081599032157150/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=8611081599032157150' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/8611081599032157150'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/8611081599032157150'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/06/blog-post.html' title='हो जाएगा साब...!!!'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-5190618038186213369</id><published>2010-05-25T08:40:00.000-07:00</published><updated>2010-05-25T08:40:52.233-07:00</updated><title type='text'>केईएम : रात्रीची एन्ट्री आणि एक्झिट</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # मे-२०१० &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईचा सगळा इतिहास पुसुन उद्या जागोजागी मॉल्स उभे राहिले तरी चालतील. पण केइएमच्या जागी दुसरं काही उभं राहता कामा नये. मुंबईच्या चकचकीत रस्त्यांवर अलिशान गाडया फिरुदे, काचांचे टॉवर्सही उभे राहुदे, जगभरातले ब्रॅन्डस मुंबईकराच्या अंगाखांद्यावर खेळूदे. पण केईएमचं साधेपण तसंच राहुदे. कारण मुंबईतल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्याही गरीब माणसाला त्याच्या आजारपणात मायेनं जवळ घेणार एकमेव ठिकाण म्हणजे केईएम हॉस्पिटल. गेलं पाउण शतक या वास्तुनं गरीबाला आपलंसं केलं आहे, त्याला कुणाची दुष्ट लागू नये. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जवळजवळ साडेपाचशे निवासी डॉक्टर्स असलेलं अठराशे खाटांचं हे हॉस्पिटल दरवर्षी साधारणतः लाखभर रुग्णाना प्रत्यक्ष दाखल करुन घेऊन त्यांच्यावर उपचार करीत असतं. आणि साध्यासुध्या आजारपणासाठी नुसत्या वरवरच्या तपासण्या, इंजेक्शन, औषध-गोळ्या घेऊन जाणार्‍यांची संख्या तर दहा लाखांच्यावर आहे. लांबरुंद पसरलेल्या या दगडी वास्तूला तिचं एक व्यक्तिमत्व आहे. तिची एक ओळख आहे. आरोग्य या अत्यावश्यक आणि कमर्शीअल बनत चाललेल्या सेवेच्या दुनियेत केईएमचा साधेपणाच ग्रेट वाटतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आजारी माणूस सहसा एकटा कधीच हॉस्पिटल मध्ये दाखल होत नसतो. त्याच्यासोबत किमान चार-सहा माणसं तिथं हजेरी लावतातच लावतात. म्हणजे केइएम हॉस्पिटलनं कितीतरी माणसांचा जन्मापासून मृत्युपर्यंतचा प्रवास पाहिला असेल. त्या प्रवासातील असंख्य अडथळयांचे डोंगर पाहिले असतील. आजारातून निर्माण होणार्‍या यातना, दु:ख, भोग अनुभवले असतील. केईएम ही निर्जीव वास्तू आहे म्हणून ठीक अन्यतः त्या वास्तूला जर माणसासारख्या भाव-भावना असत्या तर ती वास्तू कधीच कोलमडून गेली असती. माणसाच्या दु:खाचं महाभारत केईएमनं पचवलं आहे. यापुढेही हा सिलसिला असाच चालत राहणार. रहायला पाहिजे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिवसभराचा उकाडा संपून उघडया रस्त्यावर जराशी हवा खेळते आहे. रात्रीचे साडेबारा वाजून गेलेत. केईम समोरच्या सिग्नलचे सगळे दिवे बंद होऊन आता फक्त ऑरेंज रंगाच्या दिव्याची उघडझाप होते आहे. हॉस्पिटलच्या आणि काळोखाच्या पार्श्वभुमीवर ऑरेंज रंग किती भयानक दिसू शकतो. याची कल्पना इथे होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;केईएमच्या गेट क्रमांक दोननं आत गेल्यावर तिथं एक मोकळी लॉबी आहे. उजव्या बाजूला दिवसरात्र चालणारं केमिस्टचं दुकान. तिथुनच दहा पावलावर ओपिडी. तीही रात्रभर चालू. बाहेरुन आलेला पेशंट तिथं दाखल केला जातो. रात्री अकरानंतरही अधूनमधून कुणी ना कुणी तिथं येतच होतं. आलेल्या प्रत्येक पेशंटला सावरण्यासाठी आठ-दहा माणसं असतात. पण पेशंट बरोबर आत फक्त एकच रहा असं सांगायला सिक्युरिटी,डॉक्टर, काहीवेळेला पोलिसही येतात. हेच सांगणारी दारावर पाटी आहे. पण तिचा काही उपयोग नसतो. यात सगळ्यांचीच दहाएक मिनिटं मोडतात. पण याला इलाज नसतो. शेवटी पेशंटसोबत उरतो तोच त्याच्या जवळचा. बाकीचे सगळे आप्तेष्ठ, सगे सोयरे आणि मित्रपरिवार. जे बाहेर आसपास रेंगाळत राहतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याच लॉबीत डाव्या बाजूला संयोग गणेश नावाचा गणपती आहे. काहीना विषेशतः पेशंट सोबत येणार्‍या कार्यकर्त्यांना त्याची माहीती असते. ते त्याच्या पुढयात येतात. पायातल्या पायात चपला-बुट सरकवतात. खडेखडे पाया पडतात आणि निघुन जातात. मग त्याचं बघुन कुणी त्याच्यानंतरही तेच करतात. हे थोडावेळ चालतं. मग पुन्हा शांतता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;याच चौकोनी परिसरात रात्री माणसं मारुन टाकल्यासारखी इतस्ततः पडलेली असतात. पिशवीचा- चपलेचा आधार उशाला घेऊन. ते ही न मिळाल्यास हाताच्या मनगटावर डोकं ठेऊन रात्रभर पडून राहतात. मिळालाच तर एखाद्या वर्तमानपत्राचा तुकडा घेऊन तिथंच पसरतात. काही माणसं जागीच असतात. अधुनमधुन एखादी डुलकी. अन्यतः टकटक इकडंतिकडं भांबावल्यासारखी बघत. एखाद दुसरा एकमेकांशी बोलत, गप्पा मारत असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तासा दोन तासानी पंधरा-वीस जणांचा घोळका निशब्द चेहर्‍यांने ओळीत बाहेर पडतांना दिसतो. ही खुण माणूस गेल्याची असते. काहीच्या डोळयात पाणी तरारलेलं असतं. कुणाचा हात कुणाच्या खांद्यावर असतो. जन्ममृत्युमधला खेळ कुणीतरी कुणालातरी सांगत-समजावत असतो. सगळं संपल्यानंतरची हतबलता किंवा सुटल्याचे भाव एकमेकांच्या चेहर्‍यावर पसरलेले असतात. त्यातल्याच कुणाचीतरी सराइतपणे पुढची तयारी सुरु होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री दिड-दोनच्या दरम्यान एक म्हातारा हॉस्पिटल्च्या मागच्या बाजूस ३१ नंबरच्या खिडकीवर जिथं औषध मिळतात तिथं ठोठावत होता. विचारलं. तर म्हणाला, " देखो ना, कोई नही है". खिडकीतला दिवा लागलेला होता. तिथला माणूस जाग्यावर नव्हता. तिथं बहुदा औषध फुकट मिळत असावीत. त्या माणसाच्या नाकातून रक्त गळत होतं, काय झालं असं खुणेनंच विचारलं. तर रडायला लागला. पैसे नाहीत म्हणाला. हातातला केसपेपर, औषधाच्या चिठठया दाखवायला लागला. काय झालं म्हणून पुन्हा विचारलं, तर अर्ध्याकच्च्या मराठी हिंदीत म्हणाला, काळाचौकीतून आलोय, तिथं एक माणूस बायकांसमोर दारु पिऊन अचकट विचकट चाळे करीत होता. याला त्याचा राग आला. म्हणून विचारलं तर त्यानं याच्या अंगावर हातातली बाटली फेकून मारली. डोळा वाचला. नाकाच्या वरती फाटलं होतं. रक्ताचा ओघळ थांबत नव्हता. डॉक्टरनंही मलमपटटी न करताच त्याला इकडं औषध आणायला पिटाळला होता. आणि हा खिडकीवर ठोठावत होता. तो पण प्यायलेलाच होता. त्यामुळे खिडकीवर ठोठावण्याचा वेग आणि आवाज वाढत गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेटवर गाडी उभी राहिली की गेटसमोरचा आडवा दांडा आपोआप वर येतो. तपासायच्या भानगडीत कुणी पडत नाही. जागोजागी सिक्युरीटी आहे. पण सुस्त. काही अघटीत घडल्याशिवाय यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे खुर्च्या गरम करीत जो तो आपापल्या जागी बसलेला असतो. सगळ्या मुंबईची सिक्युरीटीची जबाबदारी उत्तरप्रदेशी मुलं सांभाळत असताना इथे सगळे मराठी. हे ही काही कमी नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिल्या मजल्यावर लांबचलांब गॅलरीत दोनही बाजूला माणसं पडलेली असतात. अधेमधे लाकडी बाकडी आहेत त्यावरही कुणी झोपलेला असतो. इथं बसल्यावर लक्षात येतं. लाकडी बाकडयावरची माणसं अधुनमधुन वळवळत असतात. आजुबाजुशी बोलल्यावर कळलं की, रात्री ढेकुण जागे असतात. इथल्या शांततेला भंग करणारी एक पाण्याची संततधार खाली पडत असते. हे पडणारं पाणि एसीचं असावं असं वाटतं कदाचित टाकी ओहरफ्लो सुध्दा होत असावी. पण हा आवाज आपल्याला टाळता येत नाही. केईएमचे व्यवस्थापन या आवाजाला का टाळत असावे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तरुण डॉक्टर्स जिन्सच्या पॅन्टस. सफेद डगला आणि गळ्यात स्टॅथोस्कोप घेऊन इकडून तिकडे. अधुनमधून बाहेर ज्युस सिगरेटी किंवा काही खाण्यापिण्यासाठी फिरत असतात. गरीब पेशंटच्या आजुबाजूला ही गोरी-गोमटी तरुण डॉक्टर पोरंपोरी फारच श्रीमंत वाटतात. या हॉस्पिटलमध्ये येणारे बरेचसे रुग्ण गरीबच असतात, त्यांच्याशी वागण्याची डॉक्टरांची पध्दत पाहिली की कधीकधी अश्या ज्युनीअर डॉक्टरांना फटके का पडतात याची कल्पना करता येते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;नर्सेसची लगभग चालू असते. सिनिअर नर्स फोन आणि खुर्ची सोडत नाही. काहीतरी लिखाण चालू असतं, कुणावरतरी ओरडणं चालू असतं. पण ज्युनीअर इकडे-तिकडे येरझार्‍या मारीत असतात. त्यातून आया नावाची जमात बिनधास्त वावरताना दिसते. चेहर्‍यावर तिटकारा आणि तोंडाचा पटटा चालू अश्या अवस्थेत त्या काम करीत असतात. वॉर्डबॉय आपल्याच तोर्‍यात कानाला हॅन्डस फ्री लाऊन गाणी ऐकण्यात किंवा बोलण्यात दंग असतात. बरेचसे रुग्णांचेच नातेवाईक स्ट्रेचर इकडून तिकडे नेताना दिसतात. हे काम वॉर्डबॉयचं आहे हे कुणी कुणाच्या लक्षात आणून द्यायचं?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;केइएम परिसरातलं आदिती, ओन्ली फिश, व्हेज ऑलवेज सारख्या चकचकीत हॉटेलच्या तुलनेत मिलन हॉटेल अनेकानां आपलं वाटतं. त्या होटलनं आपला गरीब चेहरा गेली अनेक वर्ष आहे तसाच ठेवला आहे. फुटपाथ पुर्णपणे अडवून बसलेल्या या हॉटेलांनी आजवर कित्तेक महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचे खिसे गरम केले असतील. त्याचं त्यानाच ठाऊक. अधुनमधुन महानगरपालिकेकडून फुटपाथ साफ केली जातात, अतिक्रमणावर हल्ले केले जातात, पण पुन्हा दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासनं परिस्थीती जैसे थे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;हॉटलामध्ये जाऊन बसून खाण्याइतपतही ज्यांची ऐपत नाही त्यांच्यासाठी बुर्जीपाव, राईस, पावभाजी च्या गाडया अगदी कामगार मैदानापर्यंत उभ्या असतात. बारा-पंधरा इंचाच्या तापलेल्या लोखंडी तव्यावर तेल आणि पाण्याचे फवारे चरचरत असताना पाहणं मोठं मजेशीरच. भाजीला आलेल्या उकळ्या आणि बुर्जीला सुटत असलेलं तेल पाहतांना नकळत भुक लागल्यासारखी वाटते. आजपर्यंतच्या माझ्या खानपानाच्या अनुभवात पावभाजी या जोडगळीतले पाव नरमच असतात. इथे एका माणसाने कडक पाव असं म्हटल्यावर मी कुतुहलानं पाहिलं तर. भाजी करणार्‍या पोरानं पाव पोटात फाडून त्याला उलटा शेगडीला पालीसारखा चिकटवला. पाव दोन मिनटात नरमचा कडक झाला होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या गाडया बाराच्या पुढे थांबत नाहीत. कारणं तिच. पोलीस वैगेरे. पण नंतर अगदी केईएमच्या दारावरच रात्रभर ऑमलेट बनवणारी बाकडी असतात. पेशंटचे नातेवाईक, पिऊन चुकलेले, भुकेलेले आणि टॅक्सीवाले मात्र यावर तुटून पडलेले असतात. चहा तर असतोच. सिगरेटी, गुटका, तंबाकू यांचीही सोय असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;केईएमच्या गेटवर निपचित उभ्या असलेल्या ऍम्बुलन्स आपलं चित्त वेधुन घेतात. गर्दीला भेदून रोरावत जाणार्‍या या अऍम्बुलन्स आता दबा धरुन बसल्यासारख्या वाटतात. ऍन्बुलन्सच्या सफेद रंगावर उलटया क्रमाने लिहिलेली लाल अक्षरे वाचवत नाही. कितीतरी माणसांनी यातच आपला प्राण सोडला असेल. कितीतरी जणानी मृतुनंतर स्मशानापर्यंतचा प्रवास केला असेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्रीच्या गडद शांततेत एखादी ऍम्बुलन्स भोंगा वाजवत आत शिरते. तेव्हा इथं उभ्या असलेल्या प्रत्येकाचेच डोळे कान टवकारतात. नकळत ऍम्बुलन्सच्या दिशेने माना वळतात. उताणी पडलेला पेशंन्ट. त्याला सावरणारे त्याचे नातेवाईक. लगबघीनं पुढ आणली जाणारी स्ट्रेचर. दोन-पाच मिनिटांचा हा खेळ. पुन्हा जो तो आपापल्या व्यापात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;केईएमच्या परिसरात रात्र गजबजलेली नसली तरी जागी असते. कारण कोण, कधी, कसे एन्ट्री आणि एक्झीट घेईल माहीत नसते. त्यामुळे बाकी उरलेल्यांचा जन्म आणि मृत्युच्या मध्ये थांबून टाईमपास चाललेला असतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-5190618038186213369?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/5190618038186213369/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=5190618038186213369' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/5190618038186213369'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/5190618038186213369'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/05/blog-post_25.html' title='केईएम : रात्रीची एन्ट्री आणि एक्झिट'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-3470724621568981550</id><published>2010-05-23T03:17:00.000-07:00</published><updated>2010-05-23T03:17:03.432-07:00</updated><title type='text'>आता पुन्हा भेटू १ मे २०२०...!!!</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # मे-२०१० &lt;br /&gt;अश्याप्रकारे १ मे २०१० या दिवशी महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झालेला आहे. मागच्यावेळी म्हणजे १९८५ साली आपण रौप्य महोत्सव (जो २५व्या वर्षी करतात) साजरा केलेला होता. तसे आता पुन्हा भेटू एकदम दहा वर्षानंतर १ मे २०२० या दिवशी. कारण तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीला ६० वर्षे झालेली असतील. साठीला ... महोत्सव म्हणतात. त्यानंतर पंचाहत्तरी (म्हणजे अमृत महोत्सव). शेवटी शंभरी (म्हणजे हिरक महोत्सव) शंभरी मात्र वर्षभर साजरी करण्याची पध्दत असते. त्यामुळे ते वर्ष हरेक प्रकारे आणि चवीचवीनं साजरं होत राहणार. थोडक्यात शंभरीला कुणावर तसा म्हणजे आता सारखा स्ट्रेस नसणार. एकदम आपापल्या सोइप्रमाणे. समोरचा कोणते इव्हेन्ट करतो आहे? कोणत्या आयडीया वापरतो आहे? कोणते कलाकार नाचवतो आहे? कोणाला गाववतो आहे? किंवा कोणाला धाववतो (म्हणजे प्रायोजक, जाहिरातदार या आर्थाने) आहे? काडीचाही संबधं नसला तरी अश्यावेळी पुरस्कार वैगेरे दिले जातात. ते कुणाला द्यायचे? या सगळ्याचा अंदाज घेत घेत युक्त्या लढवल्या जातील. समोरच्या पेक्षा आपली आयडीया जड गेली पाहीजे याची प्रत्येकजण काळजी घेईल. काही पत्रकार सगळ्यांचे मित्र असतात. त्यामुळे(च) आयत्यावेळी(च) गोची(च) होते. यार्षीच्या अनुभवावरुन तो अति संवेदनशील विभाग स्वतंत्रपणे हाताळला जाईल. बर्‍याच वेळेला म्हणजे त्या त्या वेळेला त्या त्या माणसांचं महत्त्व असतं. म्हणजे यावर्षी जसे बाबासाहेब पुरंदरे सगळ्यानी पुरवून पुरवून वापरले तसे. त्यामुळे तश्या ऐतिहासिक माणसांचं ऍडव्हान्स बुकींग करुन ठेवण्यात येईल. एकुण काय पुढची दहा आणि त्यापुढचे अंतराअंतरावरचे गॅप भरेपर्यंत आपण रिकामे बसुयात. यापेक्षा आपण काय करु शकतो.&lt;br /&gt;कोणत्याही व्यक्तीच्या, घटनेच्या, संघटनेच्या जन्मानंतर या(च) वर्षाना महत्त्व येतं किंवा असतं. ते वर्ष पुर्ण झालं की निदान भाषण करणार्‍याला, लेखन करणार्‍याला पहिलं वाक्य तरी आयतं मिळतं. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीला ६० वर्ष पुर्ण झाली तरी... अजून अमकं ढमकं झालं नाही... इ...इ... (या गाळलेल्या जागेत काहीही टाकून बघा. एकदम फिटट बसतं) ...याचा काय संबध? पण आपलं अशी वाक्य वापरायला, ऐकायला, वाचायचा बरी वाटतात. बोलणार्‍याला काही बोलल्यासारखं वाटतं. ऐकणार्‍याला काही ऐकल्यासारखं वाटतं.&lt;br /&gt;१ मे हा दिवस मराठी माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचा आहेच. तो का आहे हे इथे समजून घेतलं पाहिजे. (माहीती आहे त्यांनी वाचू नये) राज्यांची निर्मीती करतांना किंवा राज्यांच्या सिमा ठरवतांना भाषावार रचना असावी म्हणजे ते राज्यांच्या विकास, प्रशासन या सगळ्याच अंगानं सोईचं होईल. हे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासनंच म्हणजे जेव्हा १९२० साली कॉग्रेसची घटना तयार करण्यात आली तेव्हापासनंच ठरलं होतं. मोतीलाल नेहरु, तेज बहादूर सप्रू इ. मंडळी ते ठरवीत होती. पण पुढे मुंबईच्या बाबतीत धन-दांडग्यांचा हस्तक्षेप वाढत गेला. आणि चित्रही बदलत गेलंय. इंग्रजांच्या काळापासनंच मुंबई सधन होत होती. इथला व्यापार- उदीम, अर्थकारण श्रीमंतांना भुलावीत होतं. &lt;br /&gt;१९४६ साली बेळगावला मराठी साहित्य संमेलन झालं. त्यात पहिल्यांदा "संयुक्त महाराष्ट्र" या मराठी भाषिक प्रांताची मागणी करण्यात आली. त्याठिकाणी साहित्य संमेलनात राजकीय नको म्हणून नंतर शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै १९४६ रोजी "संयुक्त महाराष्ट्र परिषद" अशी सर्वपक्षीय आणि अपक्षीय संघटना स्थापन करण्यात आली. या समितीने दार कमिशन जे भाषिक राज्यांच्या प्रश्नावर काम करीत होते, त्यांना निवेदन दिले. दार कमिशनचा रिपोर्ट १९४८ साली प्रसिध्द झाला. त्यात त्यांनी भाषावार प्रांतरचना अमान्य केली होती. मग त्याचा फेरविचार करण्यासाठी जे.व्ही.पी. समिती (जयरामदास दौलतराम, वल्लभभाई आणि पट्टाभी सितारामय्या) स्थापण्यात आली. त्या समितीची "भाषावार राज्ये तुर्त बनवूच नयेत पण ती बनवायची असल्यास मुंबई शहर वगळून संयुक्त महाराष्ट्र द्यावा", अशी शिफारस होती. &lt;br /&gt;पुढे १९५३ साली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. पुढचं एक वर्ष हा आयोग फक्त निवेदने स्विकारीत होता. १९५५ साली त्याचा अहवाल आला आणि महाराष्ट्राचा पुर्णपणे भ्रमनिरास झाला. त्यानंतर पुढे याच विषयावर १९५५ साली फजलअली कमिशनचा अहवाल प्रसिध्द झाला. त्याचाही नूर तसाच होता.&lt;br /&gt;एकूण काय तर, समित्यांवर समित्या निर्माण होऊनही भाषावार प्रांतरचनेचा तिढा सुटत नव्हताच किंबहुना तो अधिकच किचकट बनत होता. १९५६ च्या जानेवारीत १६ तारखेला पं. नेहरुनी त्रिराज्य योजना जाहीर केली. महागुजरात, मुंबई आणि विदर्भासह महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रात बेळगावमधील कारवार नव्हते हैदराबादचा बिदर जिल्ह्याचा मराठी भागही नव्हता. मुंबई तर नव्हतीच. आधीच कट केल्याप्रमाने त्यादिवशी मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. आणि अपेक्षेप्रमाणे दुसर्‍या दिवसापासूनच मुंबईत धुमच्छक्री चालू झाली. जानेवारी १५ च्या रात्री प्रबोधनकार ठाकरे, नाना पाटील, कृष्णा देसाई, लालजी पेंडसे, गुलाबराव गणाचार्य अशा जवळजवळ २९ जणाना अटक करण्यात आली. त्यानंतर गिरगावात ठाकूरद्वार इथे दंगल उसळली. आंदोलकांनी दोन ट्रामगाडया आणि बसेस जाळण्यात आल्या. त्या रात्री बंडू गोखले नावाचा नाइट स्कुलचा विद्यार्थी पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला. तोच पहिला हुतात्मा. आणखी चार जणाना गोळ्या लागल्या. आणि त्यानंतर मुंबईने पेट घेतला तो घेतलाच. &lt;br /&gt;याच काळात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात १०६ माणसे मारली गेली. ४५००० स्त्री-पुरुषांनी तुरुंगवास भोगला.३२ आमदारांनी राजीनामे दिले होते. या लढयाची परिणती ही की केंद्राला अखेर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र द्यावाच लागला. तोच तो दिवस १ मे १९६०. ज्याला आपण महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस असेही म्हणतो. ज्या स्वतंत्र महाराष्ट्र राजाचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बनले.&lt;br /&gt;१९४६ ते १९६० या १४ वर्षांच्या काळातला या लढयाचा खरंतर तिढयाचा हा धावता आढावा. या लढयात जे मेले ते गेलेच. जे लढले ते सुध्दा आता सगळे शिल्लक नाहीत. त्यातले काही मरता येत नाहीत म्हणून अजून जिवंत आहेत. त्यातले चंदू भरडकर मित्राच्या मेहरबानीनं जगताहेत, आत्माराम पाटील अजूनही परळच्या चाळीत राहताहेत. यावेळी यापैकी कुणाचीही याद कुणालाच नव्हती. &lt;br /&gt;संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबई धनदांडग्यांच्या हातात जाऊ नये यासाठी होता. वस्तुस्थीती अशी आहे की, पुर्वीपासूनच मुंबई व्यापार्‍यांच्या, धन-दांडग्यांच्याच हातात होती पण ती महाराष्ट्रापासून तुटली असती किंवा स्वतंत्र झाली असतं तर तसं त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालं असतं. हे म्हणजे थेट लग्न नाही पण लिव्ह-इन-रिलेशनशीप सारखं झालं. मालकी म्हणजे तरी काय, तर ज्याच्याकडे सत्ता, संपत्ती आणि अधिकार आहेत त्याची असे मानले तर हे सर्व अमराठी माणसांच्याच हातात जास्त होतं हे लक्षात येईल. पैशाने मालली हस्तांतरीत होत असते. आजही जमीन, पैसा, स्थावर- जंगम मालमत्ता (असेट) अमराठी माणसाच्याच नावावर जास्त आहे. मराठी माणसाच्या नावावर फक्त मुंबईची जबाबदारी (लायबिलीटी)आहे. विकत घेण्याची क्षमता (यात सुख, समाधान, ऐशोआराम, वस्तूंपासून मुंबईपर्यंत सगळं येतं) आजही आणि तेव्हाही अमराठी माणसाकडे जास्त होती. मराठी माणूस फक्त विकू (यात घरातले कपडे-भांडी, दागीन्यांपासून वडिलोपार्जीत मोक्याच्या जमीनीपर्यंत सगळ येतं)शकतो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीतीनंतरही मुंबई काय पुन्हा गरीबाच्या, मराठी माणसाच्या हातात आली नाही. येणारही नाही. जरा पेडर रोड, पाली हिल, मलबार हिल अगदी आता लालबाग,वरळी, परळ सुध्दा. इकडे जरा फेरफटका मारुन या म्हणजे कळेल की मुंबई मराठी माणसाची तेव्हाही नव्हती आणि यापुढेही असणार नाही. पुर्वी फक्त दक्षीण मुंबई नव्हती आता दाही दिशा नाहीत.&lt;br /&gt;संयुक्त महाराष्ट्राचा लढा ही एक घटना होती. त्यामुळे त्याची इतिहासात नोंद झालेली आहे. हा इतिहास यापुढे आपण आपापल्या सोईनुसार वापरणार. फक्त भुगोल बदलता येत नाही म्हणून मुंबई महाराष्ट्राच्या नकाशात दिसणार. आपण फक्त भावनेच्या भरात तिला माझी माझी म्हणत राहणार. आतापर्यंत हेच होत आलं आहे. यापुढेही हेच होत राहणार. १ मे ला आपण डोक्यावर घेऊन नुसते नाचत किंवा नाचवत राहणार. उधारीवर फटाके फोडत राहणार, कॉन्ट्रीब्युशन मध्ये रांगोळ्या काढून, लग्नात शिवलेले झब्बे-लेंगे घालून, शिवाजीच्या, भवानीच्या नावानं घोषणा देत. शोभायात्रा काढून, डीजे, बँड-बाजे बाजवत आपापल्या येरियात इकडून- तिकडे बोंबलत फिरणार.&lt;br /&gt;दिवस उरलेल्यांचेच असतात. कालच्या पेक्षा उद्याचा दिवस नवाच असतो. त्यामुळे पिढिही बदलतच रहाते. आणि ती कालच्या पेक्षा अपडेट असते. हे जरी खरं असलं तरीही आपण त्या निमित्ताने या दिवशी तरी केवळ डांसीग मुड मध्ये असणं बरं नाही. लढले ते का लढले याचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. मुंबई मराठी माणसाच्याच हातात राखण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. कर्तृत्वाची शपथ घेण्याचा हा दिवस आहे. फक्त वाजायला लागलं की हलायला लागतं. अश्या अवस्थेतून बाहेर पडण्याची मराठी माणसाला आता गरज आहे. म्हणून आता थेट साठीची, पंच्याहत्तरीची किंवा शंभरीची वाट बघाण्यापेक्षा अधून-मधून या लढयाचं स्मरण करीत रहावं. हुतात्म्यांच्या नावानं दुसर्‍यांना शपथा घालण्यापेक्षा आपणच आपल्यासाठी शपथ घालून घ्यावी. या निमित्ताने तरी का होईना मी मुंबईचा, महाराष्ट्राचा आहे, मुंबई, महाराष्ट्र माझा आहे म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-3470724621568981550?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/3470724621568981550/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=3470724621568981550' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/3470724621568981550'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/3470724621568981550'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/05/blog-post_312.html' title='आता पुन्हा भेटू १ मे २०२०...!!!'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-2757612804858098960</id><published>2010-05-23T03:13:00.000-07:00</published><updated>2010-05-23T03:13:56.542-07:00</updated><title type='text'>दादर स्टेशन</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # मे-२०१० &lt;br /&gt;&lt;br /&gt;मु.पो. दादर स्टेशन. मुंबईचं हार्ट. दादरची सफर म्हणजे मुंबईकरासाठी एक विरंगुळा, आनंद. कुणीही कुणाला सहज भेटण्याचं ठिकाण म्हणजे दादर. दादर चौपाटी, शिवाजी पार्क, प्लाझा, कबूतर खाना, कोतवाल गार्डन, शिवाजी मंदीर, टिळक ब्रीज, हिंदू कॉलनी, किर्ती कॉलेज, शारदा टॉकीज, पोर्तुगीज चर्च, मामा काणेंच उपहारगृह, शिवसेना भवन, आयडीयल, श्रीकृष्ण वडेवाला, सुविधा, हनुमान मंदीर, लक्ष्मी नारायणाचं जैन मंदीर, कैलास लस्सी ही दादरची आयकॉन्स. या ठिकाणाचं नाव घेतलं तरी त्याचं चित्र त्याच्या वैशिष्टयांसह डोळ्यासमोर उभं राहतं. &lt;br /&gt;तरीही या सर्वांवर कडी म्हणजे दादर स्टेशन. दादर स्टेशन म्हणजे गर्दी. अखंड वाहणारी, काही ठिकाणी थबकणारी, सरपटणारी, रेंगाळणारी, वाट पाहणारी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड गर्दीचं वारुळ दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर, पायर्‍यांवर वळवळत असतं. संध्याकाळच्या सुमारास आपल्याला हव्या त्या माणसाचे वाट पाहणारे चेहरे आणि तो माणूस दिसल्यावर फुललेले, लटक्या रागातले, वाट पाहुन हिरमुसलेले, कातावलेले कित्तेक चेहरे प्लॅटफॉर्मनं पाहिले असतील. त्याची मोजदाद त्यालाच. &lt;br /&gt;मुंबईत स्टेशनं अनेक असली तरी सगळ्यांच्या तुलनेत दादर स्टेशनला एक प्रकारचं निराळेपण आहे, उभं आडवं पसरलेलं हे स्टेशन भव्यतेच्या अंगानं सगळ्या स्टेशनांना जड जाईल. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेला जोडणारा मधला पूल दिवसभर प्रचंड गर्दीच्या भारानं थरथरत तर रात्री निपचीत पडलेला पाहताना फारच केविलवाणा दिसतो. &lt;br /&gt;रात्र वाढायला लागते तसा दादर स्टेशनला एक निराळा रंग चढायला लागतो. रात्री बाराच्या पुढे ट्रेन पकडण्याची लगभग वाढते. घराची ओढ माणसाला चालत्या गाडीकडेही खेचते. त्यात कुणी कधी टाकलेली असली तर त्याची ती फरफट बघवत नाही. डोळयांवर वाढत चाललेली पेंग, दोन ट्रेन मधलं वाढत चाललेलं अंतर. माणसांच्या चेहर्‍यावर वैताग पसरलेला असतो. सुरक्षेच्या कारणावरुन हल्ली माणसांना रात्री दादर स्टेशनाच्या आवारात थांबायला बंदी असते. दोन रेल्वे पोलीस एवढया गर्दीसाठी पुरे पडतात. पोलिसाची नजर, हातातला दांडा, आणि आवाज त्या गर्दीला दिशा देत राहतो. रात्री १.११ ला चर्चगेटहुन दादरला येणारी विरार आणि १.२१ ला बोरीवलीसाठी शेवटची ट्रेन असते. तेंव्हा एक आवाज आपल्याला खेचुन घेतो तो असतो श्रीमती गिते यांचा. युनीफॉर्ममध्ये असतात म्हणूस त्या पोलीस नाहीतर, आईच्या आवाजातला हा आवाज दरडावत, विनंती करीत राहतो की, ही शेवटची ट्रेन आहे. शेवटची ट्रेन आहे. &lt;br /&gt;ट्रेन चुकल्यावरची पंधरा-वीस मिनीटे उरलेल्या वाटसरुना त्यांनी समजावतांना, खडसावतांना पाहणं हा एक सोहळाच. त्यांच्यासोबत असतात ते शेख नावाचे रेल्वे पोलीस. एका बाजूला चुकलेल्या वाटसरुंची काळजी आणि शिस्तीच्या, सुरक्षेच्या नावाखाली त्यानां तिथं थांबूही न देणं यातली तगमग बघण्यासारखी असते. आता तुम्ही कुठे थांबाल, काय खाल, सकाळची पहिली ट्रेन कधी असते याची ते माहीती अभावितपणे पुरवीत राहतात.&lt;br /&gt;ट्रेन चुकली. आता प्रत्येकालाच माहीत असतं आता सकाळी ४.३१ शिवाय पर्याय नाही. आता सगळे प्लॅटफॉर्म्स सुनसान होतात. आणि उरलेली गर्दी दादर इस्ट-वेस्ट रेंगाळत राहते. काही सरळ कोतवाल गार्डन गाठतात. काही सुविधाच्या, काही इतर दुकानांच्या पायर्‍यांवर पसरतात. काही लोक स्टेशनची रात्रभर सोबत करीत राहतात. त्यात वडेवाला, चहावाला, मॉलीशवाला, पेपरवाला, पानवाला, बुर्जीपाववाला, हारवाला, मलईवाला, दिवसभर कडीपत्ता-बेलपानं- कुडयाची पाने विकणार्‍या बाया, भिकारी, गर्दुल्ले, हमाल, छक्के, शौकीन आणि काही पोलीसवाले असतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;उतरत्या वयाची एखाद दुसरी बाई धंद्यासाठी गिर्‍हाईक शोधतांना दिसते. पोलिस स्टेशन परिसरात उभं रहायला देत नाहीत. म्हणून आता त्यातल्या काही बाया शिवाजी पार्क (हो तेच ते शिवतिर्थ) मध्ये काळोखात बसून आपली कामं करीत असतात. भिकारी,गर्दुल्ले खाण्याच्या गाडीवर तुटून पडलेल्या गिर्‍हाईकांचे शर्ट पॅन्ट खेचत असतात. तासा-दोन तासांनी अधून मधून कुणीतरी गर्दुल्यांच्या पेकाटात लात घालतो आहे. तो खाली केकाटतो आहे, आणि पब्लिक फिदिफिदी हसतं आहे. हे चित्र पहायला मिळतं. छक्के तिन चार जणांच्या घोळक्यात फिरतांना दिसतात. ते पैसे मागतांना दिसले नाहीत. पण खाण्यापिण्याच्या स्टॉलवर मध्येच एखाद्या पदार्थावर हात मारतांना त्यामुळे स्टॉलमालकाशी हुज्जत घालतांना दिसत होत. ठाणे जिल्ह्यातून आदिवासी पाड्यावरुन कडीपत्ता-बेलपानं- कुडयाची पानं विकायला आलेल्या बाया रांगेत अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. &lt;br /&gt;रात्री अडीचच्या सुमारास प्लॅटफॉर्म नंबर एक वर असलेला खाण्याचा स्टॉल सगळं आवरुन बंद होतो. त्यानंतर तिथल्या लोकांचं जेवण. झोपणं. पुन्हा सकाळी साडेतीनच्या सुमारास हे पुन्हा दुसर्‍या दिवसाची जुळवाजुळव करायला तयार असतात. &lt;br /&gt;दिवस-रात्र प्लॅटफॉर्मवरच्या सगळ्या घडामोडी टिपून घेणारा कॅमेरा सुनसान रात्री आपली नजर वेधून घेतो. गर्दीत असतांना तो तिथेच असला तरी आपल्याला फारसा दिसत नाही. पण त्याच्या नजरेतून आपण निसटणं अशक्य. तो मात्र सगळ्या गर्दीवर आपली कडी नजर रोखून असतो. दिवसभर येणाजाणार्‍या ट्रेनसाठी नेमानं हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाची उघडझाप करणारे सिग्नल्स फक्त रात्री लाल होउन निपचित असतात, काळोखाच्या कॅनव्हासवर ते फारच भेसूर आणि भीतीदायक वाटतं.&lt;br /&gt;साठीतला पांढर्‍या मळकट लेंगा-सदर्‍यातला, पांढर्‍या दाढीची खूंट वाढलेला, गालफाडं बसलेला एक मराठी माणूस इथे गेली २५ वर्षे मॉलीश करतो. दादर स्टेशन पच्छिमच्या आवारात दोन-चार मॉलीशच्या बाटल्या हातात आणि पाठीवर कापडी पिशवी घेऊन फिरत असतो. आपल्या चेहर्‍याकडे बघून तो मॉलीश करणार का म्हणून विचारतो. त्याला मॉलीश करतांना बघीतलं तर आयुष्यातला सगळा व्याप-ताप तो त्याच्याखाली झोपलेल्या माणसावर काढतो आहे असं वाटतं. १०० रुपयात तो तुम्हाला नखशिखांत रगडतो.&lt;br /&gt;विषेशतः लांबपल्ल्याच्या रेल्वेत गाडी सुरु होण्यापुर्वी हातात फडका किंवा झडलेला झाडू घेऊन काही पोरं दिसतात, तशी दोन पोरं रेल्वेच्या पायर्‍यांवर काही झाडतांना दिसली. कुतुहल म्हणूण विचारलं, तर ते कामगार होते. ३०००/- रुपये मासिक पगार असलेली ही मुलं रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत इथे काम करतात. पान, गुटखा, तंबाखू, उलटया, लघवी करुन चिकट आणि चिवट झालेल्या रंगीत जागा खरवडण्याचं काम ते करतात.&lt;br /&gt;पहाटे तिनच्या सुमारास स्टेशनच्या पायर्‍यांवर पेंगत बसलेली पन्नास-साठ माणसं. पाठ जमिनीला टेकून झोपण्यातलं सुख काय असतं ते हे चित्र पाहिल्यावर समजतं. आपलं सामान सांभाळत झोप जागती ठेवत डोळे मिटणं. कलंडणारी मान, पायांच्या गुढग्यावरुन निसटणारे हात आणि झेपावणारं शरीर सांभाळत रात्र सरण्याची वाट पाहणं. हे दृष्य फार केविलवाणं होतं. &lt;br /&gt;साडेतीन रुपये एमआरपी असलेला बनपाव दहा रुपयात विकणारा एक भय्या सांगत होता, धंद्यात आता मजा नाही. तरीही पाचशेच्या खाली त्याचा धंदा नसावा. चारच्या सुमारास दादरची आठवण आली म्हणून आलेला एक नाटकवाला म्हटला, रेल्वे बॉम्बस्फोटा नंतर दादरचा चेहराच बदलला. उमेदिच्या कित्तेक रात्री त्यानं दादर स्टेशनवर काढल्या होत्या. त्याचं म्हणणं होतं सुरक्षेच्या नावाखाली दादरचं स्वैर स्वातंत्र्यच मरुन गेलं आहे. आता पहिल्यासारखी मजा नाही.&lt;br /&gt;सिटी पोलीस इथंही आपलं काम नित्यनेमानं करतांना दिसत होते. पण ते प्रत्येक धंदेवाल्याकडे जात नव्हते. कामत हॉटेलच्या कॉर्नरवर व्हॅन उभी होती. धंदेवाल्यापैकी एक तरतरीत भय्या होता. तो हेच काम करीत असावा. कारण तो कोणत्याही धंद्यावर स्थीर उभा नव्हता. पण प्रत्येक धंदेवाल्याकडून १०-२० रुपये गोळा करुन त्याची पुरचुंडी करुन पोलीसाना देऊन आला. काय विचारलं तर त्यानं हसून फक्त चॅक असं केलं. &lt;br /&gt;सकाळी चारच्या आसपास पुन्हा लगभग सुरु होते. ती चाहुल असते दिवस सुरु होण्याची. पुन्हा ताजेतवाजे होऊन पुन्हा ट्रेन मध्ये चढतात काही झिंगलेले, मरगळलेले काही फ्रेश, कडक चेहरे.&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-2757612804858098960?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/2757612804858098960/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=2757612804858098960' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/2757612804858098960'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/2757612804858098960'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/05/blog-post_23.html' title='दादर स्टेशन'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-5344815400275664196</id><published>2010-05-23T03:09:00.000-07:00</published><updated>2010-05-23T03:09:50.642-07:00</updated><title type='text'>तुंबलेल्या तुतार्‍या</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # मे-२०१० &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अगदी आठवडयाच्या अंतरावर एक मे येऊन ठेपला (इथे मराठी माणसाने उभा ठाकला आहे असे वाचावे) आहे. मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीचा हा पन्नासावा वाढदिवस. पन्नासाव्या वाढदिवसाला सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणतात. पुन्हा अशी पन्नास वर्ष कधीच येणार नाहीत. नंतर एकदम साठ, पंच्याहत्तर आणि शंभर. मग त्यानंतर ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे साजरा होईल तेव्हा होईल . त्यामुळे आत्ताच महाराष्ट्राच्या परंपरेला साजेश्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. ढोल ताश्यांच्या वाद्या ओढल्या जात आहेत. रात्री अपरात्री लेझीमची तालीम सुरु आहे. बँजो पार्ट्या आधूनीक ढिंग्चँग गाण्यांची प्रॅक्टीस करताहेत. डिजेवाले रिमिक्स गाण्यांच्या सिडीज गोळा करत आहेत. पताका कापायचा त्रास नको म्हणून चायनीस बल्बच्या झिगझॅग माळा बिल्डींगीवर, गच्चीत, खिडक्यात, झाडां-झुडपांवर सोडल्या जात आहेत. एकूणच महाराष्ट्राच्या मातीत आणि मराठी माणसाच्या छातीत उत्साहाला उधाण आले आहे. &lt;br /&gt;यावेळी खरंतर शोभायात्रेला हत्तीच हवे होते. अंबारीतून संत ज्ञानेश्वर, तूकाराम-रामदास, शिवाजी महाराज आणि शक्य झाल्यास अत्रे, डांगे, एसेम, बापट,अमरशेख यांचे फोटो. बाजूला स्वच्छ -सफेद कपडयात स्थानीक नगरसेवक किंवा आमदार खासदार यांची मिरवणूक करण्याचे घाटत होते. पण हत्ती बजेटच्या बाहेर म्हणून कॅटरर्स कडून घोडे, खेचर आणि बैल यांची व्यवस्था लावण्यात कार्यकर्ते गुंतले आहेत. घोडयांचे, बैलांचे मालक भैयाच असतात. त्यांना मराठीतूनच बोलण्याच्या विषेश सुचना देण्यात आल्या आहेत. फटाके, ढोल-ताशे-लेझीम या न बुजण्यार्‍या धीट प्राण्यांची निवड केली जात आहे. शोभायात्रेचे मार्ग आखण्यात येत आहेत. बैलगाडी किंवा ट्रकावर उभे करण्यासाठी देखावे तयार केले जात आहेत. त्यालाच चित्ररथ म्हणण्याची परंपरा आहे. पोरांना दाढया-मिशा लावून मावळ्यांच्या वेशात उभे कसे रहावे याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरीही मुले कंटाळतातच म्हणून त्यांच्यासाठी विषेश वडापाव आणि थंडा याची सोय लावण्यात आली आहे. यात भाग घेणार्‍या मुलांच्या पालकांनीच आपापला खर्च करायचा आहे. शक्यतो मावळ्यानी गॉगल वैगेरे वापरु नये याची काळजी घेतली जाईलच. पण उन्हाचा कहर लक्षात घेता असे नियम शिथील केले जातील. नागरीकांसाठी पिंप भरभरून लिंबू किंवा रसना सरबत फूकट वाटण्यात येणार आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुतार्‍या वाजवून वाजवून काही जणांचे गाल फाटून गेले आहेत. त्यामुळे या धंद्यात आता फारसे लोक नाहीत. आणि पेमेंट वेळेवर मिळत नसल्याने नवीनही पिढी तयार होत नाही. तरीही या दिवसाचे विषेश महत्व लक्षात घेता स्पिकरवरच रेडिमेड तुतारीची धून वाजवण्याची व्यवस्था केली आहे. स्टेजवर सर्व प्रमुख पाहुणे बसेपर्यंत आणि शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला हार घाले पर्यंत ती कितीही वेळेला रिपिट वाजवता येईल. यावेळी या दिवशी स्पिकरवर फक्त मराठमोळी गाणी (विशेषतः महाराष्ट्र गीते, भक्तीगीते वैगेरे) वाजवण्यावर भर असेल. तरीही तरुण सळसळत्या रक्ताचा हिरमोड नको म्हणून काही रिमिक्स गाण्यांचा शिडकावा अधून मधून करण्यात येईलच याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. काही मंडळानी खास मराठीचा अभिमान सांगणार्‍या ओळींचे टीशर्टस छापून घेतले आहेत. त्या टिशर्ट्सच्या मागे स्पॉन्सरर स्थानीक आमदार-नगरसेवकाचे सौजन्य म्हणून नाव छापले जाणार आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शोभायात्रेत सहभागी होणार्‍या पुरुषांना झब्बे, लेंगे,फेटे कम्पल्सरी केले आहेत. ब्रेसलेट्स, चैनी, चामडयाच्या पांढर्‍या चपला, मोजडी अश्या वस्तूंचे खास आपापल्या स्तरावर प्रदर्शन करावे अश्या सुचना आहेत. लहान मुलांसाठी रेडीमेड धोतरे, फेटे किंवा रिबीनींची सोय करण्यात त्यांचे त्यांचे आई बाबा (स्वारी...मम्मी-पप्पा) गुंतले आहेत. ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळ्यां काढण्यात येणार आहेत, गेटवर झावळ्या तोरणे लावण्यात येणार आहेत. सत्यनारायणाची पुजा असणारच. त्यासाठी नवदांपत्याची, भटजींची शोधाशोध सुरु आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपापल्या एरियात जबरदस्तीची रक्तदान शिबीरे, मोफत चश्मा शिबीरे, मोफत वह्या वाटपाचे समाजीक कार्य करण्याचे योजीले आहे. त्यासाठी आगाऊ नावनोंदणी सूरु आहे. यानिमित्ताने दहावी-बारावीत पहिल्या आलेल्या मुलांचे कौतूक खास पेंसिल बॉक्स आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात येणार आहे. याच ठिकाणी नापास झालेल्या मुलांना धीर देण्यासाठी अपयश हीच यशाची पहिली पायरी कशी आहे याची सोदाहरण माहीती देण्यात येणार आहे. बाकी खेळ, चित्रकला किंवा तत्सम प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचेही कौतूक करण्यात येणार आहे. जेष्ट नागरीकांचा (उगाचच) शाल देऊन सत्कार करण्यात येणार आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;खास ओवाळणी साठीच्या बाया नऊवारी साडयांवर मॅचींग सेट्स शोधण्यात गर्क आहेत. कपाळावरची चंद्रकोर, नथ, आंबाडा, हिरवा चुडा वैगेरे मराठमोळा साज. भरीला मेहंदी, फेशीअल, ल्बीचींग, आयब्रो आणि खिडूकमिडूक मेकअपचे सामान जुळवण्यात त्या मग्न आहेत. आयत्या वेळेला गजरे आणायचे कुणी, कुणाला ओवाळायचे कुणी, पदर डोक्यावरुन घ्यावा की खांद्यापर्यंतच बस याचे जोरदार प्लॅनींग सुरु आहे. त्यात ओवाळणीचे फोटो काढायचे कुणी याचीही आखणी चालू आहे. हल्ली डिजीटल कॅमेरा मुळे रोल भरण्याचा ताप नसतो. तरीही मशीनचा काय भरवसा म्हणून जोडीला मोबाईल्स सुध्दा तयार ठेवले जात आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवाजी महाराजांचे पुतळे पुसले- धुतले जात आहेत, गरज भासल्यास रंगवले, मागवले जात आहेत. महाराजांसाठी चंदनाच्या पर्मनंट हारांची ऑर्डर गेली आहे, आणि तो हार गळ्यात टिकावा म्हणून महाराज्यांच्या खांद्यावर खिळे ठोकले जात आहेत. आपापला एक पुतळा असावा यासाठी सगळीच मंडळे प्रयत्नशील असतात, तरीही तो आयत्यावेळी कुठे मिळतो याची कार्यकर्त्यांना पक्की माहीती असते. (काही लोकांना पुतळे, तलवारी, ढाली यांचीच गीफ्ट्स येत असतात) तशी चौकशी चालू आहे. तरीही प्रत्येकजण प्रत्येक पायरीवर खात्री करुन घेतो आहे. कारण यावेळी सगळं असलं आणि एकटे महाराज नसले तर सगळ्या कार्यक्रमाचा विचका होऊ शकतो. याची मराठी माणसाला जाण आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;काल-परवापर्यंत अनेकांना माहीत नसलेला हा दिवस उद्या एकदम दैदिप्यमान प्रकाशात न्हाऊन निघणार आहे. या निमित्ताने मेलेल्या एकशे सहा माणसांचे स्मरण केले जाईल. त्या लढ्यात मेलेल्या माणसांपैकी कुणाचेही नाव कुणालाच माहीत नसते. फक्त मेले ते एकशे पाच की सहा येवढयाच माहीतीवर सभा गाजवल्या जातील. मेलेल्यांच्या नावानं शपथा घातल्या जातील. अत्रेंचे चार-दोन किस्से सांगून, स.का.पाटील, मोरारजीना शिव्या घालून दिवस पार पडेल. मराठी माणसांची कानशिले जरा गरम होतील. हाता- पायात झिणझिण्या येतील. जरा या निमित्ताने तुंबलेल्या तुतार्‍या मोकळ्या होतील. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळी उठल्यावर (किंवा उतरल्यावर) मराठी माणूस गुलालाने माखलेल्या झब्या-लेंग्याकडे, विस्कटलेल्या रांगोळ्यांकडे, मलूल झालेल्या फुलांच्या माळांकडे, लटकलेल्या तोरणांकडे, निपचित चिकचिकत असलेल्या चायनीज बल्बकडे पहात मनातल्या मनात म्हणेल, अरे याचा काय संबध? महाराष्ट्र पन्नास वर्षाचा झाला म्हणजे किती खर्च झाला ...!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-5344815400275664196?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/5344815400275664196/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=5344815400275664196' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/5344815400275664196'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/5344815400275664196'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/05/blog-post.html' title='तुंबलेल्या तुतार्‍या'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-8317568367561835914</id><published>2010-04-18T12:12:00.000-07:00</published><updated>2010-04-18T12:12:45.213-07:00</updated><title type='text'>वडाप</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # एप्रील-२०१० &lt;br /&gt;&lt;br /&gt;एसटी यायला अजून अर्धा-एक तास अवकाश होता. समोर जीपवाला मला ज्या गावाला जायचं होतं त्या गावाचंच नाव घेऊन ओरडत होता. इलाज नव्हता. ड्रायव्हर शेजारची सीट म्हणून बसलो. दहाएक मिनिटात, 'भाऊ सरका' म्हणून शेजारी अजून दोन माणसं येऊन बसली. सरकलो. त्यामुळे त्यात अजून एक ऍडजस्ट झाला. ड्रायव्हर बसायचा होता. त्याच्या जागी दोघेजण येऊन बसले. मागून- पुढुन-वरुन-बाजूनं लोकं जीपमध्ये, टपावर, बोनेटवर सहज चढत होती. त्यात पुरुष होते, बाया होत्या, मुलं होती. गाठोडी-बोचकी होती. काठया-कुठया-सामान होतं. &lt;br /&gt;कुणालाच काही वाटत नव्हतं. उलट माणसंच एकमेकांना आत- वर ओढत होती. आपसात एकमेकांना जागा करुन देत होती. म्हणून मीही त्यातलाच एक बनून नीपचीत बसलो होतो. ड्रायव्हर तिरका बसला. गाडी सुरु झाली. हवा लागली. बरं वाटलं. एक हलकासा गलका झाला. दहा फुटातच जीपने चौथा गिअर गाठला होता. 'खंडेरायाच्या लग्नात' च्या तालावर जीपने सुसाट वेग पकडला. जीपच्या हेलकाव्यासोबत माणसं हिंदकळत होती. रस्त्यातले अडथळे, खडडे-बिडडे चुकवत सराईतासारखी जीप निघाली. मध्येच कुठेही काही माणसं उतरत होती. काही चढत होती. सरते शेवटी शेवटच्या गावाच्या नाक्यावर गाडी थांबली. भराभरा सगळी जीप खाली झाली. गंम्मत म्हणून एकूण माणसं मोजली. ती चाळीसेक असावीत. वन प्लस फोर ची कपॅसीटी असलेल्या जीपमध्ये दहापट अधीक माणसं चढली होती. &lt;br /&gt;या गर्दीची जीपला, ड्रायव्हरला, पॅसेंजरना सवय झाली होती. मी रिकाम्या जीपकडे एकवार वळून पाह्यलं आणि पुढं चालता झालो. या प्रकाराला 'वडाप' म्हणतात. एसटीला पर्याय म्हणून सुरु झालेलं वडाप आता प्रवासाचे मुख्य साधन बनून राहीले आहे. थातूर-मातूर कारवाई शिवाय आता वडापाला पर्याय नाही. गावात राहणार्‍याला, वडापातून प्रवास करणार्‍याला आता या प्रकाराची चांगलीच सवय झालीय. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईची अनेक ठिकाणांची, प्रवासाच्या साधनांची अवस्था या वडापापेक्षाही भयंकर झाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची मुंबईकराला सवय झाली आहे. कितीही पर्याय आले तरी मुळ प्रश्न सुटत नाही. याला कारण गर्दी. अखंड वाढत जाणारी गर्दी.&lt;br /&gt;मुंबईत सकाळ संध्याकाळ, खरंतर कोणत्याही वेळेची रेल्वे. रेल्वेचे प्लॅटफॉर्म. गर्दीच्या विळख्यात आक्रसून, दबून गेलेले असतात. खुराडयात कोंबल्यासारखी रेल्वेत माणसं एकमेकांत घुसत असतात. सुटणार्‍या पहिल्याच स्थानकातही चौथी सीट मिळेनाशी झाली आहे. दोन सीट्स मधल्या जागा, जुळलेल्या दोन डब्यांच्या मधल्या जागा, रेल्वेच्या छतावर, दरवाजात माणसंच माणसं लोंबकाळतांना दिसतात. दरवाजावर तळपायाच्या चौडयावर उभं राहुन माणसं आपल्या जीवाशी खेळत असतात. कधी काही आपला जीव गमावतातही. पण मरणार्‍यालाच दोन शिव्या देऊन माणसं आपल्या नित्यकर्माला जुंपली जातात. काळ, काम आणि वेगाच्या चक्रात अडकलेल्या माणसांना याचीही सवय झाली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बेस्टच्या बसेसचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. १९ प्रवासी उभे राहु शकतात असं लिहिलेल्या ठिकाणी याच्याही चारपट उभे राहुन माणसं प्रवास करीत असतात. इथं शिव्या खायला द्यायला भांडायला ड्रायव्हर- कंडक्टर असतो एवढंच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रेल्वेस्टेशन जवळचे रिक्षा- टॅक्सीवाले. गर्दीत गर्दी कशी वाढवायची ते यांच्याकडून शिकावं. ऐन गर्दीच्या भरात यांची माणसांच्या अंगावर धाऊन जाण्याची स्पर्धा लागली असावी असं वाटतं. कुणाला चुकुन धक्का लागलाच तर एकमेकांनी एकमेकांना हिंदीत चार-दोन शिव्या द्यायच्या आणि पुढं व्हायचं एवढंच. पाहिजे तेंव्हा रिक्षा-टॅक्सी न मिळणं. दिसली तर न थांबणं, थांबली तर आपल्याला पाहिजे तिथे यायला न निघणं, निघाली तर ट्रॅफीकमध्ये फसणं. याचीही आता सवय झाली आहे. एअरपोर्ट सारख्या परिसरात रिक्षा-टॅक्सींनी तासनतास प्रवाश्यांची वाट बघत बसणं तसंच अनेक ठिकाणी प्रवाशांनी रिक्षा-टॅक्सीचीही वाट बघत बसणं हे दुर्दैवी चित्रही आता सवयीचं झालंय.&lt;br /&gt;&lt;br /&gt;फुटपाथ वर पहिला हक्क पादचार्‍यांचा...वैगेरे...वैगेरे... तसे कायदेही आहेत. स्टेशन लगतच्या उघडया प्रत्येक फुटपाथचा ताबा फेरीवाल्यांनी, फळ-भाजीवाल्यानी केंव्हाच घेतला आहे. कायद्याला, विशेषतः कायद्याच्या रक्षकांना यानी फाटयावर मारलेलं आहे. शक्य तिथे खरेदी केलेलं आहे. त्यामुळे रस्ते आक्रसून गेले आहेत. गाडी पार्क करुन भाजी घेणारे, तिथेच ग्राहकांची वाट पाहणारे रिक्षावाले. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला असे रस्ते ओव्हरलोडेड असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळ-संध्याकाळी रस्ते, हायवेज, ब्रीज तुडूंब असतात. फुटाच्या अंतरावरुन गाडया एकामागून एक रांगत-सरकत असतात. एक-एक किलोमिटर पर्यंत तुरळक बेस्टच्या बसेस, क्वचीत ट्रक, टॅम्पो. अधुन मधून रिक्षा-टॅक्सीज आणि अगणीत कार्स हे कोणत्याही हायवेवरचं चित्र. कोणत्याही वेळेत अवकाशातून घेतलेला फोटा एकसारखा येईल एवढं साम्य या चित्रात दिसेल. हायवेवर गर्दी असते गाडयांची. माणसांची असतेच असे नाही. रस्त्यावरच्या अनेक गाडयात एखाद दुसरा माणूस बसलेला दिसेल. ड्रायव्हर जर स्वतःच मालक असेल तर एकटाच, अन्यतः मागच्या सिटवर एखादा माणूस असं चित्र हमखास पहायला मिळतं. साधारणत: दिडशे माणसांसाठी शंभर गाडया असं विलासी चित्र म्हणजे हायवेवरची गर्दी. एकावरुन चार पदरापर्यंत वाढलेले रस्ते. ठिकठिकाणी बांधलेले ब्रीज. तरीही रस्त्यावरच्या गाडयांची गर्दी आटोक्यात येत नाही. पण याचीही आता सवय झाली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माणसं आर्थीक स्थराचं जसं जसं एक एक अंतर पार करतात तसंतसं ती प्रवासासाठीचं वहान बदलतात. बहुदा सुरुवातीला पायी किंवा सायकल, मग पुढे रेल्वे किंवा बस, रेल्वे-बसकडून रिक्षा-टॅक्सी, क्वचीत बाईक. रिक्षा-टॅक्सी कडून कार, मग छोटया कारकडून मोठया- लग्झरी कार, नंतर एका पेक्षा अनेक कार हा प्रवास अखंड चालू असतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण रेल्वेत घुसमटलेलो असतांना, बसमध्ये हेलपाटत असतांना, रस्त्यावच्या ट्रफीक मध्ये फसलेलो असतांना, रस्त्यावर चालतांना अडखळलेले असतांना मनातल्या मनात आंणि हिंम्मत आणि शक्य असेल तर कुणाच्या अंगावर जातो, कुणाशी भांडतो, कुणाशी हुज्जत घालतो. अगदीच शेवटचं म्हणजे अधिकार्‍यांची, पोलीसांची, सरकारची भीती दाखवतो आणि घरी परततो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्याला माहिती आहे का? लोकसंखेच्या बाबतीत मुंबईचा इतर शहरांच्या तुलनेत जगात दुसरा तर देशात पहिला क्रमांक लागतो. इथे २०१० मध्ये लोकसंखेची घनता १३,८३०,८८४ इतकी आहे जी दहा वर्षांपुर्वी ११,९७८,४५० इतकी होती. मुंबईचे क्षेत्रफळ ६०३ कि.मी. त्यात प्रत्येक चौरस मितीमध्ये २२,९३७ माणसं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असावं की बस्-रेल्वे किंवा रस्त्याचं सोडा तर अख्ख्या मुंबईचच वडाप झालेलं आहे!&lt;br /&gt;वडापातून खाली उतरल्यावर आपला आणि वडापाचा संबध जसा तुटलेला असतो. तसंच इथंही असतं. आपण त्या परस्थीतीच्या गोतावळ्यात जेंव्हा अडकलेलो असतो आणि त्या परस्थीतीशी आपला थेट संबध असतो तेंव्हाच आपण ती गोष्ट मनाला लाऊन घेतो. अन्यतः आपणही मुक्त, निर्वीकार, उनाड पक्षी असतो. आपापल्या मोकळ्या जागा शोधत झेपेल तेवढं उडत असतो.&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-8317568367561835914?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/8317568367561835914/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=8317568367561835914' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/8317568367561835914'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/8317568367561835914'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/04/blog-post_18.html' title='वडाप'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-1361525422037939807</id><published>2010-04-18T11:58:00.000-07:00</published><updated>2010-04-18T11:58:32.698-07:00</updated><title type='text'>असेल माझा हरी...!</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # एप्रील-२०१० &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या काही लेखांची प्रतिक्रिया म्हणून काही वाचकांनी फोन करुन, एमेल पाठवून, शक्य असल्यास भेटून स्पष्टपणाने म्हटलं होतं की, आता काही तरी उपायाचं लिहा. केवळ मराठी माणसाच्या गुणदोष सांगू नका. ते आमचेच आहेत, ते आम्हाला माहीत आहेत. पण आपल्याला माहितीच आहे की, थेट उपचार करण्याआधी काही तपासण्या कराव्या लागतात. बहुतेक वेळा त्याचा रिपोर्ट नॉर्मलच येतो, हे माहीत असतांना देखील तसं करावं लागतं. आणि जुनाट आजारात तर त्या तपासण्या कराव्याच लागतात. कारण काही आजार रक्तात किंवा हाडामासात भिनलेले असतात. त्यावर केवळ वरवरचे उपचार किंवा मलमपटटी करुन काही होत नाही. एका अर्थाने मराठी माणसांच्या मनातली राग आणि आगही तपासण्यासाठी या तपासण्या चालू होत्या. आता उपचाराचं बोलू.&lt;br /&gt;मराठी माणसाला अनेक आजार आहेत. त्यातला भयंकर आजार म्हणजे स्थानीक किंवा याहून सोप्पा आणि भावनीक शब्द म्हणजे 'भूमीपुत्र' असण्याचा. आजूबाजूच्या वातावरणात थोडा बदल झाला की तब्बेत बिघडते असं त्या आजाराचं असतं. अश्या आजारात आजार्‍याच्या हातात काहीच नसतं. किंबहुना यात आजारी माणूस आपली रोगप्रतीकारक शक्ती कमी आहे हे कधी मान्यच करीत नाही. तर तो कायम पाऊस, उन,थंडी, वारा यांना दोष देत बसतो. त्यामूळं मूळ रोग राहतो बाजूला. याला त्याला दोष देण्यातच सगळी हयात निघून जाते. हा आजार बर्‍याच प्रमाणात संसर्गजन्य असतो. त्यामूळं त्याची लागण भरभर होते. आपण सगळे सारखे आणि एक आहोत असं वाटायला लागतं. आणि मला जो आजार आहे तोच तूलाही आहे असं म्हणून जो एक मानसिक आधार वाटतो तो या आजारात जास्त प्रमाणात आढळतो. मराठी माणसांमधे या रोगाचं प्रमाण वाढत चाललं आहे. &lt;br /&gt;स्थानीक आणि स्थलांतरीत&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्थानीकांपेक्षा स्थलांतरीत माणसं व्यवसाय करतात. स्थानीक त्यांच्याकडे नोकरी करतात, असा सार्वत्रीक अनुभव आहे. म्हणजे मराठी माणसाने गुजरातमध्ये जाऊन एखादा कारखाना काढला तर त्याच्याकडे मजूरी करणारे गुजरातीच (कदाचीत युपी-बिहारी) असतील. त्यामुळे थोडया काळासाठी आपणही इथे स्थलांरतीत आहोत असं मानुया. महाराष्ट्राच्या एकूण जिल्ह्यांचा विचार केला तर आपणही मुंबई किंवा मुंबई उपनगर या जिल्हयामध्ये कधी ना कधी स्थलांतरीत झालो आहोत, हे लक्षात असुद्या. म्हणजे काम सोपं होतं. झालाच तर थोडा रागही शांत होतो. कारण या सगळ्याचा शेवट व्यवसायाची व्हावा असं वाटतं. कारण व्यवसाय करणाराच जास्त श्रीमंत होतो. आपल्याला हवी ती वस्तू विकत घेण्याच्या आणि विकण्याच्या शक्तीवरच तुमची योग्यायोग्यता ठरत असते. जरा स्वतःकडे पहा, आज मी यातलं काय करु शकतो हे तपासून घ्या. तुमच्या वाटयाला आलेल्या अर्थकारणावरच तुमचं आयुष्य अवलंबून असतं. &lt;br /&gt;मुंबईत गुजराती विषेशतः मारवाडी माणसं एकमेकांना मदत करतात. धंद्यामध्ये एखाद्याला पैशाची मदत हवी असल्यास पैशाची मदत देतात. उधारी हवी असल्यास उधारी देतात. कर्ज हवे असल्यास कर्ज देतात. कुणाला शब्द टाकायचा असल्यास तसं करतात. मराठी माणूस असं करीत नाही असं नाही. पण ते कोण करतात हे तूम्ही समजून घेतलं पाहिजे. मराठी माणसांना अनंत भालेकर मदत करतात आणि माधवराव भीडे मदत करायला सांगतात, हे मला माहीत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठी माणसाला त्याचेच मित्र, नातेवाईक, भाऊबंद, आईवडील धंदा सुरु करायला मदत करीत नाहीतच. पण एखादा माणूस जर धंद्यात डूबला असेल त्याला तर त्याला पुन्हा उभं रहायला अजिबातच मदत करत नाहीत. अशावेळेला, बघ तूला सांगत होतो ना... इथपासून सुरु होणारे सगळे डोस त्याला पाजले जातात. मराठी माणसं फक्त कुणाला हॉस्पीटलमध्ये ऍडमीट करायला किंवा एखाद्याला लग्नकार्याला एकमेकांना पैसे देतात. यापलिकडे मदत करण्याची त्याची भावना नसते. &lt;br /&gt;उद्योग- व्यवसाय कारणारा माणूस हा सहजासहजी आपला व्यवसाय वाढवत नसतो. व्यवसाय म्हणजे असंख्य अडथळ्यांची शर्यत असते. व्यवसायात माणसाच्या सगळ्या गुण-अवगुणांचा कस लागतो. त्यालाही कुणी त्याच्या वाईट दिवसात मदत केलेली नसते. त्यामुळे अश्या व्यवसाईक माणसाला तुम्ही भेटलात तर तो तुम्हाला पारखल्याशिवाय जवळ घेत नाही. किंबहुना तुमच्यातला खरेखोटेपणा त्याला लगेच कळतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यवसायात उतरतांना आपण प्रामाणिक आहोत का, हे तपासून घ्या. आणि जर तुम्ही प्रामाणिक असलात तर तुम्हाला मदत करण्यावाचून कुणीही कुणापासूनही रोखू शकत नाही. खरंतर उद्योग व्यवसाय करण्याची ओढ असणार्‍यांनी इतर व्यवसायीकांनाही भेटलं पाहिजे. बोललं पाहिजे. आपली कौशल्य, आपले अनुभव त्यांच्याशी शेअर केले पाहिजेत. योग्य वेळी त्यांची मदत घेतली पाहिजे. &lt;br /&gt;घेता घेता एक दिवस...&lt;br /&gt;कवी विंदा करंदीकर यांची एक कविता आहे ' देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे. घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे '. याचा अर्थ असा आहे की, देणार्‍याकडून ती दातृत्वाची वृत्ती घ्यावी. आपल्या वाईट दिवसात कुणीतरी आपल्याला मदत केली आहे. तशीच मदत जो कुणी आता गरजेत असेल त्याला आपण करावी, असे अपेक्षीत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण आपल्या गरजेला दुसर्‍याकडून घेतलेली मदत दिलेल्या मुदतीत परत करा. त्याचे वायदे वाढवू नका, चुकवू तर अजिबात नका. अनेक जण मदत मागताना आणि ती परत करतांना वेगवेगळे असतात. असा व्यवहार एकदोन वेळा फायद्याचा ठरु शकतो पण पैशाच्या व्यवहारातच माणसाचा खरेखोटेपणा कसाला लागत असतो. तेंव्हा देण्या- घेण्यात जेवढी सहजता ठेवता येईल तेवढी ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात कुणीही कुणावर उपकार करीत नसतो. फक्त आपला स्वार्थ जेवढा विधायक ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करा. मराठीत एक म्हण आहे की, 'प्रयत्नांती परमेश्वर' खरतर ती 'प्रयत्नार्थी परमेश्वर' अशी असायला पाहिजे. जो माणूस प्रयत्न करतो, सुरवात करतो त्याला परमेश्वर पदोपदी भेटतो. 'असेल माझा हरी...तर देईल खाटल्यावरी' असं म्हणून आपलं काम आपण आपले प्रयत्न सोडता कामा नये.&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-1361525422037939807?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/1361525422037939807/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=1361525422037939807' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/1361525422037939807'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/1361525422037939807'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/04/blog-post.html' title='असेल माझा हरी...!'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-1044758667130498942</id><published>2010-03-25T23:23:00.000-07:00</published><updated>2010-03-25T23:24:47.549-07:00</updated><title type='text'>...भांडी घासा आमची!</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # मार्च-२०१० &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबई&amp;nbsp;कुणाची? असा प्रश्न विचारला की मराठी माणूस म्हणतो, ती माझी आहे कारण ती महाराष्ट्रात आहे. गुजराती-मारवाडी म्हणतो ती माझी आहे कारण मुंबईचा सगळा व्यापार उदीम माझ्याच हातात आहे. उत्तर प्रदेशी आणि दक्षीण भारतीय म्हणतो ती माझी आहे कारण मुंबईत सगळयात जास्त कष्ट आम्ही करतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;भौगोलिक रचनेमुळ्ये मुंबई एकाच वेळी महाराष्ट्राची आणि देशाचीही असू शकते. यात दुमत नाही. पण मुंबईची अवस्था सध्या राधेसारखी झाली आहे. लौकिकार्थाने ती अनयची बायको आहे पण व्यवहारात ती कृष्णाच्या गळयात आहे. कृष्णाची सखी होऊन ती वावरते. कदाचीत त्यामुळेच तिची पुजा होत असावी. या नात्यात जसं कोण अनय? तसं मुंबईच्या बाबतीत कोण मराठी माणूस? &lt;br /&gt;&lt;br /&gt;लौकिकार्थाने मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. पण तिला देशाची आर्थीक राजधानी म्हणूनही ओळखतात. या सगळ्या वादात आपण न शिरता भूमिपूत्र, वारस या नात्याने मुंबई ही मराठी माणसाची आहे असे मानले. तर प्रश्न उरतो मराठी म्हणजे तरी कोण? सत्तेत असलेले मराठी म्हणतात, मुंबई देशाची आहे. नसलेले म्हणतात मुंबई मराठी माणसाची आहे. म्हणजे मराठी नावाची दोन किंवा त्याहुनही अधिक माणसं असली पाहिजेत. सत्तेत जश्या मराठी माणसाच्या दोन जाती आहेत. तश्या त्या समाजातही आहेत. दोघांचं उत्पन्न, राहणीमान वेगळं. सारखे आहेत ते यांचे देव आणि टिव्हीवरचे कार्यक्रम. बाकी यांची अनेक वर्ष वर्ष गाठभेट नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबई विकणे आहे&lt;br /&gt;&lt;br /&gt;भौगोलिक अर्थाने विचार केला तर मुंबईची कितीशी जमिन आज मराठी माणसाच्या ताब्यात आहे? इतिहासाचा विचार केला तर कोणता इतिहास त्याने जतन करुन ठेवला आहे, त्याचा अभिमान बाळगला आहे. विकासाशी निगडीत बोलायचं तर मुंबईच्या जडणघडणीत, वाढीत मराठी माणसांचा थेट किती हात आहे, आणि त्याचे पुरावे काय आहेत? मुंबईच्या सांस्कृतिक अंगानं विचार केला तर आज मनोरंजन, साहित्य, खाद्य, पोशाख या गोष्टींवर कितीसा मराठी प्रभाव आहे? परंपरेच्या अंगाने विचार केला तर मराठी माणसाच्या कोणत्या परंपरा आज तग धरुन आहेत? समाजकारणाच्या आधारे विचार केला तर प्रश्नं पडतो की उत्सवाच्या पलिकडे मराठी माणसांचं सामाजीक जीवन मुंबईत शिल्लक आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं अर्थकारण. यात मराठी माणसाचा किती सहभाग आहे. याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तुर्तास मुंबईला कुणी डावावर लावली किंवा स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर मुंबईला कुणी विकायला काढली तर तिला विकत घ्यायची आज मराठी माणसाची लायकी आहे का ? राजकारण, सिनेमा, स्टॉक मार्केट, मॉल्स, उद्योग या अर्थकारणाला दिशा देणार्‍या गोष्टींवर मराठी माणसाचे निर्वीवाद वर्चस्व किती? याचा पडताळा घेतला तर असं लक्षात येतं की, मुंबई याआधी कितीतरी वर्ष ती परप्रांतीयाना मराठी माणसाने विकली आहे. ती विकल्याची पावती त्याच्याकडे नाही एवढंच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;भांडी घासायची हौस&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुर्वी गुजराती-मारवाडी मराठी माणसाला थेट म्हणायचे की, 'मुंबई तुमची...भांडी घासा आमची'. आजही आजूबाजूला पाहिलंत तर पटेल की वस्तुस्थीती आजूनही बदललेली नाही. मराठी चित्रपटात सुपरस्टार ठरलेले हिंदित जाऊन घरगडी बनतात. आजही कोणत्याही हिंदी सिरिअल मध्ये सखुबाईची भाषा घाटी-मराठीच असते. मराठी माणसाला भांडी घासायची एवढी हौस का हे कळत नाही. कोणत्याही उत्तरप्रदेशीय माणसाच्या बायका-लेकी-सुना दुसर्‍याची भांडी घासायला जात नाहीत, हे बाणेदार मराठी माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे. आज कोणत्याही वस्त्तीत जा, अनेक मराठी माणसांच्या, दलितांच्या घरात तुम्हाला हेच चित्र प्रकर्शाने पहायला मिळेल की, आई-बहीणी चार घरची धुणी भांडी करताहेत. बाप उतरत्या वयातही वॉचमन किंवा इथे तिथे गावखात्यात मजूरी करतो आहे. आणि आपल्या बाळ्याला बाळं झाली तरी सगळ्यांचं पालनपोषण म्हातारे आईबापच करताहेत. अश्या थकलेल्या आईबापाची अजिबात चिंता न करता तरुण पोरं केसांना रंग लाऊन, कमरेवरुन खाली घसरणार्‍या जिनच्या पॅन्टस घालून आणि हातात, गळ्यात कचकडयाच्या माळा अडकवून उनाडक्या करताहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठी माणसाठी ओळख&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या माहितीतला एक गुजराती शेठ फक्त मराठी माणसानांच कामाला ठेवतो. त्याचा व्यापार कपडयाचा आहे. त्याचं म्हणनं हे की मराठी माणूस कामचुकार असला तरी, महत्त्वाकांक्षी नाही. त्याच्याकडे सकाळी दुकान उघडायची चावी दिली की तो तुमचा चमचा बनून राहतो. अधून मधून किंवा गरजेला ऍडव्हान्स दिला की तो तूमचा मांडलीक बनतो. तो पुढे जाऊन आपल्या बाजूला धंदा उघडेल याची कधीच भीती नसते. मराठी माणूस नोकरीत इमानदार, प्रामाणिक असतो. त्याची स्वप्न फार तोकडी असतात. पाळीव कुत्र्या-मांजराच्या खर्चातही एक मराठी कुटुंब सुखा-समाधानानं राहु शकतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज मराठी माणसाला ओळखणं सोपं आहे. तो रस्त्यावर असला तर त्याच्या हातात दगड तरी असतो किंवा झेंडा तरी. वडापाव आणि एक बिसलेरीची बॉटल यावर तो दिवसभर घोषणा देऊ शकतो. तो कधीही कार्यकर्त्याच्याच वेशात वावरतो. ट्रेनमध्ये सेकंडक्लासच्या डब्यातच तो सापडतो. चकचकीत मॉलमध्ये विंडो शॉपीग करण्याशिवाय त्याला काही परवडत नाही. रात्री अकरानंतर भाजी खरेदी करायला त्याला आवडते. फळांमध्ये अजूनही तो आंबा, रामफळ, सफरचंदासारख्या फळांचा तो राग करतो. त्याचे चिकू, केळी आणि पेरुवर पुर्वीइतकेच प्रेम आहे. गगनचुंबी इमारतीकडे बघतांना तो अजूनही भांबावतो. शनीवार- रवीवारचा सिनेमा सोडाच त्याला इतरदिवशीही सिनेमा थियेटरमध्ये जाऊन बघणे जमत नाही. मच्छी मार्केटमध्ये आता त्याच्या आवडीच्या फक्त तिनच गोष्टी उरल्या आहेत त्या म्हणजे बोंबील, बांगडा आणि मांदेली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-1044758667130498942?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/1044758667130498942/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=1044758667130498942' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/1044758667130498942'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/1044758667130498942'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/03/blog-post_25.html' title='...भांडी घासा आमची!'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-861336368734365878</id><published>2010-03-18T20:40:00.000-07:00</published><updated>2010-03-18T20:40:28.745-07:00</updated><title type='text'>एक होता मराठी माणूस</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # फेब्रुवारी-२०१० &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;फार फार वर्षांपुर्वीची गोष्ट. आट पाट नगर होते. त्या नगरीचे नाव होते मुबई. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी होती. तिनही बाजूनं समुद्रानं कवेत घेतलंल्या या नगरीत पुर्वी कोळी, आगरी, पाचकळशी लोकांचं वास्तव्य असायचं. मुख्यत्वे मराठी नावाचा माणूस इथे रहात होता. ताडा-माडा-झाडांनी वेढलेल्या या नगरीत ती माणसं सुखा-समाधानानं रहात होती. शेती, मासेमारी हे त्यांचे पोटापाण्याचे व्यवसाय. पुढे इंग्रजाच्या काळात मुंबईतला व्यापार-उदीम वाढला. त्यासाठी कामगारांची, दुकानदारांची, छोटया-मोठया व्यावसायीकांची गरज भासायला लागली. त्यासाठी राज्यातील इतर भागातून, देशातल्या इतर राज्यातून माणसं मुंबईत स्थलांतरीत होऊ लागली. स्थाईक व्हायला लागली. कामगारांच्या, कष्टकरांच्या वस्त्या इथे वाढायला लागल्या. आणि मुंबईत माणसांची गर्दीच गर्दी व्हायला लागली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुर्वीचा मध्यमवर्गीय मराठी माणूस उभ्या-आडव्या चाळीत रहायचा. आपण आपली नोकरी करावी. सांभाळावी. रोज संध्याकाळी टीव्हीसमोर बसावे, रविवारी दुपारी जेवणावर मनसोक्त ताव मारावा आणि संध्याकाळी दादर नाहीतर गिरगाव चौपाटीवर बायको मुलांबरोबर फिरायला न्यावे. सणाला काहीतरी गोडधोड करावे, दिवाळीला फराळ, कुटंबातल्या प्रत्येकाला नवीन कपडे करावे, उत्साही लोकांनी शैक्षणिक, सामाजीक, सांस्कृतीक मंडळे चालवावीत, पोरांनी सुट्टीच्या दिवसात रस्त्यात मैदान मांडावे. वयोवृध्दानी राजकारण्यांना, राजकारणाला, श्रीमंताना बिनधास्त शिव्या द्याव्यात, बाया-बापडयांनी घर सांभाळावे, लहानांपासुन थोरांपर्यंत सर्वानी छोटया-मोठया उत्सवात कायम मग्न असावे, हे त्याच्या आवडीचे छंद.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्र दिवस आणि ड्राय डे&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वातंत्र्यानंतर देशभर भाषीक राज्याच्या रचनेस केंद्राची मान्यता होती. मुंबईत मराठी भाषिकांची संख्या जास्त असतांनाही आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असतांनाही ती महाराष्ट्राला द्यावी की न द्यावी या संभ्रमात दिल्लीतले नेते होते. त्या कटात महाराष्ट्रातल्या राजकारणारले काही पुढारीही सामिल होते. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून मुंबईला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा असे त्यांना वाटत होते. पण लेखक-पत्रकार-कलावंत-विचारवंत आणि सर्वसामान्य माणसानी सरकारविरुध्द लढा देऊन मुंबई महाराष्ट्रात राखली. त्यात १०६ माणसांना आपले जीव गमवावे लागले. १ मे १९६० हा दिवस त्यामुळेच महाराष्ट्र दिवस आणि ड्राय डे म्हणूनही पाळला जातो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;परप्रांतीय नावाची भीती&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पोटापाण्यासाठी परप्रांतातून मुंबईत आलेल्या दक्षीण भारतीय, उत्तरप्रदेशी, बिहारी, गुजराती, पंजाबी, मारवाडी यांनी पुढे पुढे मुंबईत आपले बस्तान बांधायला सुरुवात केली. हे लोक प्रामुख्याने व्यवसाय धंदा करायच्या हेतूनेच मुंबईत आले होते. सकाळच्या चहापासून रात्री झोपायच्या चादरींपर्यत प्रत्येक गोष्टींचा या माणसानी धंदा केला. मुंबईतून अमाप पैसा कमावला. मुंबईत आपली गडगंज संप्पती मिळवली, त्याच्या जोरावर सत्तेशी जवळीक साधली. काहीनी सत्ताही मिळवली. आणि आपल्याला हवे ते सुख प्राप्त करुन घेतले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गिरणीच्या संपानंतर मुंबईत कोकणातला, देशावरचा गरीब मराठी माणूस देशोधडीला लागला. पोटापाण्यासाठी मिळेल ती नोकरी त्याने पत्करली पण वाढत चाललेल्या महागाईने तो खंगत चालला. आपल्या कुटूंबाची देखभाल करायची की आपल्या स्वप्नांची पुर्ती करायची या कैचीत तो कातरला गेला. गावाकडे निघून जावे तर गावाकडची जमीन विकलेली. ज्याची आहे त्याची कसायची सवयही गेलेली. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहिर अशी त्याची अवस्था झाली होती. नोकरी नाही म्हणून मुलांना चांगले शिक्षण नाही. चांगले शिक्षण नाही म्हणून पुन्हा त्यांना चांगली नोकरी नाही अश्या दुष्टचक्रात तो अडकून गेला. व्यवसाय करायचा तर पैसा नाही आणि रस्त्यावर धंदा करायचीही त्याला लाज वाटायची. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;उत्तर भारतातून आलेल्या भय्या नावाच्या माणसाला तो खुप घाबरत असे. कारण तो माणूस कसाही, कुठेही, कोणत्याही परस्थीतीत तग धरुन रहायचा. त्याने आपली रोजी-रोटी छिनून घेतली असे मराठी माणसाला वाटायचे. तो अर्ध्या पगारात काम करतो. तो वाटेल तो धंदा करतो याचा त्याला राग यायचा. मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची असे म्हणता म्हणता मुंबईत मराठी माणसांची संख्या शंभरात पंचवीसच्या खाली आणि भय्यांची शंभरात पन्नासच्या वर कधी गेली हे त्याला समजलंच नाही. मुंबईत अनधिकृत झोपडया वाढल्या. त्याही झोपडया पुढे अधिकृत झाल्या. मुंबईत त्या भय्यांचे इलाखे तयार झाले. पुढे पुढे ते इथले मतदार म्हणूनच हक्कदारही झाले. त्यातलेच काही नगरसेवक आणि आमदारही झाले. भविष्यात कदाचीत त्यातलाच एक महाराष्ट्राचा मुख्यामंत्रीही बनू शकतो. जादू घडावी अश्या गोष्टी त्याच्या नजरेसमोरच घडत होत्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चलो मुंबई(बाहेर)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे पुढे मराठी माणूस विरार, बदलापूर, नवी मुंबईच्या पुढे आपला संसार थाटू लागला. तो प्रदुषणाचे, गर्दीचे कारण पुढे करी पण आपली मुंबईत रहायची लायकी नाही हे त्याला कळून चुकले होते. मराठी माणसाला आपल्या मृत्युची चाहुल लागेपर्यंत खुप उशीर झाला होता. पुर्वीपासूनच मरीन लाइन्स, मलबार हिल, पाली हिल, वाळकेश्वर, पेडर रोड, जुहु, याकडे मराठी माणूस किंवा त्याच्या, बायका लेकी, सुना फक्त तिथे राहणार्‍या गुजराती, मारवाडी शेठ लोकांची भांडी घासायला जायच्या, तिथे राहण्याचं स्वप्न त्यानं स्वप्नातही पहीलं नाही. पण पुढे मुंबईतल्या कोणत्याही भागात उभ्या राहणार्‍या गगनचुंबी इमारतीत मराठी आडनावाचा माणूस औषधालाही सापडेनासा झाला. पण तेंव्हा खूप उशीर झालेला होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी शेवटी मराठी माणूस साध्या साध्या गोष्टींवरुन चिडायचा. संप करायचा. कुणाच्याही मुस्कटात मारायचा, शिव्या द्यायचा, दगडफेक, जाळपोळ करायचा. त्याचा स्वभाव चिडचिडा झाला. आपण फक्त घोषणेपुरताच उरलो आहोत अशी त्याची भावना झाली. तरीही मराठी मराठी म्हणून कुणी त्याला गोंजारलं तर त्याचा उर भरुन यायचा. मराठीच्या, मुंबईच्या अभिमानानं त्याची छाती भरुन यायची. काहीतरी केलं पाहीजे असं त्याला वाटायचं. पण पुन्हा सकाळ संध्याकाळच्या रेल्वेच्या गर्दीत आणि राईच्या तेलाच्या वासात त्याचा अभिमान बुजून जायचा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;असा होता मराठी माणूस. मनानं सात्विक, निर्मळ आणि भावनीकही होता. शेवटपर्यंत 'मुंबई माझी', 'मुंबई माझी' असा आक्रोश उर फुटेस्तोवर करीत राहीला. खाण्यापासून, सणांपर्यंत त्याच्या काही परंपरा होत्या. त्याची म्हणून एक संस्कृती होती. त्याचा म्हणून काही इतिहास होता, पण त्याची एक साधी खूणही आता मुंबईत सापडत नाही. शेवटी मेहनत आणि कष्ट केले नाहीत म्हणून मराठी माणसाचा झिजून झिजून मृत्यू झाला. त्याच्या आत्म्यास शांती लाभो!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-861336368734365878?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/861336368734365878/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=861336368734365878' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/861336368734365878'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/861336368734365878'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/03/blog-post.html' title='एक होता मराठी माणूस'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-6233948401844739899</id><published>2010-02-07T20:14:00.000-08:00</published><updated>2010-02-07T20:18:12.651-08:00</updated><title type='text'>मराठी माणसाचे उद्योग आणि धंदे</title><content type='html'>&lt;p&gt;पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # फेब्रुवारी-२०१०&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;आपण ज्या समाजात राहतो, वावरतो त्या समाजाच्या काही गरजा असतात. काही दैनंदीन, निरंतर असतात काही कधीतरी किंवा अचानक निर्माण होणार्‍या असतात. त्यासाठी प्रत्येकालाच कुणावर तरी अवलंबून रहावंच लागतं. अश्या स्वरुपाच्या निरंतर किंवा आकस्मिक सेवा-सुविधा पुरवणं हा देखील उद्योग-धंद्याचाच एक भाग असतो. यासाठी काय लागतं? तर  एखादं कौशल्य किंवा ह्या सेवा-सुवीधा पुरवण्याची तयारी, सहज संपर्काचं एखादं माध्यम किंवा आवश्यक असेल तिथे एखादी जागा. ही ज्याची तयारी आहे तो कोणताही छोटा मोठा उद्योग-धंदा करु शकतो. अश्या उद्योग-धंद्याची समाजाला कायम गरज असते. गरज आणि ती गरज पुरवणार्‍या व्यक्तीची गाठभेट जिथं होते, तिथुन उद्योग-धंदा सुरु होतो.&lt;br /&gt;भय्यागीरी&lt;br /&gt;उत्तरेतला भय्या हा मातीच्या गोळ्यासारखा असतो. तो त्याचे तुंम्हाला पाहिजे तसे आकार बदलतो, पण त्याचा मातीचा गूण कधीच सोडत नाही. भय्या हा पृथ्वीतलावरचा सगळ्यात लवचीक, संयमी प्राणी आहे. तो रिक्षा-टॅक्सीत झोपतो, दिवसभर काम करतो, सार्वजनीक संडासात किंवा मोकळ्या जागेत सगळे विधी आटोपतो. वेळेला केळे किंवा चुरमुरे, वडापाव खातो, छप्पर असेल तर डाळ-भात स्वतः शिजवून खातो, एका गालावर मारलीत तर फक्त त्याजागी चोळतो. प्रतिकार करत नाही, सटकण्याच्या प्रयत्नात असतो. तो आपली चुक मान्य करतो, त्याला आंघोळीची, घामाची, कपडयांची पर्वा नसते.  तो दुध तर देतोच पण प्रसंगी भटजीही होतो, मच्छी विकतो, भाजी विकतो, चणे-शेंगदाणे विकतो, पाणिपुरी बनवतो, पानपटटी चालवतो, वडापाव बनवतो, हार-गजरे विकतो, तो कपडे विकतो, धुतो, त्या कपडयाना इस्त्री करतो, पिठाची गिरण चालवतो, केस कापतो, सुतार बनतो, मेडीकल दुकान चालवतो, तो वकील बनतो. भय्या सगळ्या रुपात दिसतो. कारण तो फक्त काम आणि काम करतो. त्याला कामाची लाज वाटत नाही.  त्याला लोक काय म्हणतील याची शरम वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला प्रदेश सोडतांना प्रत्येक भय्या हा गरीब असतो. दरीद्री असतो. तो फार शिकलेलाही नसतो.&lt;br /&gt;मराठी माणसाचे उद्योग&lt;br /&gt;मराठी माणसाचे उद्योगाच्या संदर्भात काही समज आहेत. म्हणजे असे की, मराठी माणूस हा धंदेवाईक नाही (आणि जो धंदेवाईक नसतो तो सालस, सुसंस्कृत असतो!) व्यवसाय करणे म्हणजे लबाडी करणे, ग्राहकांना लूटणे, ते त्याच्या संस्कारात बसत नाही (फक्त त्याला लूटून घ्यायला आवडते) जे यशस्वी झालेली मराठी व्यावसायीक आहेत ते  इतरांना घाबरवत राहतात. किंवा जे अयशस्वी आहेत ते धंदा कसा करावा याचे शिक्षण देत राहतात. त्यातले काही मराठी मराठी करत संघटना बांधतात राहतात (हा धंदा चांगला आहे!)  बाकीचे फर्डे वक्ते बनतात. सचोटी, प्रामाणिकपणा याविषयी अखंड बडबडत राहतात (ज्याचा कदाचित उद्योग-धंद्याशी संबध नसावा).  स्टॉक मार्केटला शिव्या देणे, पैशावर (तोंडी) थुंकणे,  धंद्यावर लाथ मारणे हे काहींचे आवडते उद्योग. आपल्या व्यवसायाची इतरत्र कुठेही शाखा न खोलणे आणि त्याचा सार्थ अभिमान बाळगणे, चादर पाहुन हात-पाय पसरणे (खरंतर हात-पाय पाहुन चादर पसरणे किंवा थेट चादरीची घडी घालणे इ.) त्यामुळे काही सन्माननीय अपवाद वगळता मराठी माणसाच्या उद्योगाची भरारी इतरांच्या तुलनेत काही फुटापर्यंतच राहते.&lt;br /&gt;मराठी माणसाचे धंदे&lt;br /&gt;मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्राचा भुमीपुत्र,  त्यामुळे पहिला मान त्याचा. तो मान चुकला की त्याचा पारा चढतो. हे पण समजू शकते, पण त्याचा मान चुकवला कुणी? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. जबाबदारीची आणि कष्टाची वेळ सोडा चाहुल जरी लागली तरी तो मागे हटतो. खरंतर मराठी माणसानं ठरवलं आणि बेफाम काम करायची हिंम्मत दाखवली तर ब्रम्हदेवाचा बापही त्याला तसे करण्यासाठी रोखू शकणार नाही. पण मराठी माणूस असे करीत नाही. मराठी माणूस सणाला कर्ज काढतो, वर्षाला सत्यनारायण घालतो, श्रावण तर पाळतोच पण हल्ली मार्गशिर्षातले गूरुवारही घालतो, गणपती- शिमग्याला गावाला जातो, संध्याकाळी टिव्हीवरच्या टुकार सिरिअल्स पहातो, आणि रविवारची न चुकता कोंबडी सोलत बसलेला असतो. त्यावेळी भय्या, गुजराती, आणि मारवाडी, आणि दक्षिण भारतीय दिवसाचे बारा-पंधरा तास राबत असतो.&lt;br /&gt;गणेशोत्सव, होळी(धुळवड), भंडारा, देव-धर्म आणि अस्मितेशी संबधीत जयंत्या-पुण्यतिथ्या, माघी गणेशोत्सव, लग्नकार्य, दुर्गोत्सव (म्हणजे थोडक्यात गरबा) या धंद्यात मराठी माणूस जेवढा ऍक्टीव्ह असतो तेवढा तो इतरवेळी कधीच नसतो. नवतरुण मंडळे स्थापणे, अध्यक्ष-उपाध्यक्ष बनणे, वर्गणी काढणे हा सगळ्यात आवडता धंदा या सगळ्यावर नजर टाकली तर लक्षात येतं की इथं कष्टापेक्षा मिरवणेच जास्त असतं.&lt;br /&gt;धंद्याची गोष्ट&lt;br /&gt;आपल्याला हे माहीत नाही का? की आज मुंबईत कोणताही धंदा करायला केवळ तुमच्याकडे प्रमाणपत्र किंवा कौशल्य असून चालत नाही,  किंवा तुम्ही फक्त प्राणाणिक असूनसुध्द्दा चालत नाही. धंद्याला नुसती सचोटी किंवा भांडवल पुरत नाही. आहे त्या परस्थीतीशी जुळवून घेऊन पुढे व्हावे लागते. लवचिकता अंगात भिनवावी लागते. आज धंद्यासाठी कोणताही परवाना मिळवण्यासाठी कोणत्याही सरकारी कर्मचार्‍याला पैसे चारावेच लागतात, त्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही, असा सार्वत्रीक अनुभव आहे. रस्त्यावर उद्योग-धंदा करणार्‍याकडून पोलीस, महानगरपालिकेचे अधिकारी पैसे खातात हे दिसतं. बाकी न दिसणार्‍या गोष्टीही बर्‍याच आहेत. प्रोटेक्शन मनी हा काय प्रकार आहे ते स्थानीक नगरसेवकाना विचारुन घ्या. सरकारी / कागदी यंत्रणेजवळ फक्त मराठीत बोललात म्हणून तुमचे काम होईल असे समजू नका (कदाचित त्यामुळे काम न होण्याचीच शक्यता जास्त). त्या व्यवस्थेला पाच-पन्नास रुपयांचे इंधन कायम पुरवीत जा. (इथे या वाक्याचा अर्थ लाच देणे असा वाटल्यास, तो तसाच समजावा!) जे आपण आज बदलू शकत नाही, त्याचा विचारही करणं सोडा. मला एक १९ वर्षांचा बबलू नावाचा तरुण माहीत आहे. जो उत्तरेतला भय्या आहे.  ज्याने आत्तापर्यंत कोलकत्ता, बँगलोर, आणि मुंबई या देशातल्या तीन मोठया शहरात जाऊन वेगवेगळे धंदे केले आहेत. रस्त्यावर कुठेही धंदा मांडायला त्याला लाज आता भीतीही वाटत नाही. त्याला मुंबईतले एकूण सहा होलसेल बिझनेस माहीत आहेत. (तुम्हाला माहीती आहेत?)&lt;br /&gt;मराठी माणसाने आपल्या मराठी बाण्याच्या आणि ताठ कण्याच्या गोष्टी बाजूला ठेऊन फक्त काम करायचे ठरवले तर आज जी त्याची भिकार अवस्था होत चालली आहे ती थांबण्यास मदत होईल. आता तरी कुणी अवतार घेण्याची त्याने वाट बघू नये. सरळ उद्योग-धंद्याला लागावे. नाहीतर  मराठी माणसाला धंद्याला लागायला वेळ लागणार नाही !&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-6233948401844739899?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/6233948401844739899/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=6233948401844739899' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/6233948401844739899'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/6233948401844739899'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/02/blog-post.html' title='मराठी माणसाचे उद्योग आणि धंदे'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-3798150291021968850</id><published>2010-01-27T23:29:00.000-08:00</published><updated>2010-01-27T23:31:23.057-08:00</updated><title type='text'>शी...sss मराठी ?</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडीलकर-पांडे # जानेवारी-२०१०&lt;br /&gt;&lt;br /&gt;संवादामध्ये 'साधणे' हा हेतू असतो. असायला पाहिजे. मग आपण काय साधतो ? तर एखाद्या भाजीवाल्याकडून एखादी भाजी आपण स्वतात मिळवतो. एखाद्याला पत्ता विचारुन आपण नेमक्या ठिकाणी पोचतो. कुणाला प्रश्न विचारतो किंवा कुणाला उत्तर सांगतो. यासाठी आपण काही सर्वमान्य साधनं वापरतो.  हावभाव, अंगविक्षेप किंवा हातवारे यानेही गोष्टी साधता येत असल्या तरीही या साधनांपेक्षा 'भाषा' हे संवादाचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणून आपण वापरतो. त्या साधनावरुन किंवा माध्यमावरुन सध्या महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस यांच्या मनात काही प्रश्न आहेत. यातल्या काही प्रश्नांची उत्तरे त्याच्याच म्हणजे मराठी माणसाच्या हातात आहेत.&lt;br /&gt;भाषा म्हणजे काय?&lt;br /&gt;भाषा केवळ संवादासाठी वापरण्यात येत असती तर मग आपण यावरुन  इतर भाषिकांशी भांडतो कशाला ? याचा अर्थ भाषा ही केवळ संवादाची भाषा नाही तर त्याचा संबध आपल्या रागलोभाशी आहे. अस्मितेशीही आहे.  आपण कोण आहोत ? आपल्या परंपरा, आपली संस्कृती, आपला इतिहास, आपला भुगोल याचा संबध या भाषा नावाच्या गोष्टींशी असतो. आपली भाषा मराठी. मराठी भाषा म्हणजे ज्ञानेश्वर, तुकारामांपासून ते आजवर मराठी साहित्य, समाज, संस्कृतीच्या क्षेत्रात भर टाकणार्‍या महनीय व्यक्तींची आणि संस्थांची मांदीयाळी. त्यामुळे जेंव्हा या मांदीयाळीतील कोणत्याही एका घटकाचा अपमान व्हायला लागतो तेंव्हा तो आपल्या भाषेचा म्हणजे मराठीचा अपमान आहे असे आपण समजतो, आणि आपल्याला राग येतो. एका अर्थाने भाषेची जपणूक करणे म्हणजे अनेक अर्थाने या सार्‍याची जपणूक असा त्याचा अर्थ होतो.&lt;br /&gt;आपण महाराष्ट्रात राहतो.  महाराष्ट्राचा एक नकाशा आहे. महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. इथे आपण रोजचे जगतो-वागतो, जे व्यवहार करतो त्यासाठी माध्यम म्हणून कोणती भाषा वापरतो? म्हणजे कोणती भाषा वापरायला पाहिजे? अर्थातच मराठी...! मातृभाषा म्हणून मराठी बद्दल जे प्रेम महाराष्ट्रीय माणसाला वाटेल ते परभाषिकाला वाटेलच असे नाही. तसे प्रेम त्याला त्याच्या मातृभाषेविषयी असेल. तरीही परप्रांतातून येणार्‍या प्रत्येकाला तिथल्या स्थानीक भाषेचा किमान आदर असायलाच पाहिजे.&lt;br /&gt;भाषेचा अभिमान म्हणजे काय ?&lt;br /&gt;एखादा अमराठी माणूस मराठी बोलतो त्याचं आपल्याला कौतुक वाटतं. तो त्याचं काम साधतो. जे भाषा या माध्यमाचा मुळ हेतू असतो. आपण मराठी आहोत, पण आपण मराठी बोलतो याचं कौतुक कोण करणार?  तर कुणीच नाही. मग आपण सरळ इंग्रजी किंवा थेट हिंदीत सुरु होतो. आणि तिथुनच आपण आपल्याला फसवायला लागतो. एखादी भाषा अधिक प्रमाणात बोलल्यामुळे व्यवहारात त्या भाषेचा वावर वाढतो. भाषा ती त वाढत जाणार्‍या शब्दा शब्दातून समृध्द होत जाते. इतर भाषाही ती आपल्यात सामावून घ्यायला लागते. बोलण्यात, लिहिण्यात ज्या भाषेचा जेवढा जास्तीत जास्त वापर होईल तेवढं तिचं आयुष्य वाढण्याची शक्यता जास्त होते. जेंव्हा आजुबाजूची सर्वच माणसं संवादासाठी एकच एक भाषा वापरतात तेंव्हा त्या भाषेच्या एकजिनसीपणामुळे त्या समाजाचा व्यवहार अधिक सहज, साधा, सुखकर आणि सोपा होतो. मग इथे मराठी अमराठी, महाराष्ट्रीय नॉन- महाराष्ट्रीय हा मुद्दा उरत नाही. इथून पुढे संवाद शक्य असतो (यात भाषेचा प्रश्न सोपा होतो भाषिकांचा कठीण होत जातो)&lt;br /&gt;संधी मिळेल तेंव्हा आपण इतर भाषा किंवा भाषिकांचे विष्लेशण करायला हरकत नाही. पण वेळ मिळेल तेंव्हा, आपण आपल्याला आपल्या भाषेबद्दल वाटणारं प्रेम तपासून पहायला पाहिजे. आज मुंबईत बेस्ट बसेस मध्ये कंडक्टर्स(वाहक)  आणि मासळी बाजारात कोळणी या दोनच जमाती मागे पुढे न बघता थेट मराठीतून सुरुवात करतात. बाकी झाडून सगळे हिंदीत उतरतात. हिंदी भाषेला तिला म्हणून तिचं  एक सौंदर्य आहेच. पण आपण जेंव्हा तिला आपल्या घाटी, कोकणी सुरात घोळवतो, तेंव्हा भाषा म्हणून तिचाही आपण कचराच केलेला असतो. आपली भाषा आपल्याच बोलीत गोड वाटते. संवादच साधायचा आहे ना, मग करा ना आपल्या भाषेत सुरुवात. समोरच्याला असेल अडचण तर तर तो सांगेल किंवा शिकेल. पण ती त्याची अडचण असुदे. तुम्ही कशाला आपल्या भाषेला अडचणीत टाकताय. कारण भाषेच्या बाबतीत असं आहे की जी भाषा वापरली जाते तीच टिकते आणि जी वापरली जात नाही ती संपते सुध्द्दा. &lt;br /&gt;मराठी पालक इंग्रजी बालक&lt;br /&gt;आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतो. ठीक आहे. ती काळाची गरज आहे असं आपण समजू. भाषेच्या आदराचाच प्रश्न आहे तर इंग्रजीचाही करु. पण इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांचं कौतुक त्यांच्याच पालकांकडून ऐकतांना शिसारी येते. मुलं शाळेतच शिकतात असं नाही. कुटुंब, समाज, परिसर याच्याकडूनही ती शिकतच असतात. यातली अनेक मुलं रोजच्या व्यवहारातलं सुध्दा मराठी चुकीचं बोलतात. विशेषतः चुकीचे उच्चार करतात. करत राहतात, याला कारण त्यांच्या अश्या बोलण्याचं घरातुनच भारी कोडकौतूक केलं जातं. 'ट्वेल्व्ह ओ क्लॉक वाजले' यापेक्षा 'बारा वाजले' असं म्हणनं खरोखरच सोप आहे, तरी तसंच बोलतात. 'बाबा' ला 'पप्पा' किंवा 'डॅडी' म्हणतात 'आई' ला 'मम्मी' किंवा 'मॉम' म्हणतात. (आजीला आई म्हणण्याची फॅशन सध्या जोर धरते आहे) हे अश्यासाठी लिहिलंय की वाचतांना तरी कळेल, या शब्दांचे उच्चार मराठीत किती सोपे आहेत ते. या मुलांना 'टर्न' कळतं तर 'दीर्घ' कसं कळत नाही, हे समजणे कठीण जाते.  प्रश्न असा आहे की प्रयत्नपुर्वक जिथं आपण दुसर्‍या भाषा शिकतो तिथं थोडयाश्या प्रयत्नात आपण आपली भाषा नीट वापरायला शिकण्यात काय हरकत आहे ?&lt;br /&gt;ज्ञानेश्वरांची एखादी ओवी ऐका म्हणजे  मराठी भाषेत किती गोडवा आहे हे जाणवेल. तुकारामांचा एखादा अभंग ऐका म्हणजे मराठी भाषा किती थेट आहे हे कळेल. गोविंदाग्रज, बालकवी, कुसुमाग्रज किंवा पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी वाचा म्हणजे मराठी भाषेतलं सौदर्य कळेल. जे आपलं आहे ते बिनधास्त आपलं म्हणायला शिका. &lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-3798150291021968850?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/3798150291021968850/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=3798150291021968850' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/3798150291021968850'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/3798150291021968850'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/01/sss.html' title='शी...sss मराठी ?'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-7851199613563279997</id><published>2010-01-27T23:24:00.000-08:00</published><updated>2010-01-27T23:28:47.029-08:00</updated><title type='text'>विनाकष्ट जय महाराष्ट्र !</title><content type='html'>&lt;p&gt;पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडीलकर-पांडे # जानेवारी-२०१०&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्र म्हणजे काय. मराठी माणूस म्हणजे काय. या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायला लागलो की, आपली भाषा, आपली संस्कृती, आपला इतिहास, आपल्या परंपरा आणि त्यातून जन्माला येणारी अस्मिता या सर्वांचा उल्लेख येणं स्वाभावीक असतं. अलिकडच्या काळात मराठी माणूस किंवा महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, इतिहास आणि परंपरां याला एक विषेश महत्त्व आलेलं आहे.&lt;br /&gt;खरंतर याच्या विकासासाठी राज्य भाषा विकास संस्था, सांस्कृतीक खातं, सरकारी गॅझेट, ईतिहास संशोधन मंडळ या राज्य सरकारकडून स्थापन झालेल्या संस्था आहेत. पण या त्यांची कामं प्रत्यक्ष व्यवहारात कुचकामी ठरलेली आहेत. यात समाजाचा सहभाग नाही, अंकुश नाही. एक सांस्कृतीक खातं सोडलं तर अनेकांना याची माहितीही नसते. त्यामुळेच मग सरकारबाह्य शक्ती यात हस्थक्षेप करतात. वेळप्रसंगी त्या आक्रमकही बनतात. पण त्यामुळे प्रश्न सुटत तर नाहीच पण तो आहे तिथंच राहतो, किंबहुना तो जास्तच चिघळतो.&lt;br /&gt;भाषा, संस्कृती, अस्मितेचे प्रश्न फक्त भावनीकच असतात असे नाही त्यामागे अभ्यास, तारतम्य आणि विचारही असू शकतो, उत्तराच्या जागा कानाखालीच असतात असे नाही. सहकार्य आणि सहभागातूनही वाट काढता येऊ शकते, हे आता समजून घेण्याची गरज आहे. तरीही या निमित्ताने समाजात झालेली घुसळण फार महत्त्वाची आहे. या प्रश्नातलं राजकारण बाजूला करुन त्यासाठी चिकाटीनं काम करण्याची गरज त्या त्या क्षेत्रातल्या धुरीणांची असते. केवळ राजकारण करणार्‍या माणसांच्या नावानं बोटं मोडूनही असे प्रश्न सुटणार नाही. तरीही अश्या प्रकारच्या प्रश्नांसाठीची लढाई जर केवळ प्रतिक्रीयात्मकच राहीली तर भाषेचा प्रश्न अधिकच चिवट आणि किचकट बनत जाणार. भावनेचा भर लवकर ओसरतो. अश्या प्रश्नावर घटनात्मक आणि मराठी माणसाच्या मुळ मानसिकतेत बदल करणारे उपायच आवश्यक आहेत. परंतू दुर्दैवाने असे उपाय होतांना दिसत नाहीत.&lt;br /&gt;या लेखाच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना आणि त्यांच्या अनुयायीना काही मुलभूत प्रश्न विचारले. ज्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी अभिमान आहे. त्यासाठी ते आपल्या प्राणांचीही बाजी लाऊ शकतात. (अर्थातच यासाठी कुणाचे प्राणही घेऊ शकतात)&lt;br /&gt;महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मापदंडातलं मानाचं पहिलं पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या जन्मतीथी आणि पुण्यतिथी विषयी जवळजवळ अनेकांना माहित नव्हतं. (एक शिवसेनेची आणि एक कॉग्रेसची एवढंच माहिती आहे) महाराजानी लढलेल्या लढाया, जिंकलेले गड- किल्ले याविषयी तर आलबेल आहे. वस्तुनिष्ठ माहितीपेक्षा मोघम इतिहास तोंडपाठ, अशी अवस्था. इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तका पलिकडच्या ज्ञानात नंतर एक टक्क्याचीही भर पडलेली नाही. फक्त ...जय भवानी म्हटलं की ...जय शिवाजी म्हणायचं एवढंच.&lt;br /&gt;यातल्या राज्यकर्त्यांना शिवाजी महाराज्यांचं अष्टप्रधानमंडळ तरी माहीत असायला पाहिजे होते. पण तेही नाही. तेव्हाचं अष्टप्रधानमंडळ म्हणजे एकप्रकारे आत्ताचं कॅबिनेट मंत्रीमंडळ्च. कोण कुणाचा समर्थक, कोण कुणाचा नातेवाईक, कोण कुणाचा जावई, कोण कुणाचा भाऊबंद. एवढाच महाराजांचा त्यामागे निकष होता की आणखी काय, हे अष्टप्रधान मंडळ त्याचे प्रमुख आणि त्यांची कामं यावर जरी साधी नजर फिरवली तरी बरच शिक्षण झालं असतं. शिवाजी महाराज राज्यकर्ते म्हणून का आणि किती थोर होते याची उत्तरे यात मिळाली असती. आज तीन शतकानंतरही त्यांची थोरवी आपण का गातो हे कळलं असतं. पण एखादी गोष्ट फुकट वापरायला मिळाली की त्याची किंमत नसते असंच म्हणायला पाहिजे. महाराज्याचं नाव घ्यायला टॅक्स लागला असता तर कदाचीत त्यांची थोरवी यांना चांगल्याप्रकारे समजली असती.&lt;br /&gt;पुढचा प्रश्न होता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मिती संबधातला. हे वर्ष सुवर्णमहोत्सवी आहे म्हणून त्याला महत्त्व. नाही तर काय? त्या लढयात कामी आलेल्या १०५ (खरंतर १०६) हुतात्म्यांपैकी पाच जणांची तरी नावं सांगा म्हटलं तर त्यातल्या एकालाही एकही नाव सांगता आलेलं नाही. ज्या हुतात्म्यांच्या नावानं आपण शपथ घालतो, राजकारण करतो त्यांची नावंही आपल्याला महित असु नये यासारखा दुसरा कृतघ्नपणा नाही.&lt;br /&gt;या प्रश्नाचा आता तसा व्यवहारात उपयोग नसला तरीही विचारलं की, मराठी महिन्यांची नावं सांगा. या वेळी बहुतेक बाराच असावेत याविषयी एकमत होतं, पण वाढीव महिना म्हणजे काय याविषयी गोंधळ होताच. काही सन्माननीय अपवाद वगळता अनेकांना बारा महिन्यांची सलग नावं सांगता आलेली नाहीत.&lt;br /&gt;एखदा माणूस सरपंच झाला की त्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनल्याचं स्वप्न पडायला लागतं. पण ज्या राज्याचा पुढे आपल्याला प्रमुख बनायचे आहे, त्या राज्याचे एकुण जिल्हे किती विचारले तर ते एकालाही सांगता आलेलं नाही.&lt;br /&gt;हे झालं नेत्यांचं. ते काम करुन करुन थकतात. ते वाचणार कधी? काही नेते फक्त आपल्यावरची टीका तेवढीच वाचत असावेत. पण या सर्व गोष्टींचा अभिमान आपल्यालाही असतो. आपणही महाराष्ट्रीय किंवा मराठी असतो. मग आपल्याला तरी हे माहीत आहे का? असा प्रश्न आपल्यालाही आपण विचारायला हवा. आपण महाराष्ट्रीय किंवा मराठी आहोत हे फक्त म्हणण्यापेक्षा ते चाचपून पहायला हवं.&lt;br /&gt;महाराष्ट्राच्या गौरवाची, अभिमानाची जी प्रतीकं आपण वापरतो त्याची साधी ओळखही आपल्याला करुन घ्यावीशी वाटत नाही. हे युग माहीतीचं आहे. ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी सताड उघडे आहेत. आपल्याला वाचता येतं, बघता येतं. मग प्रश्न हा उरतो की घोडं अडतं कुठं ? श्रध्दा डोळस असायला काय हरकत आहे ? कोणतेही कष्ट न घेता नुसतं जय महाराष्ट्र म्हणायचं हे किती दिवस चालायचं ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट&lt;br /&gt;99672 93550&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-7851199613563279997?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/7851199613563279997/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=7851199613563279997' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/7851199613563279997'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/7851199613563279997'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2010/01/blog-post.html' title='विनाकष्ट जय महाराष्ट्र !'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-2605224299294042326</id><published>2009-03-13T06:24:00.000-07:00</published><updated>2009-03-13T06:37:08.240-07:00</updated><title type='text'>कुत्ते के पिछे</title><content type='html'>पुर्वप्रसिध्दी मासिक स्वच्छंदी पाखरु # संपादक प्रकाश तळेकर जून २००८&lt;br /&gt;&lt;br /&gt;जो कुणी भटक्या कुत्र्याला रस्त्यावर किंवा सार्वजनीक ठिकाणी खायला घालेल त्याला ५००/- रु पर्यंत दंड. स्वच्छता आणि आरोग्य विभाग पोटकायदा २००६, कलम ४,५ प्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यानं या कायद्याचा अंमल करायचा असं ठरवलं आणि एका नव्या विषय-वादाला सुरुवात झाली.&lt;br /&gt;शासन व्यवस्था, कुत्र्यांचे प्रेमी (सामान्यपणे यांचा उल्लेख प्राणिमित्र असा करतात), कुत्र्यांचे मालक, किंवा पुण्य मिळवण्यासाठी म्हणून कुत्र्याला खायला घालणारे या सगळ्यांचं लक्ष या बातमीने वेधून घेतलं. कुत्र्यांना कुत्र्यासारखं मारा असं म्हणनारे जसे आहेत तसे कुत्र्यांना माणसासारखे वागवा असंही म्हणनारे कमी नाहीत. कुत्र्याला हा...ssड म्हणन्यापलिकडे ज्यांचा संबध आला नाही ते कुत्र्याशिवाय जे जगु शकत नाही अश्या माणसांचं दु:ख कसं समजणार ?&lt;br /&gt;दिवसा भटकायचं. रात्री भुंकायचं. लोकांची झोप हराम करायची. खायला मिळालं नाही की चोरीचपाटी करायची. कुठंही तोंड मारायचं. विनाकारण अंगावर यायचं. एकटा-दुकटा गाठुन त्याला चावायचं. श्रावण- भाद्रपदात ताळतंत्र सोडायचं अश्या सवयींमुळेच कुत्रे अडचणीत आले आहेत. अन्यत: कुत्रे कंपनीच्या आदर्श वागण्याचीच वर्णनं आपण ऐकत-वाचत आलेलो आहोत. इमानदारी, स्वामीनिष्ठा, प्रामाणिकपणा हे सगळे गुण माणसांन कुत्र्यांकडुनच घेतलेले असावेत. नसबंदीपासुन कोंडवाडयापर्यंत सगळे उपाय झाल्यानंतर महानगरपालिका कुत्र्यांच्या पोटावरच उठली आहे, म्हणूनच भटक्या कुत्र्यांच्या मागे केलेली ही भटकंती.&lt;br /&gt;कुत्र्यांना सार्वजनीक ठिकाणी खायला द्यायचं नाही, याचा अर्थ त्यांना उपाशी ठेवायचं. त्यामुळे कसा / कोणता प्रश्न सुटेल माहीत नाही. कदाचीत तो प्रश्न अजुनच किचकट बनेल असं वाटत. कारण ताट वाढल्यावरच किंवा हातपाय धुवुन मगच पंगतीला बसेन, किंवा डायनींग टेबलावरच बसेन, किंवा आवडीचा मेनु असेल तरच जेवेन असं काही कुत्रा म्हणत नाही. त्याला भुक लागली की तो जेवतो, त्यांच्या अश्या काही ठरलेल्या वेळाही नाहीत. खरंतर जेंव्हा काही समोर येईल तेंव्हा जेवायचं हाच कुत्र्यांचा शिरस्ता असतो. त्यामुळं महानगरपालिकेनं ठरवलं म्हणून कुत्रे उपाशी राहीले हा एक शेखचिल्ली आयटम ठरावा.&lt;br /&gt;भटक्या कुत्र्यांचा प्रश्न बिकट बनतो आहे हे खरंच आहे. पण ते सोडवणूकीचे मार्ग रास्त असावेत. जगभरात कुत्र्यांना ठार करुनच हा प्रश्न कायमसाठी सोडवण्याचे प्रयोग अनेक ठिकाणी झाले आहेत. अगदी अमेरिकेत सुद्धा. आणि कमी लोकसंख्या असलेल्या देशात कुत्र्यांना पाळलं जातं, त्यामुळं संख्यावाढीला आपोआप आळा बसतो, असाही अनुभव आहे. पण कुत्र्यांना ठार मारण्याविरुद्ध चळवळी झाल्या त्यामुळे आता अमेरिकेसारख्या देशातही सर्वत्र नो किल शेल्टर दिसतात. प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे, हे मान्य होत आहे.&lt;br /&gt;मुंबईच्या बाबतीत महानगरपालिकेनं भटक्या कुत्र्याना ठार करण्यासंदर्भात हाय कोर्टाकडे परवानगी मागीतली होती. पण त्यापेक्षा निर्बीजीकरण करा असा आदेश कोर्टानं दिला.&lt;br /&gt;भटक्या कुत्र्यांच्याबाबतीत काम करणार्‍या अनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन्सचं म्हणन असं की कुत्र्यांना मारण्यापेक्षा त्यांच निर्बीजीकरण करावं. अर्थात हे महानगरपालिकेच्या खर्चानं आणि सहकार्यानं. यासाठी त्यांनी काही मार्गही सुचवलेले आहेत ते असे की, सार्वजनीक ठिकाणी स्वछता पाळावी. कचरा-घाण साचू देऊ नये. नागरीकांनी जखमी कुत्र्यांची तक्रार लगेचच करावी. आणि महानगरपालिकेकडून त्या तक्रारीचं निवारणही लवकर व्हावं. विद्यार्थी, नागरीक, महानगरपालिकेचा नोकरदारवर्ग यांना कुत्र्यांच्या वागण्याच्या पध्दतीविषयी तसंच त्यांना कसं हाताळावं याचं प्रशिक्षण द्यावं. हे सगळं १९९८ च्या हायकोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करावं. आणि मुख्य म्हणजे आम्ही म्हणजे अनिमल वेल्फेअर संस्था ही रॅबीज (ज्या रोगामुळे कुत्रा पिसाळतो तो रोग) व्यतिरिक्त इतर मानवी नुकसानीत सहभागी असणार नाही, ते महानगरपालिकाच बघुन घेईल.&lt;br /&gt;तरीही भटक्या कुत्र्याचां प्रश्न कायमसाठी मिटवायचा असेल तर त्यांना ठारच मारलं पाहिजे असं महानगरपालिकेचं म्हणनं आहे, कारण १९९४ पर्यंत कुत्र्याना ठार करणे हे त्यांच नित्यकर्म होतं. हाय कोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टासमोर हा प्रस्ताव मांडण्याबाबतीत महानगरपालिका अजुनही ठाम आहे. म्हणजे" कुत्ते...कमीने...मै तुझे मारकरही छोडुंगा" अशीच भुमिका महानगरपालिकेने घेतली आहे असं म्हणायला हरकत नाही. कुत्र्यांसाठी तुरुंग किंवा कोंडवाडे बनवा पण त्यांना अमानुशपणे मारु नका असं प्राणीमित्रांचं म्हणनं आहे. त्यासाठी खरंतर मुंबई महानगरपालिकेनं पालघर आणि वसईमध्ये ४४ एकर जमिन घ्यायची ठरवली होती. ज्यामुळे जवळजवळ ६ लाख कुत्र्यांचे पुनर्वसन श्यक्य होते. पण जमिनीचे हस्थांतरण आणि बाकी प्रशासकीय अडचणींमुळे तोही प्रयत्न फसला.&lt;br /&gt;महानगरपालिकेच्या ताज्या सर्व्हेक्षणानुसार शहरात ९७,००० कुत्रे आहेत, त्यापैकी ७०,००० भटके आहेत. काही सामाजीक संस्था म्हणतात हा आकडा ५ लाखाच्याही वर आहे. महानगर पालिकेचे कमिशनर म्हणतात, आम्ही सर्व्हेक्षणासाठी स्थानिक व्हालिंटीअर्सची मदत घेतली. त्यांनी घराघरात जाऊन सर्व्हे केला आहे, आणि आजुबाजुच्या भटक्या कुत्र्यांना ते ओळखतातच. म्हणजे महानगरपालिका असो नाहितर सामाजीक संस्था दोन्हींचेही आधार लंगडेच म्हणायला हवेत.&lt;br /&gt;महानगरपालिकेनं एकुण १२ सामाजीक संस्थाची मदत घेउन कुत्र्यांचं निर्बीजीकरण सुरु केलं आहे. त्याच्यासोबत झालेल्या करारानुसार या संस्थानी रोज १०० कुत्र्यांचं निर्बीजीकरण करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी त्यांना प्रत्येक कुत्र्यापाठी ६००/- रुपये खर्च दिला जातो. हे कॉन्ट्रक्ट ११ महिन्यांसाठी आहे. म्हणजे एका संस्थेला महिन्याला १८ लाख रुपये याप्रमाणे सगळ्या कॉन्ट्रक्टचे मिळून १९८ लाख. अश्या एकुण १२ संस्था. म्हणजे हा मामला २३ करोड ७६ लाख रुपयांवर जातो. आणि ज्या संस्था आपलं काम जलध गतीने करतील त्यांचं कॉन्ट्रक्ट पुन्हा वाढवण्यात येईल असंही ठरलं आहे.&lt;br /&gt;पण अनुभव असा आहे की, गेल्या वर्षी कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी ४ करोड रु मंजुर झाले होते. त्यातले खर्च झाले फक्त १ लाख. २००५ साली ९ लाख मंजुर झाले त्यातले खर्च झाले फक्त साडेतीन लाख, २००४ साली १२ लाख मंजुर झाले त्यातले खर्च झाले फक्त ५५ हजार. हे असं का होतं कारण म्हणे निर्बीजीकरणासाठी सेंटर कमी आहेत. आणि सत्य हे आहे की फक्त सहा सामाजीक संस्था आहेत. जी ही सेंटर चालवतात म्हणजे वर्षाला फक्त १२००० कुत्र्यांनाच या सेवेचा लाभ होउ शकतो. बाकी जनता मोकाटच.&lt;br /&gt;लोक आहेत. घाण-कचरा आहे. महानगरपालिका आहे. कुत्रे आहेत. कुत्रे प्रेमी आहेत. प्रश्न आहेत. उत्तरंही आहेत. जोपर्यंत हा विषय आहे तोपर्यंत चर्चाही आहे. तोपर्यंत आपल्याला कुत्रा चावणार नाही याची काळ्जी घ्यायला हवी. भटक्या, आक्रमक, भयंकर, भयानक, चवताळलेल्या, भुंकणार्‍या किंवा जखमी कुत्र्यांपासुन आपला बचाव कसा करावा यासाठी मार्गदर्शक सुत्र बनवली गेली आहेत. ती प्रत्यक्ष कुत्रा अंगावर आला की विसरणार असाल तर वाचू नका. १) अश्या प्रकारच्या म्हणजे भुंकणार्‍या वगैरे कुत्र्यांच्या मागे जाऊ नका. त्याच्या बाजुने सावकाशपणे चालत जा. धावू नका. त्याच्याकडे बघतबघतच सटका. २) आपण घाबरलेलो आहे हे कुत्र्याला दाखऊ नका. (हे खूप कठीण आहे. पण योग आणि साधनेनं हे शक्य आहे) ३) त्याच्याबरोबर(म्हणजे कुत्र्यांबरोबर) बोलायची वेळ आली तर खंबीरपणे बोला. ४) विस्फारलेल्या डोळ्यांनी कुत्र्याकडे पाहु नका. त्यामुळे त्याचा गैरसमज होतो, हे आपल्यासाठी आव्हान आहे असं त्याला वाटतं आणि तो अश्यावेळी हल्ला बोलू शकतो. ५) जर तो गुरगुरायला लागला तर त्याचा अर्थ त्याला म्हणायचं आहे की, मला एकटं सोडा. सोडून द्या. ६) खिशात शक्यतो बिस्कीटं ठेवा. म्हणजे आयत्यावेळी ती त्याच्यासमोर फेकता येतील. आणि हे ही लक्षात ठेवा, जे आपण ऐकत ऐकतच मोठे झालेलो असतो की, "भोंकनेवाला हर कुत्ता काँटता नही."&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रवीण धोपट.&lt;br /&gt;pravindhopat@gmail.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7897867527575966610-2605224299294042326?l=pravindhopat.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://pravindhopat.blogspot.com/feeds/2605224299294042326/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7897867527575966610&amp;postID=2605224299294042326' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/2605224299294042326'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7897867527575966610/posts/default/2605224299294042326'/><link rel='alternate' type='text/html' href='http://pravindhopat.blogspot.com/2009/03/blog-post_13.html' title='कुत्ते के पिछे'/><author><name>PravinDhopat</name><uri>http://www.blogger.com/profile/07272983373920498663</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://2.bp.blogspot.com/_mm56ScMTqac/S6xUy2YsZVI/AAAAAAAAAB8/CNYCbfmXsEo/S220/prveen.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7897867527575966610.post-7910916252099257916</id><published>2009-03-09T10:47:00.000-07:00</published><updated>2009-03-25T04:11:42.956-07:00</updated><title type='text'>बोनलेस</title><content type='html'>पुर्वप्रसिध्द्दी- महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # मार्च २००९&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन सार्वभौम सत्ता आणि स्वातंत्र्याचा अर्थ शिवाजी राजांनी महाराष्ट्राला पहिल्यांदा शिकवला.पण त्यानंतरच्या फक्त दोनच पिढयात या अर्थाचा चक्काचूर झाला. दिल्लीसमोर मान तुकवण्याची परंपरा शाहु महाराजापासून सुरुवात झाली, जी आजतागायत येन-केन-प्रकारेनं चालू आहे. कित्तेकांचा स्वाभिमान दिल्लीसमोर जावून झुकतो, याचा प्रत्यय महाराष्ट्राने पुन:पुन्हा अनुभवला आहे. दिल्लीच्या या शिक्क्याची सुरुवात झाली ती २४ एप्रील १७१९ या दिवशी, जेंव्हा छत्रपती शाहुच्या नावाने तयार करण्यात आलेल्या स्वराज्य, चौथाई व सरदेशमुखी यांच्या सनदावर सय्यद बंधूनी बादशहाकडून शिक्कामोर्तब करुन घेतले.&lt;br /&gt;"शाहुमहाराजांनी ज्याअर्थी मोगलांकडून सनदा मिळवून केवळ दक्षीणेची सुभेदारी पत्करली त्याअर्थी त्यात स्वातंत्र्याची कल्पना नाही, स्वराज्याची जाणीव नाही व पराक्रमाचीही ईर्षा नाही. मग त्यांना मराठ्यांचे छत्रपतीपद मिळवण्याचा अधीकार उरतोच कोठे ? आपले राज्य स्वतंत्र असले पाहिजे, ते मोगलांच्या कृपाछत्राखाली असता कामा नये", अशी राजाराम महाराजांची पत्नी ताराबाईची भुमिका होती. शाहुमहाराज बादशहाच्या कृपेने दक्षिणेत मराठयांचे राज्य बळकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. असेही त्या म्हणत. मोगलांच्या अंकीत असलेल्या अशा व्यक्तीला छत्रपतीपद मिळता कामा नये असेही त्यांनी इतर मराठे सरदारातही जाहीर केले होते. पण एवढया हिरिरीने शाहुमहाराज्यांच्या विरुध्द्द लढण्यासाठी उभ्या ठाकलेल्या ताराबाईनी पुढे आपल्या पुत्राच्या नावाने सनदा मिळवण्यासाठी बादशहाकडे वकील पाठवले, ही गोष्ट विसंगत असली तरी सत्य होती.&lt;br /&gt;५४३ खासदारांच्या लोकसभेत महाराष्ट्राचे ४८ खासदार. त्यातही मराठी भाषक ९०%. पण जेंव्हा भाषेच्या आणि मुंबईच्या प्रश्नावर वादळ उठले तेंव्हा यातल्या बहुतेकांनी गप्प बसणेच पसंत केले. राज ठाकरे यांच्या विरोधात उत्तरेकडील नेते आपापसातले मतभेद विसरुन केवळ प्रांतीक अस्मीतेसाठी एक झाले होते. ते राष्टीय एकात्मतेचा कितीही आव आणत होते तरी त्यांच्यातलीही आपापल्या प्रदेशाविषयी असलेली अस्मीता ठळकपणे दिसत होती. राज ठाकरे यांच्या थेट आणि वास्तवीक प्रश्नांना कुणाकडेही ठोस उत्तरे नव्हती तरीही कधी घटनेच्या अधीकाराआडून, कधी मिडीयाच्या आक्रस्ताळेपणाआडून त्यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्रावर आग ओकण्याची एकही संधी सोडली नाही. तेंव्हा मराठी खासदार आपल्या सोडून इतर राज्यातल्या माणसांच्या घटनादत्त अधिकारांचे विष्लेशण करीत बसले होते.&lt;br /&gt;विशेषतः मुंबईच्या उपलब्ध जागेचा, लोकसंखेचा, सोई, संध्या, नोकर्‍यांचा तसंच मराठी भाषा आणि अस्
